शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:38 IST

गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. आता त्यांच्या मनात शाळेविषयी आवड निर्माण करण्यासाठी तसेच ...

गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. आता त्यांच्या मनात शाळेविषयी आवड निर्माण करण्यासाठी तसेच नियमित अभ्यासांचे धडे शिकविण्यासाठी शाळेतील वर्गशिक्षकांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे, परंतु अनेक शाळांमधील शिक्षक हे मुख्यालयी राहत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होत आहेत. शिक्षकांनी मुख्यालयी राहिल्यास विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अडचण जाणार नाही. पूर्वी ग्रामीण भागात शिक्षक हे मुख्यालयी राहत होते. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात समन्वय राहत होता. काही अडचणी असल्यास विद्यार्थी शिक्षकांच्या घरी जाऊन त्या सोडून घेत होते, परंतु मागील काही वर्षापासून अनेक शिक्षकांनी शहरात राहणे पसंत केल्यामुळे विद्यार्थ्यांना काही प्रश्न निर्माण झाले तर त्यांना दुसऱ्या दिवशी शिक्षक गावात येईपर्यंत वाट पाहावी लागत आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी ही बाब लक्षात घेत शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करावी, अशी मागणी पालकवर्गातून केली जात आहे.

-----------

नियंत्रण मिळविणार कोण?

रिसोड तालुक्यातील अनेक शाळांतील शिक्षकांनी आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी शहरात राहणे पसंत केले आहे, परंतु ज्या शाळेत ते शिक्षणाचे धडे शिकवत आहेत त्या विद्यार्थ्यांचे मात्र नुकसान होत आहे. त्यात ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये रस्ते खराब असल्यामुळे शिक्षकांना शाळेत जाण्यास उशीर होत असतो, परंतु शाळेतील मुख्याध्यापकांसह सर्वच शिक्षक अपडाऊन करत असल्यामुळे कोणीच यावर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न करीत नाहीत.

------------------

कोट : शिक्षकांनी मुख्यालयी राहणे आवश्यक आहे. त्यांना मुख्यालयी राहण्याच्या सूचना देण्यासाठी शाळा समितीने पुढाकार घ्यावा, तसेच पालकांनीही तक्रारी केल्यास यावर निश्चित उपाययोजना करता येतील.

- रमेश तांगडे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि.प. वाशिम