शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

प्रमुख पक्षांची स्वबळाची हाक!

By admin | Updated: October 22, 2016 02:30 IST

वाशिम जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर आघाड्या किंवा युतीबाबत अनिश्‍चितता असून इच्छुक उमेदवारही संभ्रमात आहे.

वाशिम, दि. २१- जिल्ह्यातील तीनही नगर परिषदेच्या निवडणुकीत अद्याप प्रमुख पक्षांची युती अथवा आघाडी झाली नसून, प्रत्येकाने स्वबळाची तयारी चालविली आहे. प्रमुख पक्षांची युती अथवा आघाडी होणार की नाही, याबाबत इच्छुक उमेदवारही संभ्रमात असल्याचे दिसून येते.जिल्ह्यातील वाशिम, कारंजा व मंगरुळपीर नगर परिषदेचा पाच वर्षांंंचा कार्यकाळ डिसेंबर २0१६ मध्ये संपणार असल्याने येत्या २७ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रत्येक प्रमुख पक्षाने युती अथवा आघाडीकडे लक्ष न देता स्वबळावर इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. गत विधानसभा निवडणुकीत प्रत्येक पक्षाच्या युती-आघाडीतील घटस्फोटामुळे राजकीय समीकरणं पार बदलून गेली आहेत.विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रत्येक प्रमुख राजकीय पक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरला होता. हाच धागा पकडून आता नगर परिषदेच्या निवडणुकीतही प्रमुख पक्ष स्वबळावर निवडणुकीची हाक देत असल्याने ह्यराजकारणह्ण चांगलेच तापले असल्याचे दिसून येते.गत पंच वार्षिकमध्ये वाशिम नगर परिषदेवर आमदार राजेंद्र पाटणीप्रणित जिल्हा विकास आघाडी व राकाँ युती, मंगरुळपीर नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि कारंजा नगर परिषदेवर भाजपाचे नरेंद्र गोलेच्छाप्रणित आघाडीची सत्ता होती. दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने गतवेळची समीकरणे यावेळी पूर्णत: बदलली असल्याचे दिसून येते. बदललेली समीकरणे पाहता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, भारिप-बमसं व स्थानिक आघाड्यांसाठी नगर परिषदेची निवडणूक मोठी कसरत ठरणारी आहे. सर्वाधिक चुरस वाशिम नगर परिषद निवडणुकीत होण्याचा अंदाज वर्तविला जात असून, प्रमुख पक्षांनी इच्छुकांच्या चाचपणीचा सपाटा लावला आहे. वाशिम येथे नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गासाठी आहे. येथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा व शिवसेना या चार प्रमुख पक्षांनी अद्याप युती अथवा आघाडीसाठी मित्रपक्षांशी बोलणी झाली नसल्याची माहिती आहे. स्वत:ची राजकीय शक्ती दाखवून देण्याच्या नावाखाली प्रत्येक पक्षाने जातीय समीकरण व एक गठ्ठा मतदानावर डोळा ठेवल्याचे दिसून येते. तीनही ठिकाणी उमेदवारांची चाचपणी प्रत्येक पक्षाकडून सुरू असल्याने, अद्याप कोणत्याही पक्षाने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केला नाही. विरोधकांपेक्षा स्वकीयाकडूनच ऐनवेळेवर जास्त दगाबाजी नको म्हणून अंतर्गत गटबाजी व असंतुष्टांवर प्रत्येकजण बारीक नजर ठेवून आहे. जिल्ह्यातील राजकीय स्थितीचा विचार केल्यास, येथे प्रत्येक पक्षाला कमी-अधिक प्रमाणात गटबाजीचा डाग लागल्याचे दिसून येते. अंतर्गत गटबाजी शमविण्याबरोबरच असंतुष्टांना संतुष्ट करण्याची कसरत प्रमुख पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना करावी लागणार आहे. प्रत्येक पक्ष स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरला असल्याने चुरस निर्माण झाल्याचे दिसून येते. प्रत्येक पक्षाने स्वबळाची हाक दिल्याने इच्छुक उमेदवारही संभ्रमात असून, ऐनवेळी युती झाली, तर कुणाचे तिकीट कापले जाणार? या शक्यतेने इच्छुकांमध्ये तर्कवितर्क लढविले जात आहेत.