शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

न्यायालयाच्या आदेशानुसार शिरपूर विकास आराखड्यावर कारवाइ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:28 IST

शिरपूर जैन : उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जनहित याचिका निकाली काढताना शिरपूर जैन येथील अतिक्रमण निर्मूलन करून विकास आराखडा ...

शिरपूर जैन : उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जनहित याचिका निकाली काढताना शिरपूर जैन येथील अतिक्रमण निर्मूलन करून विकास आराखडा तयार करण्याचे आदेश विविध विभागांना दिले होते. याप्रकरणी आतापर्यंत काय कारवाई करण्यात आली यासाठी १३ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण बैठक घेतली. यावेळी न्यायालयाच्या आदेशानुसार शिरपूर विकास आराखड्यावर कारवाई करा, असे निर्देश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिले.

या बैठकीमध्ये ग्रामसचिव, सरपंच ते जिल्हा पोलीस अधीक्षकांपर्यंत विविध विभागांतील अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. बैठकीमध्ये जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमण निर्मूलन करून विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना ग्रामपंचायत व संबंधित विभागाला दिल्या. शिरपूर जैन या गावाला पर्यटन क्षेत्राचा ब दर्जा प्राप्त आहे. गावात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले. अतिक्रमण काढून पर्यटक व नागरिकांची अडचण दूर करावी, अशी जनहित याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात माजी जिल्हा परिषद सदस्य मोहम्मद इमदाद बागवान यांनी २०१७ मध्ये दाखल केली होती. ही याचिका फेब्रुवारी २०१८ मध्ये निकाली काढताना न्यायालयाने गावातील अतिक्रमण काढून गावचा झोन प्लॅन व विकास आराखडा तात्काळ तयार करा, असे आदेश दिले होते. मात्र, प्रशासनाने काही प्रमाणात अतिक्रमण काढले. झोन प्लॅन व विकास आराखडा तयार करण्याकडे दुर्लक्ष केले होते. याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी १३ जुलै रोजी संबंधित सर्व यंत्रणांची बैठक घेतली. झोन प्लॅन तयार करून विकास आराखड्यासंदर्भात केलेल्या कारवाईबाबत आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी यावेळी न्यायालयाच्या आदेशानुसार शिरपूर येथील रस्त्यांची मोजणी करून अतिक्रमण हटवावे व खाजगी आर्किटेक्ट नेमून विकास आराखडा तयार करावा, असे निर्देश ग्रामपंचायतीसह संबंधित विभागाला दिल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी भागवत भुरकाडे यांनी दिली.

००००

बॉक्स

पुन्हा न्यायालयात जाण्याचा इशारा

फेब्रुवारी २०१८ मध्ये न्यायालयाने इमदाद बागवान यांची जनहित याचिका निकाली काढताना गावातील अतिक्रमण काढून विकास आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी प्रशासनाने काही प्रमाणात अतिक्रमण काढले. मात्र, विकास आराखडा अद्यापही तयार केला किंवा नाही हे गुलदस्त्यातच आहे. आता तर गावात पूर्वीपेक्षाही अधिक अतिक्रमण वाढले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार विकास आराखडा तयार न केल्यास पुन्हा न्यायालयात जाणार असल्याचे याचिकाकर्ते बागवान यांनी सांगितले.