शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

शेलूबाजार चौकातील वाहतुकीचे तीनतेरा

By admin | Updated: May 20, 2014 22:36 IST

वाहतुकीच्या कोंडीतून शेलुबाजार चौक अद्यापही बाहेर येऊ शकला नाही.

मंगरुळपीर: वाहतुकीच्या कोंडीतून शेलुबाजार चौक अद्यापही बाहेर येऊ शकला नाही. सुरळीत वाहतुकीसाठी नियुक्त केलेले कर्मचारीही चौकाऐवजी गावाबाहेरच खासगी प्रवासी वाहनं व अवजड वाहनांची तपासणी करण्यातच धन्यता मानत आहेत. अर्थात या सर्व घडोमोडी अर्थपूर्ण वाटाघाटीतून घडत असल्याचेही समोर येत आहे. एस टी च्या हक्काच्या जागेवर खुलेआम अतिक्रमन करणार्‍या वाहनाला अभय दिल्या जात असुन वाहतुक पोलीसांकडुन एस. टी. ला सावत्रपणाची वागणुक दिल्या जात आहे. एस टी महामंडळांने पोलीसांना निवेदन देवुन अवैध वाहतुकीला आळा घालण्याची मागणी केली आहे तालुक्यातील शेलूबाजार चौक दिवसेंदिवस संवेदनशिल बनत चालला आहे वारंवार वाहतुकीच्या कोंडीत अडकणार्‍या चौकाला बाहेर काढण्यासाठी वाहतुक शिपाई कमी पडत असल्याचे दिसून येते. चौकाऐवजी गावाबाहेर रस्त्यावर तपासणी होत असल्याने दिवसभर या चौकात वाहतुकीचा खेळखंडोबा पाहावयास मिळत आहे. वारंवार जाम होणार्‍या वाहतुकीमुळे आम आदमी पार वैतागुन गेले आहे.प् ादचारी, मुले,मुली वाहतुकीच्या सुळसुळाटमुळे त्रस्त होवुन गेले आहे. अकोला,मालेगांव,कारंजा, मंगरूळपीर या मार्गावर मोठया प्रमाणात अतिक्रमन वाढल्यामुळे भर रस्त्यावर दुचाकी वाहने सोडुन बाजारकरू फिरत असतात वाहतुकीस अडथळा निर्मान करणार्‍या वाहनावर कोणत्याच प्रकारची कारवाई का होत नाही असा सवाल उपस्थीत केल्या जात आहे. एका छोटयाशा चौकासाठी तीन शिपाई तैनात तरी सुध्दा वाहतुकीचा खेळखंडोबा का ? हा संशोधनाचा विषय आहे. गत दोनवर्षा पुर्वी जिल्हाधिकारी रामचंद्र कुळकर्णी यांनी चौकातील वाहनाचा बेशीस्तपणा पाहल्यानंतर पोलीसांना नो पार्कीग झोन निर्मान करण्याच्या सुचना दिल्या होत्या. मात्र त्या सुचनांचे पालन होतांना दिसत नाही. एस टी महामंडळाची हक्काची जागा वाहतुक पोलीसांनी खाजगी वाहतुकीकरिता राखीव ठेवल्याचे चित्र पहावयास मिळते. कारण एस टी थांब्याचे ठिकाणी बस थांबली तर त्यांना तेथून बस त्वरीत काढण्याचे फर्मान कर्तव्यावर असणारे शिपाई सोडतात. शेलूबाजार येथे बुधवार हा आठवडी बाजाराचा दिवस असल्यांने दिवसभर तीनही शिपाई कर्तव्यावर असणे आवश्यक आहे. मात्र वसुलीचा दिवस असल्यामुळे चौकाला वार्‍यावर सोडुन अकोला, कारंजा, मंगरूळपीर, मालेगाव रोडवर ड्युटी बजावतांना दिसतात. सकाळी ८ वाजता चौकात कर्तव्यावर येण्याच्या ठाणेदारांच्या सुचना असतांनाही उशीरा येणे, लवकरच घरचा रस्ता धरण्याच्या प्रकारामुळे चौकातील बाजारकरू नागरिक, महिला असुरक्षीत झाले आहेत. मागील आठवड्यात लग्न सराई असल्याने सकाळी १0 ते १२ वाजताचे सुमारास दोन ते अडीच तास वाहतुक जाम झाली असल्याचे चित्र पहावयास मिळाले. वरिष्ठानी याची दखल घेत एका शिपायाला ठाण्यात बोलवुन घेतले होते. पुढे काय झाले हे मात्र गुलदस्त्यात आहे. विस्कळीत वाहतुकीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.