शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

तापमानात वाढ; फळबागांचे अस्तित्व धोक्यात!

By admin | Updated: February 2, 2016 01:57 IST

वाशिम जिल्हय़ात विविध रोगांचा प्रादुर्भाव.

वाशिम: गत तीन दिवसांपासून तापमानात वाढ होत असल्यामुळे फळबागांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. जिल्हय़ात मंगरूळपीर, मानोर्‍यासह अन्य तालुक्यांमध्ये डाळिंब, केळी, संत्रा, पपईच्या फळबागा आहेत. ओलिताची व्यवस्था असलेल्या शेतकर्‍यांनी हजारो हेक्टरवर या झाडांची पेरणी करण्यात आली आहे. यावर्षी पाऊस कमी असल्यामुळे आधीच पाण्याअभावी फळबागा संकटात सापडल्या होत्या. यावर्षी सुरुवातीपासूनच पाऊस कमी पडला. तसेच थंडीही पडली नाही. त्यातच गत तीन ते चार दिवसांपासून तापमानात अचानक वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंंत नेहमी थंड वातावरण असते; मात्र यावर्षी जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यातच तापमान वाढायला सुरुवात झाली आहे. सध्या दिवसा ३५ डिग्री सेल्सिअस तर रात्री १५ डिग्री सेल्सिअस तापमान आहे. गत आठ दिवसात दिवसाच्या तापमानात सात ते आठ डिग्रीने वाढ झाली आहे. त्यामुळे संत्रा, डाळिंब यासारख्या फळांवर विविध किडींचे व रोगांचे आक्रमण होण्याची शक्यता आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे फळांचा आकार कमी होणार आहे. तापमान जास्त असले तर फळांचा आकार वाढत नाही. तसेच उत्पादनातही घट येण्याची शक्यता आहे. यासोबत फळांना भेगा पडण्याला सुरुवात झाली आहे. डाळिंब व संत्रासारख्या फळांना तापमानात वाढ झाली तर भेगा पडतात. त्यामुळे फळातील रस कमी होऊन फळे सुकतात. तसेच फळांवर डागही पडतात. त्यामुळे फळे खराब होतात व बाजारात ग्राहक खरेदी करीत नाहीत. या वाढत्या तापमानामुळे फळबागाधारक शेतकरी त्रस्त झाले असून, यावर्षी त्यांना नुकसानाचा सामना करावा लागणार आहे. आधीच तीन वर्षांंंपासून सातत्याने कमी पाऊस पडत असल्यामुळे फळबागा सुकल्या आहेत. अनेक शेतकर्‍यांनी संत्रा व केळीच्या बागा कापल्या आहेत. यावर्षी आणखी फळबागा कमी होण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामातील जिल्हय़ातील गहू व हरभरा हे मुख्य पीक आहे. हजारो हेक्टरवर याची पेरणी करण्यात आली आहे; मात्र तापमानात वाढ झाल्यामुळे ही पिकेही धोक्यात आली आहे. सध्या हरभरा व गहू हे दाणे भरण्याच्या स्थितीत आहे; मात्र थंडी गायब झाल्याने दाणे भरण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होत असून, दाणे बारीक होतात. परिणामी बाजारात विक्रीला गेल्यावर चांगला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.