शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अशैक्षणिक कामांवर बहिष्कार टाकण्याच्या शिक्षकांच्या हालचाली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 20:39 IST

मालेगांव : - शिक्षण विभागाच्या आॅनलाइन धोरणामुळे तसेच अशैक्षणिक कामांमुळे मुख्याध्यापक व शिक्षक वैतागले असून, अशैक्षणिक कामांवर बहिष्कार टाकण्याच्या हालचाली शिक्षक संघटनांमधून सुरू झाल्याचे दिसून येते. 

ठळक मुद्देशिक्षण विभागाच्या आॅनलाइन धोरणामुळे मुख्याध्यापक व शिक्षक वैतागले अध्यापनावर त्याचा थेट परिणाम होत असल्याचा दावा 

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगांव : - शिक्षण विभागाच्या आॅनलाइन धोरणामुळे तसेच अशैक्षणिक कामांमुळे मुख्याध्यापक व शिक्षक वैतागले असून, अशैक्षणिक कामांवर बहिष्कार टाकण्याच्या हालचाली शिक्षक संघटनांमधून सुरू झाल्याचे दिसून येते. शालेय पोषण आहार, हजेरी टपा नोंद, उपस्थिती भत्ता, विविध शिष्यवृत्ती अर्ज, शालार्थ, नवोदय परीक्षा, गणवेश, संच मान्यता, सरल, शाळा सोडण्याचा दाखला यासह एकूण २५ प्रकारची कामे आता शिक्षक वर्गावर आली आहेत. त्यामुळे एकूण अध्यापनावर त्याचा थेट परिणाम होत असल्याचा दावा मुख्याध्यापक व शिक्षक संघटनांनी केला. अनेक वेळा आर्थिक भुर्दंडसुद्धा सहन करावा लागतो. वेळेचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. आॅनलाईन प्रक्रिया किंवा अन्य अशैक्षणिक कामे पूर्ण करण्याची कोणतीही सुविधा शाळास्तरावर शासनाने उपलब्ध करून दिली नाही. त्यासाठी नेहमी तालुका ठिकाणी जावे लागते. यामध्ये वेळेचा व पैशाचा अपव्यय होत आहे. एका दिवसात काम झाले नाही तर दुसºया दिवशी पुन्हा तालुका ठिकाणी जावे लागते. मग विद्यार्थ्यांना शिकवावे कधी? असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला आहे. बरेच वेळा अनेक निरोप ‘व्हाट्स अप’च्या माध्यमातून मिळतात. या निरोपानुसार, एखादी माहिती तातडीने त्या-त्या कार्यालयात जमा करा, अशा सूचना मिळतात. एखाद्यावेळी अध्यापन सुरू असताना ‘व्हाट्स अप’चा संदेश बघण्यात आला नाही तर वरिष्ठांकडून तंबीही दिली जाते. यामुळे सध्या मानसिक तणावाखाली असल्याचा दावा शिक्षक व मुख्याध्यापक संघटनांनी केला.यासाठी शिक्षक संघटना मिळून सर्वांनी  एकत्र येऊन लढ़ा देण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे. अशैक्षणिक कामे काढून घ्यावी, आॅनलाईन किंवा संगणकीय कामासाठी तालुकास्तरावर जाण्याकरिता एका विशिष्ट कर्मचाºयाची नियुक्ती करावी, पत्र व्यवहारसाठी ‘व्हाट्स अप’ची सक्ती करू नये आदी मागण्या शिक्षक संघटनांनी शिक्षण विभागाकडे केल्या आहेत.

सध्या शिक्षक आणि मुख्याध्यापकांवर अशैक्षणिक तसेच आॅनलाईन कामाचा प्रचंड ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे आमचे शिक्षक बांधव चिंतेच्या सावटाखाली राहतात. शासनाने आॅनलाइनची कामे त्रयस्त व्यक्तींकडून करुन घ्यावी. यासाठी सर्व शिक्षक संघटनांनी एकत्र येण्याची गरज आहे.- मंचकराव तायडे, राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना