शहरं
Join us  
Trending Stories
1
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
2
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
3
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
4
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
5
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
6
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
7
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
8
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
9
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
10
दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
11
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
12
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
13
GT चं काही खरं नाही; तळाला असलेल्या CSK च्या बॅटर्संनी केला मोठा धमाका
14
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली
15
Tejashwi Yadav : “मला हे आवडत नाही आणि मी ते सहनही करू शकत नाही”; तेजस्वी यादव यांनी स्पष्टच सांगितलं
16
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
17
'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव
18
सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे
19
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
20
...ती पोस्ट नडली, तेजप्रताप यादव यांची RJDमधून हकालपट्टी, वडील लालूप्रसाद यादव यांनी केली कारवाई

तापमानात वाढ; फळबागांचे अस्तित्व धोक्यात!

By admin | Updated: February 2, 2016 01:57 IST

वाशिम जिल्हय़ात विविध रोगांचा प्रादुर्भाव.

वाशिम: गत तीन दिवसांपासून तापमानात वाढ होत असल्यामुळे फळबागांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. जिल्हय़ात मंगरूळपीर, मानोर्‍यासह अन्य तालुक्यांमध्ये डाळिंब, केळी, संत्रा, पपईच्या फळबागा आहेत. ओलिताची व्यवस्था असलेल्या शेतकर्‍यांनी हजारो हेक्टरवर या झाडांची पेरणी करण्यात आली आहे. यावर्षी पाऊस कमी असल्यामुळे आधीच पाण्याअभावी फळबागा संकटात सापडल्या होत्या. यावर्षी सुरुवातीपासूनच पाऊस कमी पडला. तसेच थंडीही पडली नाही. त्यातच गत तीन ते चार दिवसांपासून तापमानात अचानक वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंंत नेहमी थंड वातावरण असते; मात्र यावर्षी जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यातच तापमान वाढायला सुरुवात झाली आहे. सध्या दिवसा ३५ डिग्री सेल्सिअस तर रात्री १५ डिग्री सेल्सिअस तापमान आहे. गत आठ दिवसात दिवसाच्या तापमानात सात ते आठ डिग्रीने वाढ झाली आहे. त्यामुळे संत्रा, डाळिंब यासारख्या फळांवर विविध किडींचे व रोगांचे आक्रमण होण्याची शक्यता आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे फळांचा आकार कमी होणार आहे. तापमान जास्त असले तर फळांचा आकार वाढत नाही. तसेच उत्पादनातही घट येण्याची शक्यता आहे. यासोबत फळांना भेगा पडण्याला सुरुवात झाली आहे. डाळिंब व संत्रासारख्या फळांना तापमानात वाढ झाली तर भेगा पडतात. त्यामुळे फळातील रस कमी होऊन फळे सुकतात. तसेच फळांवर डागही पडतात. त्यामुळे फळे खराब होतात व बाजारात ग्राहक खरेदी करीत नाहीत. या वाढत्या तापमानामुळे फळबागाधारक शेतकरी त्रस्त झाले असून, यावर्षी त्यांना नुकसानाचा सामना करावा लागणार आहे. आधीच तीन वर्षांंंपासून सातत्याने कमी पाऊस पडत असल्यामुळे फळबागा सुकल्या आहेत. अनेक शेतकर्‍यांनी संत्रा व केळीच्या बागा कापल्या आहेत. यावर्षी आणखी फळबागा कमी होण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामातील जिल्हय़ातील गहू व हरभरा हे मुख्य पीक आहे. हजारो हेक्टरवर याची पेरणी करण्यात आली आहे; मात्र तापमानात वाढ झाल्यामुळे ही पिकेही धोक्यात आली आहे. सध्या हरभरा व गहू हे दाणे भरण्याच्या स्थितीत आहे; मात्र थंडी गायब झाल्याने दाणे भरण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होत असून, दाणे बारीक होतात. परिणामी बाजारात विक्रीला गेल्यावर चांगला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.