शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:38 IST

गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. आता त्यांच्या मनात शाळेविषयी आवड निर्माण करण्यासाठी तसेच ...

गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. आता त्यांच्या मनात शाळेविषयी आवड निर्माण करण्यासाठी तसेच नियमित अभ्यासांचे धडे शिकविण्यासाठी शाळेतील वर्गशिक्षकांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे, परंतु अनेक शाळांमधील शिक्षक हे मुख्यालयी राहत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होत आहेत. शिक्षकांनी मुख्यालयी राहिल्यास विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अडचण जाणार नाही. पूर्वी ग्रामीण भागात शिक्षक हे मुख्यालयी राहत होते. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात समन्वय राहत होता. काही अडचणी असल्यास विद्यार्थी शिक्षकांच्या घरी जाऊन त्या सोडून घेत होते, परंतु मागील काही वर्षापासून अनेक शिक्षकांनी शहरात राहणे पसंत केल्यामुळे विद्यार्थ्यांना काही प्रश्न निर्माण झाले तर त्यांना दुसऱ्या दिवशी शिक्षक गावात येईपर्यंत वाट पाहावी लागत आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी ही बाब लक्षात घेत शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करावी, अशी मागणी पालकवर्गातून केली जात आहे.

-----------

नियंत्रण मिळविणार कोण?

रिसोड तालुक्यातील अनेक शाळांतील शिक्षकांनी आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी शहरात राहणे पसंत केले आहे, परंतु ज्या शाळेत ते शिक्षणाचे धडे शिकवत आहेत त्या विद्यार्थ्यांचे मात्र नुकसान होत आहे. त्यात ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये रस्ते खराब असल्यामुळे शिक्षकांना शाळेत जाण्यास उशीर होत असतो, परंतु शाळेतील मुख्याध्यापकांसह सर्वच शिक्षक अपडाऊन करत असल्यामुळे कोणीच यावर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न करीत नाहीत.

------------------

कोट : शिक्षकांनी मुख्यालयी राहणे आवश्यक आहे. त्यांना मुख्यालयी राहण्याच्या सूचना देण्यासाठी शाळा समितीने पुढाकार घ्यावा, तसेच पालकांनीही तक्रारी केल्यास यावर निश्चित उपाययोजना करता येतील.

- रमेश तांगडे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि.प. वाशिम