शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

नादुरुस्त विद्युत रोहित्रांमुळे सुकल्या फळबागा

By admin | Updated: October 7, 2015 02:23 IST

चार महिन्यापांसून रोहित्रात बिघाड असल्याने शेतकरी त्रस्त.

वाशिम/शिरपूरजैन : जिल्ह्यात जवळपास २00 विद्युत रोहित्र नादुरुस्त असल्यामुळे संत्रा व पपईच्या फळबागा सुकल्या असून, शेतकर्‍यांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. दोन ते तीन महिन्यांपासून रोहित्र नादुरुस्त असून, शेतकर्‍यांनी आंदोलन केल्यामुळे केवळ ५७ रोहित्र नव्याने आले आहेत. परिणामी, उर्वरित विद्युत रोहित्रांचा प्रश्न ह्यजैसे थेह्ण असल्याने शेतकर्‍यांची झोप उडाली आहे. शिरपूर येथील जानगीर महाराज संस्थान परिसरातील फरशी नामक डी.बी. (रोहित्र) चार महिन्यांपूर्वी जळाली. ते अद्यापही दुरुस्त न केल्याने रोहित्रावर अवलंबून असलेल्या ३0 शेतकर्‍यांच्या शेतातील पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. शिरपूर येथील फरशी (डी.बी.) रोहित्र हे पावसाळा लागण्यापूर्वीच जून महिन्यामध्ये जळाले. तेव्हापासून या रोहित्रावर अवलंबून असलेल्या शेतकर्‍यांनी वेळोवेळी शिरपूर महावितरण कार्यालयाकडे यासंबंधी तक्रारी दिल्या आहेत; परंतु अद्यापही हे रोहित्र दुरुस्त करण्यात आले नाही. रोहित्राअभावी इब्राहिमखाँ बागवान यांची संत्राची झाडे सुकली आहेत, तर मुख्तारखाँ पठाण, विश्‍वनाथ भालेराव, ज्ञानेश्‍वर गावंडे, घिरके, मजहरखाँ अब्दल्लाखाँ यासह ३0 शेतकर्‍यांच्या शेतातील तूर व इतर पिके विजेअभावी सुकण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकरी पुरते त्रस्त झाले आहेत. संबंधितांकडे तक्रार करूनही महावितरण कंपनी लक्ष देत नसल्याने वीज कंपनीबाबत शेतकर्‍यांत रोष व्यक्त होत आहे. जिल्ह्यात जवळपास २00 रोहित्र बंद आहेत. विद्युत रोहित्र उपलब्ध करण्याबाबत वाशिमच्या वितरण कार्यालयाने वरिष्ठांकडे पाठपुरावा केला आहे. ५७ नवीन रोहित्र मिळाले आहेत.