शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

महा अवयवदान अभियानाची जनजागृती थंडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 01:19 IST

वाशिम : राज्यभरात अवयवदान चळवळीला गती मिळावी, यासाठी शासन स्तरावरून ‘महा अवयवदान अभियान २0१७’ची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. मात्र, यासंदर्भातील जनजागृती केवळ धार्मिक उत्सवांमध्येच होताना दिसून येत असून, गठित करण्यात आलेल्या विविध समित्यांचे कार्यदेखील थंडावल्यामुळे अभियानाचा अपेक्षित प्रचार-प्रसार होणे कठीण झाले आहे. 

ठळक मुद्देप्रशासकीय उदासीनता प्रचार-प्रसाराला ब्रेक

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यभरात अवयवदान चळवळीला गती मिळावी, यासाठी शासन स्तरावरून ‘महा अवयवदान अभियान २0१७’ची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. मात्र, यासंदर्भातील जनजागृती केवळ धार्मिक उत्सवांमध्येच होताना दिसून येत असून, गठित करण्यात आलेल्या विविध समित्यांचे कार्यदेखील थंडावल्यामुळे अभियानाचा अपेक्षित प्रचार-प्रसार होणे कठीण झाले आहे. महा अवयवदान अभियानाबाबत १८ ऑगस्ट २0१७ रोजी अमरावती विभागीय महसूल आयुक्तांनी जिल्हा समित्यांसोबत ‘व्ही.सी.’व्दारे चर्चा करून अभियानाला गती देण्यासंदर्भात चोख नियोजन केले होते. त्यानंतर २३ ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकार्‍यांनीही जिल्हा समिती आणि तालुकाध्यक्षांसमवेत या अभियानाच्या अंमलबजावणीचे जिल्हा स्तरावरील नियोजन केले. मात्र, अभियानाची प्रभावी जनजागृती आणि चोख अंमलबजावणीबाबत प्रशासनाने अद्याप विशेष पुढाकार घेतलेला नाही. म्हणायला, गणेशोत्सवादरम्यान बोटावर मोजण्याइतपत गणेशोत्सव मंडळांनी चार-दोन बॅनर लावून अभियानाची जनजागृती करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. मात्र, तो निश्‍चितपणे पुरेसा नसल्याचे मत सुज्ञ नागरिकांमधून व्यक्त होत आहे. 

गणेशोत्सवामध्ये महा अवयवदानासंबंधी जनजागृती करण्याचे शासनाचे निर्देश होते. त्यानुसार, काही गणेश मंडळांना हाताशी धरून चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. त्यानंतर मात्र शासनाकडून जनजागृतीबाबत कुठलेच ठोस निर्देश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे जनजागृती थंडावली आहे.               - जनार्दन जांभरूणकरनिवासी वैद्यकीय अधिकारी, वाशिम