शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
3
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
4
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
5
"सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
6
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
7
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
8
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
9
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
10
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
11
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
12
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
13
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
14
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
15
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
16
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
18
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
19
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
20
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन

शेलूबाजार चौकातील वाहतुकीचे तीनतेरा

By admin | Updated: May 20, 2014 22:36 IST

वाहतुकीच्या कोंडीतून शेलुबाजार चौक अद्यापही बाहेर येऊ शकला नाही.

मंगरुळपीर: वाहतुकीच्या कोंडीतून शेलुबाजार चौक अद्यापही बाहेर येऊ शकला नाही. सुरळीत वाहतुकीसाठी नियुक्त केलेले कर्मचारीही चौकाऐवजी गावाबाहेरच खासगी प्रवासी वाहनं व अवजड वाहनांची तपासणी करण्यातच धन्यता मानत आहेत. अर्थात या सर्व घडोमोडी अर्थपूर्ण वाटाघाटीतून घडत असल्याचेही समोर येत आहे. एस टी च्या हक्काच्या जागेवर खुलेआम अतिक्रमन करणार्‍या वाहनाला अभय दिल्या जात असुन वाहतुक पोलीसांकडुन एस. टी. ला सावत्रपणाची वागणुक दिल्या जात आहे. एस टी महामंडळांने पोलीसांना निवेदन देवुन अवैध वाहतुकीला आळा घालण्याची मागणी केली आहे तालुक्यातील शेलूबाजार चौक दिवसेंदिवस संवेदनशिल बनत चालला आहे वारंवार वाहतुकीच्या कोंडीत अडकणार्‍या चौकाला बाहेर काढण्यासाठी वाहतुक शिपाई कमी पडत असल्याचे दिसून येते. चौकाऐवजी गावाबाहेर रस्त्यावर तपासणी होत असल्याने दिवसभर या चौकात वाहतुकीचा खेळखंडोबा पाहावयास मिळत आहे. वारंवार जाम होणार्‍या वाहतुकीमुळे आम आदमी पार वैतागुन गेले आहे.प् ादचारी, मुले,मुली वाहतुकीच्या सुळसुळाटमुळे त्रस्त होवुन गेले आहे. अकोला,मालेगांव,कारंजा, मंगरूळपीर या मार्गावर मोठया प्रमाणात अतिक्रमन वाढल्यामुळे भर रस्त्यावर दुचाकी वाहने सोडुन बाजारकरू फिरत असतात वाहतुकीस अडथळा निर्मान करणार्‍या वाहनावर कोणत्याच प्रकारची कारवाई का होत नाही असा सवाल उपस्थीत केल्या जात आहे. एका छोटयाशा चौकासाठी तीन शिपाई तैनात तरी सुध्दा वाहतुकीचा खेळखंडोबा का ? हा संशोधनाचा विषय आहे. गत दोनवर्षा पुर्वी जिल्हाधिकारी रामचंद्र कुळकर्णी यांनी चौकातील वाहनाचा बेशीस्तपणा पाहल्यानंतर पोलीसांना नो पार्कीग झोन निर्मान करण्याच्या सुचना दिल्या होत्या. मात्र त्या सुचनांचे पालन होतांना दिसत नाही. एस टी महामंडळाची हक्काची जागा वाहतुक पोलीसांनी खाजगी वाहतुकीकरिता राखीव ठेवल्याचे चित्र पहावयास मिळते. कारण एस टी थांब्याचे ठिकाणी बस थांबली तर त्यांना तेथून बस त्वरीत काढण्याचे फर्मान कर्तव्यावर असणारे शिपाई सोडतात. शेलूबाजार येथे बुधवार हा आठवडी बाजाराचा दिवस असल्यांने दिवसभर तीनही शिपाई कर्तव्यावर असणे आवश्यक आहे. मात्र वसुलीचा दिवस असल्यामुळे चौकाला वार्‍यावर सोडुन अकोला, कारंजा, मंगरूळपीर, मालेगाव रोडवर ड्युटी बजावतांना दिसतात. सकाळी ८ वाजता चौकात कर्तव्यावर येण्याच्या ठाणेदारांच्या सुचना असतांनाही उशीरा येणे, लवकरच घरचा रस्ता धरण्याच्या प्रकारामुळे चौकातील बाजारकरू नागरिक, महिला असुरक्षीत झाले आहेत. मागील आठवड्यात लग्न सराई असल्याने सकाळी १0 ते १२ वाजताचे सुमारास दोन ते अडीच तास वाहतुक जाम झाली असल्याचे चित्र पहावयास मिळाले. वरिष्ठानी याची दखल घेत एका शिपायाला ठाण्यात बोलवुन घेतले होते. पुढे काय झाले हे मात्र गुलदस्त्यात आहे. विस्कळीत वाहतुकीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.