शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

शेतकरी आत्महत्येचा तपास होणार आठवडाभरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:12 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना तत्काळ आर्थिक मदत मिळावी म्हणून शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा तपास आठवडाभरात पोलिसांमार्फत करण्यात येणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांचे अवर सचिव आणि वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनची १६ सप्टेंबर रोजी बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.  महाराष्ट्रात नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करीत आहेत. अशा शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना या संदर्भात शासकीय मदत मिळण्यास मोठा विलंब लागतो. 

ठळक मुद्देशासनाचे निर्देश मुख्यमंत्र्यांचे अवर सचिव, शेती स्वावलंबन मिशनची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना तत्काळ आर्थिक मदत मिळावी म्हणून शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा तपास आठवडाभरात पोलिसांमार्फत करण्यात येणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांचे अवर सचिव आणि वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनची १६ सप्टेंबर रोजी बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करीत आहेत. अशा शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना या संदर्भात शासकीय मदत मिळण्यास मोठा विलंब लागतो. हा विलंब होऊ नये आणि शेतकरी आत्महत्येचा तपास लवकर होऊन संबंधित आत्महत्याग्रस्त कुटुंबांना त्वरित मदत देणे शक्य व्हावे, या दृष्टीने विचार करून निर्णय घेण्यासाठी कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन आणि मुख्यमंत्र्यांच्या अवर सचिवांची १६ सप्टेंबर रोजी बैठक पार पडली. या बैठकीनंतर शेतकरी आत्महत्या प्रकरणाचा तपास लवकर व्हावा, या दृष्टीने पोलीस विभागाला काही सूचना देण्यात आल्या आहेत. या अंतर्गत आत्महत्याग्रस्त कुटुंबाला तत्काळ मदत देण्यासाठी  शेतकरी आत्महत्येचे कारण तत्काळ शोधून, शेतकरी आत्महत्येचा तपास आठवडाभरात पूर्ण करावा लागणार आहे. यासाठी न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेला दोन दिवसांत अहवालही सादर करावा लागणार आहे. तसेच संबंधित पोलीस निरीक्षक किंवा सहायक पोलीस निरीक्षकांनी प्रत्यक्ष भेट देऊन शेतकरी आत्महत्या प्रकरणाच्या तपासाला योग्य दिशा देण्याची सूचनाही करण्यात आली आहे. शेतकरी आत्महत्येचा तपास एका आठवड्यात पूर्ण करण्यासाठी पोलीस अधीक्षक वा पोलीस आयुक्तांना दक्षता घ्यावी लागणार असून, या संदर्भात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल विनाविलंब जिल्हाधिकार्‍यांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवावा लागणार आहे. 

 पोलीस विभागाला शेतकरी आत्महत्या प्रकरणाचा तपास आठ दिवसांत पूर्ण करावा लागणार आहे. यासाठी संबंधित यंत्रणेलाही सहकार्य करावे लागेल. या निर्णयामुळे  शेतकरी आत्महत्याग्रस्त कु टुंबांना त्वरित मदत मिळण्यास मदत होणार आहे. - राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी, वाशिम