शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
2
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
3
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
4
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
5
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
6
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
8
'आणखी किती पुरावे हवेत ते सांगा'; कोकाटेंचे आणखी व्हिडीओ समोर, आव्हाड म्हणाले, "व्यवस्थित बघा,कुठला पत्ता"
9
महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!
10
'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
11
Deep Amavasya 2025: रिल्स करण्याच्या नादात चुकीचे पायंडे पाडू नका; दिव्यांची आवस 'अशी' करा!
12
IND vs ENG : 'ऑल इज वेल सीन'! विकेट किपिंगचा सराव करताना दिसला पंत (VIDEO)
13
Sonam Raghuvanshi : सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड?
14
२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य
15
वेळीच व्हा सावध! सोमवारीच का असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका? 'या' गोष्टी कारणीभूत
16
तुमच्या नावे कोणी बनावट लोन तर घेतलं नाहीये ना? घरबसल्या पॅन कार्डावरुन कसं तपासाल, दिसलं तर काय कराल?
17
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
18
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
19
सचिन पिळगावकरांनी घेतलेली मधुबालाची भेट, म्हणाले, "ती बाई जितकी सुंदर होती त्यापेक्षा १० पटीने..."
20
MBA ग्रॅज्युएट चोर; २० वर्षांत चोरल्या १०० हून अधिक आलिशान गाड्या, असा लागला पोलिसांच्या हाती

शेलूबाजार चौकातील वाहतुकीचे तीनतेरा

By admin | Updated: May 20, 2014 22:36 IST

वाहतुकीच्या कोंडीतून शेलुबाजार चौक अद्यापही बाहेर येऊ शकला नाही.

मंगरुळपीर: वाहतुकीच्या कोंडीतून शेलुबाजार चौक अद्यापही बाहेर येऊ शकला नाही. सुरळीत वाहतुकीसाठी नियुक्त केलेले कर्मचारीही चौकाऐवजी गावाबाहेरच खासगी प्रवासी वाहनं व अवजड वाहनांची तपासणी करण्यातच धन्यता मानत आहेत. अर्थात या सर्व घडोमोडी अर्थपूर्ण वाटाघाटीतून घडत असल्याचेही समोर येत आहे. एस टी च्या हक्काच्या जागेवर खुलेआम अतिक्रमन करणार्‍या वाहनाला अभय दिल्या जात असुन वाहतुक पोलीसांकडुन एस. टी. ला सावत्रपणाची वागणुक दिल्या जात आहे. एस टी महामंडळांने पोलीसांना निवेदन देवुन अवैध वाहतुकीला आळा घालण्याची मागणी केली आहे तालुक्यातील शेलूबाजार चौक दिवसेंदिवस संवेदनशिल बनत चालला आहे वारंवार वाहतुकीच्या कोंडीत अडकणार्‍या चौकाला बाहेर काढण्यासाठी वाहतुक शिपाई कमी पडत असल्याचे दिसून येते. चौकाऐवजी गावाबाहेर रस्त्यावर तपासणी होत असल्याने दिवसभर या चौकात वाहतुकीचा खेळखंडोबा पाहावयास मिळत आहे. वारंवार जाम होणार्‍या वाहतुकीमुळे आम आदमी पार वैतागुन गेले आहे.प् ादचारी, मुले,मुली वाहतुकीच्या सुळसुळाटमुळे त्रस्त होवुन गेले आहे. अकोला,मालेगांव,कारंजा, मंगरूळपीर या मार्गावर मोठया प्रमाणात अतिक्रमन वाढल्यामुळे भर रस्त्यावर दुचाकी वाहने सोडुन बाजारकरू फिरत असतात वाहतुकीस अडथळा निर्मान करणार्‍या वाहनावर कोणत्याच प्रकारची कारवाई का होत नाही असा सवाल उपस्थीत केल्या जात आहे. एका छोटयाशा चौकासाठी तीन शिपाई तैनात तरी सुध्दा वाहतुकीचा खेळखंडोबा का ? हा संशोधनाचा विषय आहे. गत दोनवर्षा पुर्वी जिल्हाधिकारी रामचंद्र कुळकर्णी यांनी चौकातील वाहनाचा बेशीस्तपणा पाहल्यानंतर पोलीसांना नो पार्कीग झोन निर्मान करण्याच्या सुचना दिल्या होत्या. मात्र त्या सुचनांचे पालन होतांना दिसत नाही. एस टी महामंडळाची हक्काची जागा वाहतुक पोलीसांनी खाजगी वाहतुकीकरिता राखीव ठेवल्याचे चित्र पहावयास मिळते. कारण एस टी थांब्याचे ठिकाणी बस थांबली तर त्यांना तेथून बस त्वरीत काढण्याचे फर्मान कर्तव्यावर असणारे शिपाई सोडतात. शेलूबाजार येथे बुधवार हा आठवडी बाजाराचा दिवस असल्यांने दिवसभर तीनही शिपाई कर्तव्यावर असणे आवश्यक आहे. मात्र वसुलीचा दिवस असल्यामुळे चौकाला वार्‍यावर सोडुन अकोला, कारंजा, मंगरूळपीर, मालेगाव रोडवर ड्युटी बजावतांना दिसतात. सकाळी ८ वाजता चौकात कर्तव्यावर येण्याच्या ठाणेदारांच्या सुचना असतांनाही उशीरा येणे, लवकरच घरचा रस्ता धरण्याच्या प्रकारामुळे चौकातील बाजारकरू नागरिक, महिला असुरक्षीत झाले आहेत. मागील आठवड्यात लग्न सराई असल्याने सकाळी १0 ते १२ वाजताचे सुमारास दोन ते अडीच तास वाहतुक जाम झाली असल्याचे चित्र पहावयास मिळाले. वरिष्ठानी याची दखल घेत एका शिपायाला ठाण्यात बोलवुन घेतले होते. पुढे काय झाले हे मात्र गुलदस्त्यात आहे. विस्कळीत वाहतुकीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.