शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

नेतन्सा परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

By admin | Updated: January 11, 2016 01:47 IST

एक महिन्याच्या कालावधीमध्ये १४ शेतक-यांचे विविध साहित्य लंपास.

वाशिम: शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या नेतन्सा शेतशिवारात चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घालत एक महिन्याच्या कालावधीमध्ये १४ शेतकर्‍यांचे विविध साहित्य लंपास केले. पोलिसांनी कुठल्याही घटनेची चौकशी न केल्यामुळे पीडित शेतकर्‍यांनी ७ जानेवारीला पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्याकडे थेट आपली कैफियत मांडली आहे. नेतन्सा (ता. रिसोड, जि. वाशिम) शेतशिवारामध्ये गेल्या महिन्याभरात १४ चोरीची घटना घडल्या. यामध्ये शेतकर्‍यांच्या बैलजोड्या, मोटरपंप, स्प्रिंकलर साहित्य, नदीवरील इंजीन अशाप्रकारचे शेतीउपयोगी साहित्याचा समावेश आहे. शेतकर्‍यांनी शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी नोंदविल्या आहेत. नेतन्सा येथील ज्ञानबा चंद्रभान बाजड यांची बैलजोडी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. जगन विश्राम बाजड यांचे शेतातील बोअरवेलमधील मोटर, शिवाजी बाजड यांचे शेतातील नदिवरील इंजीन, विजय शंकर बाजड यांचे शेतामध्ये असलेल्या विहिरीतल मोटरपंप अज्ञात चोरट्याने लंपास केला. उर्वरित शेतकरी बबन नामदेव बाजड, गजानन तुळशिराम बाजड, सुजित भगवानराव बाजड, राजू जनार्धन बाजड, सुरेश ज्ञानबा बाजड, रामकिसन तुळशिराम बाजड, विजय बळिराम बाजड, पवन लक्ष्मण बाजड, गजानन नामदेव बाजड व नारायण नामदेव बाजड यांच्या शेतामधील स्प्रिंकलरचे साहित्य चोरीला गेल्याची तक्रार शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आली. दरम्यान, परिसरात चोर्‍यांचा घटनात वाढ झाली असून या घटनांना वेळीच घालणे गरजेचे झाले आहे. पोलीस अधीक्षकांनी याकडे लक्ष देऊन न्याय देण्याची मागणी शेतकर्‍यांनी निवेदनाद्वारे केली.