शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

ते करतात २० वर्षांपासून नागरिकांना मोफत पाणी पुरवठा

By admin | Updated: May 1, 2017 19:48 IST

वाशिम- मंगरुळपीर येथील औषध विक्रेते असलेले आसावा बंधू मागील २० वर्षांपासून स्वत:च्या खर्चाने लोकांना मोफत पाणी पुरवठा करीत आहेत.

बारामहिने पाणपोई: मंगरुळपीरच्या आसावा बंधूृंचा उपक्रम वाशिम: उन्हाळ्यात लोकांची तहान भागविणे, पाणपोई लावणे आदि उपक्र म अनेक सेवाभावी लोक राबवितात; परंतु मंगरुळपीर येथील औषध विक्रेते असलेले आसावा बंधू मागील २० वर्षांपासून स्वत:च्या खर्चाने लोकांना मोफत पाणी पुरवठा करतात, तसेच लोकांसाठी त्यांनी प्रतिष्ठाणासमोर बारमाही पाणपोई लावलेली आहे. मंगरुळपीर येथील नंदकिशोर आसावा आणि त्यांचे धाकटे बंधू राजेश उर्फ मुन्नाभाऊ आसावा यांचे औषध विक्रीचे दुकान आहे. गेली २५ वर्षांहून अधिक काळापासून ते हा व्यवसाय करीत आहेत. लोकांशी अतिशय चांगले संबंध राखणारे आणि मनमिळावू व्यक्ती म्हणून ते तालुकाभरात परिचीत आहेत. व्यावसायिक असले तरी, लोकांना सहकार्य करण्यात ते सदैव अग्रेसर असतात. त्यांचे वडिल स्व. रामविलास आसावा यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी सेवाभावी विचाराने जवळपास २० ते २२ वर्षांपूर्वी पाणपोई सुरू केली. यासाठी त्यांनी स्वत: नगर परिषदेची नळ जोडणी घेतली. या नळाच्या माध्यमातून मागील २२ वर्षांपासूनच ते परिसरातील लोकांना मोफत पाणी पुरवठा करतात. त्यांच्या या उपक्रमाचा लाभ अनेक कुटुंबांना होत आहे. विशेष म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांत नळाच्या पाणी पुरवठ्यात खंड पडल्यास ते टँकरने पाणी विकत घेऊन पाणपोईसाठी ठेवलेल्या माठांत भरतात. नित्य नियमाने या माठांची सफाई त्यांच्याकडून केली जाते. याच माठातील पाणी ते स्वत:ही पित असतात. कधीही कोणालाही त्यांनी नळाचे पाणी भरण्यापासून रोखले नाही किं वा कोणाकडूनही खर्चाची मागणी केली नाही. विशेष म्हणजे त्यांना प्रसिद्धीचा मुळीच मोह नसून, प्रसारमाध्यमांना माहिती देण्याचे ते आवर्जून टाळत असतात.