शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

न्यायालयाच्या आदेशानुसार शिरपूर विकास आराखड्यावर कारवाइ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:28 IST

शिरपूर जैन : उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जनहित याचिका निकाली काढताना शिरपूर जैन येथील अतिक्रमण निर्मूलन करून विकास आराखडा ...

शिरपूर जैन : उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जनहित याचिका निकाली काढताना शिरपूर जैन येथील अतिक्रमण निर्मूलन करून विकास आराखडा तयार करण्याचे आदेश विविध विभागांना दिले होते. याप्रकरणी आतापर्यंत काय कारवाई करण्यात आली यासाठी १३ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण बैठक घेतली. यावेळी न्यायालयाच्या आदेशानुसार शिरपूर विकास आराखड्यावर कारवाई करा, असे निर्देश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिले.

या बैठकीमध्ये ग्रामसचिव, सरपंच ते जिल्हा पोलीस अधीक्षकांपर्यंत विविध विभागांतील अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. बैठकीमध्ये जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमण निर्मूलन करून विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना ग्रामपंचायत व संबंधित विभागाला दिल्या. शिरपूर जैन या गावाला पर्यटन क्षेत्राचा ब दर्जा प्राप्त आहे. गावात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले. अतिक्रमण काढून पर्यटक व नागरिकांची अडचण दूर करावी, अशी जनहित याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात माजी जिल्हा परिषद सदस्य मोहम्मद इमदाद बागवान यांनी २०१७ मध्ये दाखल केली होती. ही याचिका फेब्रुवारी २०१८ मध्ये निकाली काढताना न्यायालयाने गावातील अतिक्रमण काढून गावचा झोन प्लॅन व विकास आराखडा तात्काळ तयार करा, असे आदेश दिले होते. मात्र, प्रशासनाने काही प्रमाणात अतिक्रमण काढले. झोन प्लॅन व विकास आराखडा तयार करण्याकडे दुर्लक्ष केले होते. याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी १३ जुलै रोजी संबंधित सर्व यंत्रणांची बैठक घेतली. झोन प्लॅन तयार करून विकास आराखड्यासंदर्भात केलेल्या कारवाईबाबत आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी यावेळी न्यायालयाच्या आदेशानुसार शिरपूर येथील रस्त्यांची मोजणी करून अतिक्रमण हटवावे व खाजगी आर्किटेक्ट नेमून विकास आराखडा तयार करावा, असे निर्देश ग्रामपंचायतीसह संबंधित विभागाला दिल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी भागवत भुरकाडे यांनी दिली.

००००

बॉक्स

पुन्हा न्यायालयात जाण्याचा इशारा

फेब्रुवारी २०१८ मध्ये न्यायालयाने इमदाद बागवान यांची जनहित याचिका निकाली काढताना गावातील अतिक्रमण काढून विकास आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी प्रशासनाने काही प्रमाणात अतिक्रमण काढले. मात्र, विकास आराखडा अद्यापही तयार केला किंवा नाही हे गुलदस्त्यातच आहे. आता तर गावात पूर्वीपेक्षाही अधिक अतिक्रमण वाढले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार विकास आराखडा तयार न केल्यास पुन्हा न्यायालयात जाणार असल्याचे याचिकाकर्ते बागवान यांनी सांगितले.