शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..."; हिंदी सक्ती जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
5
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
6
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
7
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
8
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
9
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
10
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
11
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
12
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
13
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
14
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
15
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
16
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
17
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
18
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
19
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
20
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!

नादुरुस्त विद्युत रोहित्रांमुळे सुकल्या फळबागा

By admin | Updated: October 7, 2015 02:23 IST

चार महिन्यापांसून रोहित्रात बिघाड असल्याने शेतकरी त्रस्त.

वाशिम/शिरपूरजैन : जिल्ह्यात जवळपास २00 विद्युत रोहित्र नादुरुस्त असल्यामुळे संत्रा व पपईच्या फळबागा सुकल्या असून, शेतकर्‍यांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. दोन ते तीन महिन्यांपासून रोहित्र नादुरुस्त असून, शेतकर्‍यांनी आंदोलन केल्यामुळे केवळ ५७ रोहित्र नव्याने आले आहेत. परिणामी, उर्वरित विद्युत रोहित्रांचा प्रश्न ह्यजैसे थेह्ण असल्याने शेतकर्‍यांची झोप उडाली आहे. शिरपूर येथील जानगीर महाराज संस्थान परिसरातील फरशी नामक डी.बी. (रोहित्र) चार महिन्यांपूर्वी जळाली. ते अद्यापही दुरुस्त न केल्याने रोहित्रावर अवलंबून असलेल्या ३0 शेतकर्‍यांच्या शेतातील पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. शिरपूर येथील फरशी (डी.बी.) रोहित्र हे पावसाळा लागण्यापूर्वीच जून महिन्यामध्ये जळाले. तेव्हापासून या रोहित्रावर अवलंबून असलेल्या शेतकर्‍यांनी वेळोवेळी शिरपूर महावितरण कार्यालयाकडे यासंबंधी तक्रारी दिल्या आहेत; परंतु अद्यापही हे रोहित्र दुरुस्त करण्यात आले नाही. रोहित्राअभावी इब्राहिमखाँ बागवान यांची संत्राची झाडे सुकली आहेत, तर मुख्तारखाँ पठाण, विश्‍वनाथ भालेराव, ज्ञानेश्‍वर गावंडे, घिरके, मजहरखाँ अब्दल्लाखाँ यासह ३0 शेतकर्‍यांच्या शेतातील तूर व इतर पिके विजेअभावी सुकण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकरी पुरते त्रस्त झाले आहेत. संबंधितांकडे तक्रार करूनही महावितरण कंपनी लक्ष देत नसल्याने वीज कंपनीबाबत शेतकर्‍यांत रोष व्यक्त होत आहे. जिल्ह्यात जवळपास २00 रोहित्र बंद आहेत. विद्युत रोहित्र उपलब्ध करण्याबाबत वाशिमच्या वितरण कार्यालयाने वरिष्ठांकडे पाठपुरावा केला आहे. ५७ नवीन रोहित्र मिळाले आहेत.