शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

विद्यार्थ्यांच्या ‘आधार’साठी पंचायत समिती स्तरावर मिळणार प्रत्येकी दोन मशिन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 17:56 IST

आधार नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्यात पंचायत समिती स्तरावर प्रत्येकी दोन मशिन दिल्या जाणार आहेत.

- संतोष वानखडेवाशिम : यंदा शाळांमधील विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपडेट करणे अत्यावश्यक असून, २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात ‘स्टुडंट पोर्टल’वर आधार विषयक नोंद केलेल्या विद्यार्थ्यांची संख्याच संच मान्यता करताना विचारात घेतली जाणार आहे. अद्याप आधार नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्यात पंचायत समिती स्तरावर प्रत्येकी दोन मशिन दिल्या जाणार आहेत.राज्यातील प्राथमिक ते माध्यमिक शाळांच्या संच मान्यतेची प्रक्रिया, ‘एनआयसी’मार्फत जिल्हास्तरावर शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत होत असते. या अनुषंगाने राज्याच्या शिक्षण विभागाने २०१९ -२० मध्ये ‘स्टुडंट पोर्टल’वर विद्यार्थी विषयक माहितीची नोंद करताना आधार क्रमांकाची नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. तथापि, गतवर्षी अनेक शाळांनी आधार क्रमांक अद्ययावत केले नसल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनात आले. चालू शैक्षणिक सत्रात प्रत्येक विद्यार्थ्याचे आधारकार्ड अद्ययावत करणे आणि आधारकार्ड नसणाºया विद्यार्थ्यांसाठी आधारकार्डची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. सध्या कोरोना विषाणू संसर्गामुळे वर्ग बंद आहेत. त्यामुळे तुर्तास तरी आधार क्रमांक अद्ययावत करणे किंवा विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्याची कार्यवाही बंद आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात शाळांच्या संच मान्यतेसाठी विद्यार्थ्यांची आधारविषयक माहिती ग्राह्य धरली जाणार आहे. कोरोनाच्या परिस्थितीत आधार कार्ड काढण्यासाठी विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्यातील प्रत्येक पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी स्तरावर दोन आधार मशिन पुरविण्यात येणार आहेत. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन आधार नोंदणी करण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाकडून शिक्षणाधिकाऱ्यांना मिळणार आहेत. विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीसाठी पंचायत समिती स्तरावर दोन आधार मशिन मिळणार आहेत. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन आधार नोंदणीविषयक सूचना वरिष्ठ स्तरावरून मिळणार आहेत.- अंबादास मानकरशिक्षणाधिकारी (प्राथमिक) वाशिम

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डwashimवाशिम