शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

प्रलंबित प्रश्नांचा गुंता सुटता सुटेना !

By admin | Updated: July 1, 2015 01:49 IST

वाशिम जिल्हा निर्मितीला १७ वर्षे पूर्ण ; सिंचन अनुशेष नऊ हजारांवर, अनेक कार्यालये अकोल्यातच.

संतोष वानखडे / वाशिम : वाशिम जिल्हा अस्तित्वात येऊन तब्बल १७ वर्षांंचा कालावधी १ जुलैला पूर्ण होत आहे. तथापि, एमआयडीसी, सिंचन, शिक्षण, आरोग्य, स्वतंत्र शासकीय कार्यालय, उड्डाणपूल, बायपास, जिल्हा मध्यवर्ती बँक, एकबुर्जी प्रकल्पाची उंची, पर्यटन आदी प्रमुख प्रश्नांचा निपटारा या १७ वर्षांंतही होऊ शकला नाही.३0 जून १९९८ पर्यंंत अकोला जिल्ह्यातील एक तालुका म्हणून वाशिमचा समावेश होता. वाशिम जिल्ह्याची मागणी जोर धरू लागल्याने युती शासनाने याबाबत सकारात्मक विचार केला. १ जुलै १९९८ रोजी सर्वांंगीण विकासाच्या दृष्टिकोनातून वाशिमला स्वतंत्र जिल्ह्याची ओळख मिळाली. स्वतंत्र जिल्हा झाल्याने जिल्हावासीयांच्या सर्वांगीण विकासाबाबतच्या अपेक्षा उंचावणे साहजिकच आहे; मात्र या अपेक्षांची फलश्रुती १७ वर्षांंच्या दीर्घ कालावधीतही समाधानकारक होऊ शकली नसल्याचे वास्तव आहे. सुरुवातीला विविध अडचणी, गैरसोयीतून जिल्ह्याची वाटचाल झाली. हळूहळू विकास होत गेला; मात्र या विकासाने १७ वर्षांंतही समाधानकारक बाळसे धरले नाही. औद्योगिकीकरणाच्या दृष्टिकोनातून वाशिम जिल्ह्याची पाटी कोरीच आहे. प्रशासनाची दिरंगाई आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळे जिल्ह्यातील एमआयडीसी एरिया भकास आहे. जिल्ह्यात मोठे तर सोडा; लहान उद्योगधंदेही उभे राहू शकले नाहीत. वाशिम, मालेगाव, मंगरुळपीर, कारंजा व मानोरा येथील एमआयडीसी क्षेत्रांना उद्योगधंद्यांची प्रतीक्षा आहे, तर रिसोड येथे एमआयडीसीचे क्षेत्रच नाही. शैक्षणिक क्षेत्राचा विचार केला, तर अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालय जिल्ह्यात नाही. उच्च शिक्षणाची सुविधा नसल्याने पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूरचा रस्ता जिल्ह्यातील विद्यार्थ्यांंना धरावा लागतो.मोठे उद्योगधंदे, उच्च शिक्षणाच्या सुविधा खेचून आणण्याची क्षमता असणारे राजकीय पुढारी वाशिम जिल्ह्यात नाहीत, अशातलाही भाग नाही. थेट मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधू शकतील असे पुढारी जिल्ह्याला सुरुवातीपासूनच लाभलेले आहेत; मात्र विकासाच्या मुद्यावर आपले 'वजन' खर्ची घालण्यापेक्षा एकमेकांचे पाय ओढण्यातच धन्यता मानणारेही याच जिल्ह्यात असल्याने औद्योगिकीकरणात जिल्हा 'बॅकफूट'वर गेला आहे. श्रेयाची लढाई आड येत असल्याने जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राचे पार वाटोळे होत आहे. प्रशासनाची तत्परता आणि प्रबळ राजकीय इच्छाशक्ती या जोरावरच जिल्हा विकासाचे बाळसे धरू शकेल.