शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

ई-पाससाठी कारणं दोनच; रुग्णालय किंवा अंत्यसंस्कार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:07 IST

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १५ मेपर्यंत जिल्ह्यांतर्गत प्रवासावर कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना ...

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १५ मेपर्यंत जिल्ह्यांतर्गत प्रवासावर कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना अत्यावश्यक कारणासाठीच इतर जिल्ह्यांमध्ये जाता येत आहे. त्याकरिता नागरिकांना पोलिसांचा ई-पास घेणे आवश्यक आहे. ई-पाससाठी सध्या रुग्णालय किंवा अंत्यसंस्कार अशी दोनच कारणं जास्त प्रमाणावर दिली जात आहेत.

संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यात २३ ठिकाणी जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. बाहेर जिल्ह्यातून जिल्ह्यात येणाऱ्यांना ई-पासवर जिल्ह्यात प्रवेश देण्यात येतो. जिल्ह्याच्या सीमेवरील ६० ठिकाणी रस्ते संबंधित गावाच्या सहमतीने बंद करण्यात आले आहेत. ३० एप्रिलनंतर पुन्हा १५ दिवसांसाठी कडक निर्बंध करण्यात आले आहेत. त्यामुळे बाहेरच्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास बंधनकारक करण्यात आले आहे. त्यातही ई-पास मिळविण्यासाठी काही ठरावीक नियम घालून दिले आहेत. जवळच्या व्यक्तीचा मृत्यू (आई, वडील, भाऊ, बहीण, चुलत भाऊ-बहीण, दीर, मेहुणे) झाल्यास आणि कुणी गंभीर आजारी असल्यासच ई-पास दिला जातो. त्यासाठी नागरिकांनी नातेसंबंध व आजारपणाचा पुरावा बाळगणे आवश्यक आहे, अशा कारणांसाठी राज्यांतर्गत प्रवासासाठी पास देण्यात येतो. पोलिसांनी वेबसाइट तयार केली असून, त्यावर अर्ज करून ई-पास मिळवता येईल.

किती तासांत मिळतो ई-पास

ई-पाससाठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर साधारणत: दोन ते तीन तासांत पास उपलब्ध होतो.

ही कागदपत्रे हवीत

ई-पाससाठी कराव्या लागणाऱ्या अर्जासोबत तुम्हाला तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटोही जोडावा लागणार आहे. फोटोची साईज २०० केबीपेक्षा जास्त नसावी. फोटो ओळखपत्र म्हणून आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना आदी कागदपत्रे देता येऊ शकतात.

तीच ती कारणे

ई-पाससाठी रुग्णालयात जायचे आहे, हे कारण ठरलेले आहे, तर काही नागरिकांकडून अंत्यसंस्काराला जायचे आहे असे कारणसुद्धा देण्यात येते.

ई-पाससाठी असा करावा अर्ज

ई-पास हवा असलेल्या नागरिकांनी कोविड-१९ महापोलीसच्या वेबसाइटवर जाऊन ज्या ठिकाणाहून प्रवास करायचा आहे ते पोलीस आयुक्तालय अथवा जिल्हा पोलीस विभाग निवडावा. त्यानंतर स्वतःचे नाव, कोणत्या तारखेपासून प्रवास करायचा आहे ते लिहून, मोबाइल क्रमांक, प्रवासाचे कारण, वाहन क्रमांक, सध्याचा पत्ता, ई-मेल, प्रवास प्रारंभ ठिकाण ते अंतिम ठिकाण, सोबतच्या प्रवाशांची संख्या याची माहिती द्यावी. त्यानंतर स्वतःचा फोटो, आधार कार्ड, मेडिकल रिपोर्ट, कंपनीचे ओळखपत्र जोडावे. त्यानंतर सर्व कागदपत्रे तपासून त्या विभागाच्या पोलीस यंत्रणेकडून ई-पास दिला जाईल.