शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
8
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
9
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
10
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
11
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
12
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
13
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
14
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
15
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
16
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
18
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
19
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
20
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात तिघाडा, वॉर्डात बिघाडा; इच्छुक उमेदवारांच्या आकांक्षांचा वाजला नगाडा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:45 IST

वाशिम : राज्य शासनाने नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी त्रिसदस्यीय प्रभाग रचना लागू केल्याने वाशिम शहरातील प्रभाग रचनाही पुन्हा बदलणार आहे. सध्या ...

वाशिम : राज्य शासनाने नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी त्रिसदस्यीय प्रभाग रचना लागू केल्याने वाशिम शहरातील प्रभाग रचनाही पुन्हा बदलणार आहे. सध्या दोन सदस्यीय प्रभाग असून, नव्या रचनेत ही संख्या वाढणार आहे. यामुळे इच्छुकांनी आतापर्यंत चालविलेल्या तयारीवर पाणी फेरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

स्थानिक नगरपालिकेत सध्या १३ प्रभाग आहेत. २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवक निवडण्यात आले होते; तर एका प्रभागातून तीन उमेदवार निवडण्यात आले. नगराध्यक्षाची निवड थेट जनतेतून होऊन नगराध्यक्षपदी शिवसेनेचे अशोक हेडा निवडून आले होते. पक्षीय बलाबल पाहता पालिकेत भाजपचे १५, शिवसेनेचे ८, काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन नगरसेवक आहेत.

.....................

पालिकेतील सध्याची स्थिती

वाशिम नगरपालिकेत सध्या शिवसेनेचे अशोक हेडा नगराध्यक्षपदी विराजमान आहेत. नगरसेवकांची संख्या २७ असून, दोन सदस्यीय प्रभागरचना असून, एका प्रभागातून तीन सदस्यांना गतवेळच्या निवडणुकीतून निवडून देण्यात आले होते.

.............

आता अशी असेल पालिकेतील स्थिती

राज्य शासनाच्या नव्या नियमामुळे वाशिम शहरातील प्रभागांच्या संख्येत वाढ होईल. त्यानुषंगाने दोन ते तीन नगरसेवकही वाढतील. आरक्षित आणि खुल्या वर्गाच्या जागांनुसार नव्याने प्रभाग रचना करावी लागणार आहे. एकूणच या सर्व बाबींमुळे इच्छुकांना नव्याने तयारी करावी लागणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

............

दोघांना द्यावे लागणार मत

एका मतदाराला प्रभागात दोन मते द्यावी लागणार आहेत. अर्थात दोघाजणांना निवडून द्यायचे असल्याने दोन उमेदवारांना मते द्यावी लागतील. गेल्या वेळी थेट नगराध्यक्ष निवड असल्यामुळे प्रभागातील दोन किंवा तीन उमेदवार आणि एक नगराध्यक्षाचे उमेदवार अशा तीन किंवा चार ठिकाणी मतदान करावे लागले होते. यामुळे मतदान यंत्रावर यावेळी उमेदवारांची गर्दी कमी राहणार आहे.

.............

शहर विकासाचे काय?

थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांची बांधिलकी ही संपूर्ण शहरासोबत असते. त्यामुळे सर्वच भागात त्यांना सारखा विकास व कामे करावी लागतात. प्रभाग पद्धतीत मात्र कुठल्याही एका प्रभागातून निवडून आलेला नगरसेवक नगराध्यक्ष होतो. त्यामुळे विरोधकांच्या प्रभागात कामांबाबत दुजाभाव केला जात असल्याचा आरोप नेहमीच होत असतो. हा प्रकार पुढेही घडल्यास शहर विकासाचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

...............

कोट :

गतवेळी झालेली प्रभागरचना योग्य होती. आगामी निवडणुकीत मात्र त्यात पुन्हा बदल करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्याला विशेष असा काहीच अर्थ नाही. भाजपचे उमेदवार नव्या प्रभाग पद्धतीनुसार निवडणुकीला सामोरे जातील.

- राहुल तुपसांडे, शहराध्यक्ष, भाजप

............

बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे उमेदवारांची डोकेदुखी वाढणार आहे. याशिवाय विकासकामांवरही विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गतवेळप्रमाणेच यंदाही एका प्रभागातून दोन उमेदवार हीच पद्धत कायम असायला हवी. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीला काॅंंग्रेसचा विरोध आहे.

- शंकर वानखेडे, शहराध्यक्ष, काॅंंग्रेस

..................

राज्य शासनाने घेतलेला निर्णय योग्यच आहे. बहुसदस्यीय प्रभाग रचना पद्धतीमुळे अधिकाधिक उमेदवार निवडणूक रिंगणात उतरू शकतील. यामुळे स्पर्धा वाढून निवडून आल्यानंतर प्रभागांचा विकासही झपाट्याने होणे शक्य आहे. नव्या नियमानुसार पक्षाचे उमेदवार तयारीला लागतील.

- शे. ताजू शे. मजीद, शहराध्यक्ष, राष्ट्रीय काॅंंग्रेस

.............

वाशिम शहरात दोनसदस्यीय प्रभाग रचना आहे. या पद्धतीनुसार गतवेळची निवडणूक झाली होती. आता बहुसदस्यीय प्रभाग पद्धत अमलात येणार असल्याने निश्चितपणे काही अडचणी जाणवतील; मात्र राज्य शासनाने घेतलेला हा निर्णय योग्यच आहे, असे माझे मत आहे.

- गजानन भांदुर्गे, शहरप्रमुख, शिवसेना