शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
4
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
5
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
6
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
7
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
8
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
9
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
10
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
11
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
12
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
13
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
14
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
15
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
16
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
17
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
18
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
19
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
20
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी

वाशिम आगारातून रातराणी बससेवाच नाही

By admin | Updated: May 15, 2015 23:14 IST

प्रवाशांना घ्यावी लागते खाजगी बसेसकडे धाव.

शिखरचंद बागरेचा / वाशिम : राज्य परिवहन विभागाच्या वाशिम आगारातून जिल्हय़ातील नागरिक व प्रवाशांसाठी रातनानी बससेवा सुरु केलेली नसल्यामुळे प्रवाशांना खाजगी बसेसकडे धाव घ्यावी लागत असून अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. उन्हाळय़ाची सुटी व लग्नसराईची धूम असताना रातराणी बसेसचे अभावी राज्य परिवहन महामंडळाला तोटा सहन करावा लागत आहे. तर दुसरीकड खाजगी बससेवेसाठी दामदुप्पट प्रवास भाडे वसुल करुन मालकांची चांदी होत आहे. वाशिम जिल्हा अस्तित्वात आल्यानंतर सुमारे १७ वर्षाचा दीर्घकाळ लोटला असताना मुंबई, पुणे, नागपूर, जळगाव खांदेश, धुळे, नाशिक, सोलापूर, इंदोर, हैदराबाद, लातूर, पंढरपूर, त्र्यंबकेश्‍वर, भिमाशंकर, बारामती, सुरत आदी प्रमुख व महत्वपूर्ण शहरांसाठी वाशिम आगाराने जून पर्यंंत एकही निमआराम किंवा साधी व रातरानी बससेवा सुरु न करणे हे एक न उलगडणारे कोडे बस प्रवाशांना पडले आहे. उन्हाळय़ाची सुटी व लग्नसराईची धूम असल्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणार्‍यांची संख्या खूप वाढली असताना तसेच रेल्वेचे आरक्षण हाउस फुल्ल असताना सामान्य नागरिकांना बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रिद असणारी राज्य परिवहन महामंडळाची बस आपलीशी वाटते. मात्र नेमके या बाबीचा विसर पडलेल्या वाशिम आगाराने आपली उदासिनता झटकून राज्यातील प्रमुख व महत्वपूर्ण असलेल्या शहरांसाठी तातडीने रा तराणी बससेवा सुरु करण्याची गरज आहे. रातराणी बससेवा उपलब्ध नसलेले वाशिम आगार संपूर्ण राज्यात एकमेव असे आगार असल्याचा अपवाद आहे. या वाशिममार्गे सायंकाळी ७ वाजता मंगरुळपीर, पुणे रात्री १0 वाजता पांढरकवडा पुणे, रात्री १२ वाजताच्या सुमारास बुलडाणा नागपूर व शेगाव उदगीर या नंतर देगलूर अकोला या रातनाणी बसेस मागील अनेक वर्षापासून अविरत सुरु आहे. या सर्व बसेस वाशिम जिल्हाबाहेरील आगाराच्या आहेत. जिल्हा मुख्यालय असताना वाशिम आगाराची एकही रातनाणी बससेवा प्रवाशांसाठी उपलब्ध नसणे ही वाशिमची शोकांतिका समजावी का? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.