शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

टँकरचा प्रस्ताव लालफितशाहीत !

By admin | Updated: May 21, 2017 13:47 IST

पाणी टंचाईची तिव्रता वाढलेली असतानाही टँकरच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली नाही.

राजूर : येथील पाणी टंचाईची तिव्रता वाढलेली असतानाही, अद्याप टँकरच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली नाही. किरकोळ त्रूटी असल्याचे कारण समोर करून हा प्रस्ताव गत तीन महिन्यांपासून प्रशासन दरबारी पडून आहे. दरम्यान, टँकरद्वारे तातडीने राजूरा येथे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी मालेगाव तहसिलदारांकडे शनिवारी केली. गत काही वर्षांपासून राजूरा येथील तीव्र पाणीटंचाई लक्षात घेता मार्च महिन्यापासून टँकरने पाणीपुरवठा केला जातो. यावर्षी मे महिना संपत आला तरी टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला नाही. गावात जलस्त्रोत नसल्याने दूरवरून गावकऱ्यांना पाणी आणावे लागत आहे. रात्री-अपरात्री जागून पिण्याचे व वापराचे पाणी आणण्यसाठी लहान बालकांपासून ते आबालवृद्धांना कसरत करावी लागत आहे. मिळेल त्या ठिकाणावरून पाणी आणण्यासाठी गावकऱ्यांची पायपीट सुरू आहे. ग्रामपंचायत  प्रशासनाचेवतीने टँकरचा प्रस्ताव तहसीलकडे दाखल करण्यात आला. मात्र या प्रस्तावात त्रूटी असल्याचे कारण देत हा प्रस्ताव गत तीन महिन्यांपासून धुळ खात पडला आहे. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते मनिष दत्तराव मोहळे, यशवंत हिवराळे, शिवा वामनराव खराटे यांनी मालेगावचे तहसिलदार राजेश वजीरे यांची २० मे रोजी भेट घेवून पाणी समस्या कथन केली. सोबतच गावाला तत्काळ टँकरव्दारा पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. यावेळी तहसिलदार वजीरे यांनी उपस्थितांसमक्ष वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयाशी भ्रमणध्वनीव्दारे संपर्क साधून राजूरा येथील टँकरचा प्रस्तावाबाबत माहिती घेतली. येत्या सोमवार किंवा मंगळवारपर्यंत टँकरचा प्रश्न मार्गी  लावू, अशी ग्वाही वजीरे यांनी शिस्टमंडळाला दिली.