शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शेतकरी आत्महत्येचा तपास होणार आठवडाभरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:12 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना तत्काळ आर्थिक मदत मिळावी म्हणून शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा तपास आठवडाभरात पोलिसांमार्फत करण्यात येणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांचे अवर सचिव आणि वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनची १६ सप्टेंबर रोजी बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.  महाराष्ट्रात नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करीत आहेत. अशा शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना या संदर्भात शासकीय मदत मिळण्यास मोठा विलंब लागतो. 

ठळक मुद्देशासनाचे निर्देश मुख्यमंत्र्यांचे अवर सचिव, शेती स्वावलंबन मिशनची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना तत्काळ आर्थिक मदत मिळावी म्हणून शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा तपास आठवडाभरात पोलिसांमार्फत करण्यात येणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांचे अवर सचिव आणि वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनची १६ सप्टेंबर रोजी बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करीत आहेत. अशा शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना या संदर्भात शासकीय मदत मिळण्यास मोठा विलंब लागतो. हा विलंब होऊ नये आणि शेतकरी आत्महत्येचा तपास लवकर होऊन संबंधित आत्महत्याग्रस्त कुटुंबांना त्वरित मदत देणे शक्य व्हावे, या दृष्टीने विचार करून निर्णय घेण्यासाठी कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन आणि मुख्यमंत्र्यांच्या अवर सचिवांची १६ सप्टेंबर रोजी बैठक पार पडली. या बैठकीनंतर शेतकरी आत्महत्या प्रकरणाचा तपास लवकर व्हावा, या दृष्टीने पोलीस विभागाला काही सूचना देण्यात आल्या आहेत. या अंतर्गत आत्महत्याग्रस्त कुटुंबाला तत्काळ मदत देण्यासाठी  शेतकरी आत्महत्येचे कारण तत्काळ शोधून, शेतकरी आत्महत्येचा तपास आठवडाभरात पूर्ण करावा लागणार आहे. यासाठी न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेला दोन दिवसांत अहवालही सादर करावा लागणार आहे. तसेच संबंधित पोलीस निरीक्षक किंवा सहायक पोलीस निरीक्षकांनी प्रत्यक्ष भेट देऊन शेतकरी आत्महत्या प्रकरणाच्या तपासाला योग्य दिशा देण्याची सूचनाही करण्यात आली आहे. शेतकरी आत्महत्येचा तपास एका आठवड्यात पूर्ण करण्यासाठी पोलीस अधीक्षक वा पोलीस आयुक्तांना दक्षता घ्यावी लागणार असून, या संदर्भात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल विनाविलंब जिल्हाधिकार्‍यांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवावा लागणार आहे. 

 पोलीस विभागाला शेतकरी आत्महत्या प्रकरणाचा तपास आठ दिवसांत पूर्ण करावा लागणार आहे. यासाठी संबंधित यंत्रणेलाही सहकार्य करावे लागेल. या निर्णयामुळे  शेतकरी आत्महत्याग्रस्त कु टुंबांना त्वरित मदत मिळण्यास मदत होणार आहे. - राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी, वाशिम