शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

तापमानात वाढ; फळबागांचे अस्तित्व धोक्यात!

By admin | Updated: February 2, 2016 01:57 IST

वाशिम जिल्हय़ात विविध रोगांचा प्रादुर्भाव.

वाशिम: गत तीन दिवसांपासून तापमानात वाढ होत असल्यामुळे फळबागांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. जिल्हय़ात मंगरूळपीर, मानोर्‍यासह अन्य तालुक्यांमध्ये डाळिंब, केळी, संत्रा, पपईच्या फळबागा आहेत. ओलिताची व्यवस्था असलेल्या शेतकर्‍यांनी हजारो हेक्टरवर या झाडांची पेरणी करण्यात आली आहे. यावर्षी पाऊस कमी असल्यामुळे आधीच पाण्याअभावी फळबागा संकटात सापडल्या होत्या. यावर्षी सुरुवातीपासूनच पाऊस कमी पडला. तसेच थंडीही पडली नाही. त्यातच गत तीन ते चार दिवसांपासून तापमानात अचानक वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंंत नेहमी थंड वातावरण असते; मात्र यावर्षी जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यातच तापमान वाढायला सुरुवात झाली आहे. सध्या दिवसा ३५ डिग्री सेल्सिअस तर रात्री १५ डिग्री सेल्सिअस तापमान आहे. गत आठ दिवसात दिवसाच्या तापमानात सात ते आठ डिग्रीने वाढ झाली आहे. त्यामुळे संत्रा, डाळिंब यासारख्या फळांवर विविध किडींचे व रोगांचे आक्रमण होण्याची शक्यता आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे फळांचा आकार कमी होणार आहे. तापमान जास्त असले तर फळांचा आकार वाढत नाही. तसेच उत्पादनातही घट येण्याची शक्यता आहे. यासोबत फळांना भेगा पडण्याला सुरुवात झाली आहे. डाळिंब व संत्रासारख्या फळांना तापमानात वाढ झाली तर भेगा पडतात. त्यामुळे फळातील रस कमी होऊन फळे सुकतात. तसेच फळांवर डागही पडतात. त्यामुळे फळे खराब होतात व बाजारात ग्राहक खरेदी करीत नाहीत. या वाढत्या तापमानामुळे फळबागाधारक शेतकरी त्रस्त झाले असून, यावर्षी त्यांना नुकसानाचा सामना करावा लागणार आहे. आधीच तीन वर्षांंंपासून सातत्याने कमी पाऊस पडत असल्यामुळे फळबागा सुकल्या आहेत. अनेक शेतकर्‍यांनी संत्रा व केळीच्या बागा कापल्या आहेत. यावर्षी आणखी फळबागा कमी होण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामातील जिल्हय़ातील गहू व हरभरा हे मुख्य पीक आहे. हजारो हेक्टरवर याची पेरणी करण्यात आली आहे; मात्र तापमानात वाढ झाल्यामुळे ही पिकेही धोक्यात आली आहे. सध्या हरभरा व गहू हे दाणे भरण्याच्या स्थितीत आहे; मात्र थंडी गायब झाल्याने दाणे भरण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होत असून, दाणे बारीक होतात. परिणामी बाजारात विक्रीला गेल्यावर चांगला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.