शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

सीबीएसई दहावीत यंदा एकही विद्यार्थी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:27 IST

वाशिम : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल बाेर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात सीबीएसईने आनंदाची बातमी दिली आहे. सीबीएसईच्या नव्या नियमानुसार विद्यार्थी ...

वाशिम : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल बाेर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात सीबीएसईने आनंदाची बातमी दिली आहे. सीबीएसईच्या नव्या नियमानुसार विद्यार्थी खराेखर गुणवान असेल तर आता त्याचं एक वर्ष वाया जाणार नाही. या निर्णयाबाबत पालकांची मते जाणून घेतली असता त्यांच्याकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.

जिल्ह्यात सीबीएसई पॅटर्नच्या एकूण ९ शाळा आहेत. यामध्ये एकूण ५०७ विद्यार्थी आहेत. काेराेनामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान हाेऊ नये याकरिता सीबीएसई बाेर्डाने घेतलेल्या निर्णयाबाबत पालकांशी चर्चा केली असता त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. जिल्ह्यात असलेल्या सीबीएसई पॅटर्न शाळांमध्ये सर्वाधिक ५ शाळा वाशिम शहरामध्ये आहेत.

.................

काय आहे नवीन नियम

सीबीएसई बोर्डाच्या निर्णयानुसार दहावीच्या परीक्षेत पास की नापास हे ठरविण्यासाठी परीक्षेच्या सर्व विषयांपैकी फक्त पाच विषय ज्यात सर्वाधिक गुण मिळाले आहेत, त्यांचा विचार केला जाईल. या पाच विषयांत पास म्हणजे दहावीत पास अशी व्यवस्था असेल. तसेच दहावीची परीक्षा देणाऱ्यांसाठी पर्यायी विषय म्हणून कौशल्य विकास अभ्यासक्रम असेल. यामुळे विद्यार्थी यांचा फायदा असल्याचे हॅपी फेसेस द कन्सेप्ट स्कूल, वाशिम प्राचार्य सिद्धार्थ चाैबे यांनी सांगितले.

.....................

पालकांच्या प्रतिक्रिया

सीबीएसई बाेर्डाने दहावीच्या परीक्षेत काेणीही विद्यार्थी नापास हाेणार नसल्याचे ऐकले आहे. असे असेल तर हा निर्णय चांगला आहे.

- माया गजानन टाले

काेराेनामुळे विद्यार्थी व्यवस्थित शिक्षण घेऊ शकले नाहीत. त्यांचे नुकसान हाेऊ नये याकरिता सीबीएसई बाेर्डाने सर्वच विद्यार्थी पासचा निर्णय उत्तम आहे.

- शिवाजी रामराव देशमुख,

पालक, कारंजा

आता दहावीत नापास होण्याची चिंता विसरा. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने एक मोठा निर्णय जाहीर केला असल्याचे ऐकले आहे. या निर्णयामुळे काेणत्याच विद्यार्थ्याचे नुकसान हाेणार नाही.

- सुमेघ श्रीपद तायडे, पालक, मालेगाव