शहरं
Join us  
Trending Stories
1
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
2
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
3
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
4
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
5
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
6
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
7
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
8
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
9
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
10
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
11
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
12
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
14
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
15
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
16
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
17
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
18
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
19
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
20
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!

टँकरचा प्रस्ताव लालफितशाहीत !

By admin | Updated: May 21, 2017 13:47 IST

पाणी टंचाईची तिव्रता वाढलेली असतानाही टँकरच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली नाही.

राजूर : येथील पाणी टंचाईची तिव्रता वाढलेली असतानाही, अद्याप टँकरच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली नाही. किरकोळ त्रूटी असल्याचे कारण समोर करून हा प्रस्ताव गत तीन महिन्यांपासून प्रशासन दरबारी पडून आहे. दरम्यान, टँकरद्वारे तातडीने राजूरा येथे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी मालेगाव तहसिलदारांकडे शनिवारी केली. गत काही वर्षांपासून राजूरा येथील तीव्र पाणीटंचाई लक्षात घेता मार्च महिन्यापासून टँकरने पाणीपुरवठा केला जातो. यावर्षी मे महिना संपत आला तरी टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला नाही. गावात जलस्त्रोत नसल्याने दूरवरून गावकऱ्यांना पाणी आणावे लागत आहे. रात्री-अपरात्री जागून पिण्याचे व वापराचे पाणी आणण्यसाठी लहान बालकांपासून ते आबालवृद्धांना कसरत करावी लागत आहे. मिळेल त्या ठिकाणावरून पाणी आणण्यासाठी गावकऱ्यांची पायपीट सुरू आहे. ग्रामपंचायत  प्रशासनाचेवतीने टँकरचा प्रस्ताव तहसीलकडे दाखल करण्यात आला. मात्र या प्रस्तावात त्रूटी असल्याचे कारण देत हा प्रस्ताव गत तीन महिन्यांपासून धुळ खात पडला आहे. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते मनिष दत्तराव मोहळे, यशवंत हिवराळे, शिवा वामनराव खराटे यांनी मालेगावचे तहसिलदार राजेश वजीरे यांची २० मे रोजी भेट घेवून पाणी समस्या कथन केली. सोबतच गावाला तत्काळ टँकरव्दारा पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. यावेळी तहसिलदार वजीरे यांनी उपस्थितांसमक्ष वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयाशी भ्रमणध्वनीव्दारे संपर्क साधून राजूरा येथील टँकरचा प्रस्तावाबाबत माहिती घेतली. येत्या सोमवार किंवा मंगळवारपर्यंत टँकरचा प्रश्न मार्गी  लावू, अशी ग्वाही वजीरे यांनी शिस्टमंडळाला दिली.