शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
3
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
4
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
5
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
6
जातगणना : मॅजिक की मंडल?
7
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
8
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
9
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
10
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
11
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
12
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
13
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
14
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
15
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
16
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
17
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
18
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
19
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
20
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा

अशैक्षणिक कामांवर बहिष्कार टाकण्याच्या शिक्षकांच्या हालचाली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 20:39 IST

मालेगांव : - शिक्षण विभागाच्या आॅनलाइन धोरणामुळे तसेच अशैक्षणिक कामांमुळे मुख्याध्यापक व शिक्षक वैतागले असून, अशैक्षणिक कामांवर बहिष्कार टाकण्याच्या हालचाली शिक्षक संघटनांमधून सुरू झाल्याचे दिसून येते. 

ठळक मुद्देशिक्षण विभागाच्या आॅनलाइन धोरणामुळे मुख्याध्यापक व शिक्षक वैतागले अध्यापनावर त्याचा थेट परिणाम होत असल्याचा दावा 

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगांव : - शिक्षण विभागाच्या आॅनलाइन धोरणामुळे तसेच अशैक्षणिक कामांमुळे मुख्याध्यापक व शिक्षक वैतागले असून, अशैक्षणिक कामांवर बहिष्कार टाकण्याच्या हालचाली शिक्षक संघटनांमधून सुरू झाल्याचे दिसून येते. शालेय पोषण आहार, हजेरी टपा नोंद, उपस्थिती भत्ता, विविध शिष्यवृत्ती अर्ज, शालार्थ, नवोदय परीक्षा, गणवेश, संच मान्यता, सरल, शाळा सोडण्याचा दाखला यासह एकूण २५ प्रकारची कामे आता शिक्षक वर्गावर आली आहेत. त्यामुळे एकूण अध्यापनावर त्याचा थेट परिणाम होत असल्याचा दावा मुख्याध्यापक व शिक्षक संघटनांनी केला. अनेक वेळा आर्थिक भुर्दंडसुद्धा सहन करावा लागतो. वेळेचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. आॅनलाईन प्रक्रिया किंवा अन्य अशैक्षणिक कामे पूर्ण करण्याची कोणतीही सुविधा शाळास्तरावर शासनाने उपलब्ध करून दिली नाही. त्यासाठी नेहमी तालुका ठिकाणी जावे लागते. यामध्ये वेळेचा व पैशाचा अपव्यय होत आहे. एका दिवसात काम झाले नाही तर दुसºया दिवशी पुन्हा तालुका ठिकाणी जावे लागते. मग विद्यार्थ्यांना शिकवावे कधी? असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला आहे. बरेच वेळा अनेक निरोप ‘व्हाट्स अप’च्या माध्यमातून मिळतात. या निरोपानुसार, एखादी माहिती तातडीने त्या-त्या कार्यालयात जमा करा, अशा सूचना मिळतात. एखाद्यावेळी अध्यापन सुरू असताना ‘व्हाट्स अप’चा संदेश बघण्यात आला नाही तर वरिष्ठांकडून तंबीही दिली जाते. यामुळे सध्या मानसिक तणावाखाली असल्याचा दावा शिक्षक व मुख्याध्यापक संघटनांनी केला.यासाठी शिक्षक संघटना मिळून सर्वांनी  एकत्र येऊन लढ़ा देण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे. अशैक्षणिक कामे काढून घ्यावी, आॅनलाईन किंवा संगणकीय कामासाठी तालुकास्तरावर जाण्याकरिता एका विशिष्ट कर्मचाºयाची नियुक्ती करावी, पत्र व्यवहारसाठी ‘व्हाट्स अप’ची सक्ती करू नये आदी मागण्या शिक्षक संघटनांनी शिक्षण विभागाकडे केल्या आहेत.

सध्या शिक्षक आणि मुख्याध्यापकांवर अशैक्षणिक तसेच आॅनलाईन कामाचा प्रचंड ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे आमचे शिक्षक बांधव चिंतेच्या सावटाखाली राहतात. शासनाने आॅनलाइनची कामे त्रयस्त व्यक्तींकडून करुन घ्यावी. यासाठी सर्व शिक्षक संघटनांनी एकत्र येण्याची गरज आहे.- मंचकराव तायडे, राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना