शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

स्मशानभूमीसाठी जागा नाही

By admin | Updated: July 13, 2014 22:39 IST

स्मशानभूमी म्हणून आवश्यक असणार्‍या कोणत्याच सोयीसुविधा नसल्यामुळे लोकांची गैरसोय होत आहे.

रिसोड : तालुक्यातील लोणी खुर्द येथे स्मशानभूमीत मृतदेह जाळण्यासाठी आवश्यक असलेले शेड नसल्यामुळे उघड्यावर मृतदेह जाळले जातात. तसेच येथे स्मशानभूमी म्हणून आवश्यक असणार्‍या कोणत्याच सोयीसुविधा नसल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी गावातून व दुरवरच्या गावांमधून येणार्‍या लोकांची गैरसोय होत आहे. स्मशानभूमी शेडसाठी जागा उपलब्ध नसल्याची माहिती आहे. लोणी खुर्द व आसोला या दोन गावाची गटग्रामपंचायत आहे. लोणी खुर्द गावची लोकसंख्या एक हजाराच्या आसपास आहे. या गावात सर्वधर्मियबांधव गुण्यागोविंदाने नांदतात. येथे शासनाची ई क्लास जमिन आहे. मात्र, त्यावर अतिक्रमण झाल्याने आता इ-क्लास जमीन शिल्लक नाही. नेमके हेच कारण पुढे करून स्मशानभूमी शेडसाठी जागाच नाही, असे सांगितले जाते. स्मशानभूमी शेड उभारण्यात आलेले नसल्यामुळे गैरसोय होत आहे. अंत्ययात्रेत सहभागी होणार्‍या लोकांना बसण्यासाठी ओटे, पिण्यासाठी व पाय धुण्यासाठी नळ अथवा पाण्याच्या साठवणुकीची कोणतीही व्यवस्था नाही. मृतदेहावर उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागतात. पावसाळय़ाच्या दिवसात अंत्यसंस्कार करण्यासाठी एकतर पाउस थांबण्याची वाट पाहावी लागते; नाही तर मृतदेहावर आच्छादन म्हणून ताडपत्री किंवा अन्य काहीतरी धरुन अग्नी द्यावा लागतो. अशा स्थितीत अंत्यसंस्कारासाठी आधीच पोहोचविलेली लाकडे पावसाने भिजून ओली होतात. ती लवकर पेटत नाहीत. त्यामुळे मृतदेहाला अग्नी देताना अनेक अडचणी येतात. रात्रीच्या वेळेस पथदिवे किंवा दिव्यांची व्यवस्था नाही. त्यामुळे नागरिकांना बॅटरी, गॅसबत्ती यासारखी पर्यायी साधने नेऊन अंत्यसंस्काराचा विधी उरकावा लागतो. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देऊन जागा उपलब्ध करून देणे गरजेचे ठरत आहे.