शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

तहसिलदारांनी घेतला आरोग्याचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:44 IST

००००० शेतकरी चेतना केंद्राचा अभाव वाशिम : गावस्तरावर शेतकऱ्यांना प्रशिक्षण तसेच योग्य शेती विषयक मार्गदर्शन मिळावे म्हणून शासनाकडून शेतकरी ...

०००००

शेतकरी चेतना केंद्राचा अभाव

वाशिम : गावस्तरावर शेतकऱ्यांना प्रशिक्षण तसेच योग्य शेती विषयक मार्गदर्शन मिळावे म्हणून शासनाकडून शेतकरी चेतना केंद्राची स्थापना केली जात आहे. कवठा येथे शेतकरी चेतना केंद्र मंजूर नसल्याने शेतकºयांची गैरसोय होणार आहे.

000

हराळ येथे तीन कोरोना रुग्ण

वाशिम : रिसोड तालुक्यातील हराळ येथे आणखी तीन जणांचा कोरोना चाचणी अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला. आरोग्य विभागातर्फे नागरिकांची तपासणी केली जात आहे.

००

तालुका क्रीडा संकुलाचा प्रश्न रखडला

वाशिम : क्रिडाप्रेमी युवकांना मैदानी खेळांसाठी हक्काची जागा उपलब्ध व्हावी, मालेगाव येथे तालुका क्रीडा संकुलही उभारले जावे, अशी मागणी वेळोवेळी करण्यात आली; मात्र क्रीडा संकुलाचे काम अद्यापही अपूर्णच आहे.

0000

शाळांमधील सुविधांकडे ग्रामपंचायतींचे दुर्लक्ष

वाशिम : १४ व १५व्या वित्त आयोगातून विकासविषयक कामांसोबतच शिक्षण आणि आरोग्य या दोन प्रमुख घटकांवर एकूण खर्चाच्या २५ टक्के रक्कम खर्च करण्याची तरतूद आहे. मात्र, मालेगाव तालुक्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये सुविधा पुरविण्यासाठी निधी खर्च करण्याकडे ग्रामपंचायतींचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.

0000

तामशी येथे तीन कोरोना रुग्ण

वाशिम : वाशिम तालुक्यातील तामशी येथे आणखी तीन जणांचा कोरोना चाचणी अहवाल २७ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.

००००

कारंजा येथे कोरोना चाचणी

वाशिम : कारंजा शहरात गर्दीच्या ठिकाणी कोरोना चाचणी करण्यात येत आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी, बाजारपेठेत सकाळच्या सुमारास गर्दी करू नये, मास्कचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले.

०००

विनामास्क आढळून आल्याने कारवाइ

वाशिम : दुचाकीवर विनामास्क आढळून येणाऱ्या ३५ जणांवर मंगळवारी शिरपूर पोलिसांनी दंडात्मक कारवाइ केली. कोरोना विषाणू संसगार्चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वाहनचालकांनी मास्क किंवा रूमालचा वापर करावा, अशा सूचना देण्यात आल्या.

००००

रोहयोंतर्गतची कामे उपलब्ध करा

वाशिम : महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेंतर्गतची राजुरा परिसरात सध्या रोजगाराची कामे उपलब्ध नाहीत. मजुरांना कामे उपलब्ध व्हावी म्हणून रोहयोंतर्गत कामे सुरू करावी अशी मागणी मजुरांनी सोमवारी केली.

00

बेलखेडा येथे जनजागृती

वाशिम : बेलखेडा ता. रिसोड येथे आणखी १२ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे मंगळवारी निष्पन्न झाले. कोरोनाबाबत आरोग्य विभाग व ग्रामपंचायतींद्वारे जनजागृती केली जात आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले.