शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

शेतकरी आत्महत्येचा तपास होणार आठवडाभरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:12 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना तत्काळ आर्थिक मदत मिळावी म्हणून शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा तपास आठवडाभरात पोलिसांमार्फत करण्यात येणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांचे अवर सचिव आणि वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनची १६ सप्टेंबर रोजी बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.  महाराष्ट्रात नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करीत आहेत. अशा शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना या संदर्भात शासकीय मदत मिळण्यास मोठा विलंब लागतो. 

ठळक मुद्देशासनाचे निर्देश मुख्यमंत्र्यांचे अवर सचिव, शेती स्वावलंबन मिशनची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना तत्काळ आर्थिक मदत मिळावी म्हणून शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा तपास आठवडाभरात पोलिसांमार्फत करण्यात येणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांचे अवर सचिव आणि वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनची १६ सप्टेंबर रोजी बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करीत आहेत. अशा शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना या संदर्भात शासकीय मदत मिळण्यास मोठा विलंब लागतो. हा विलंब होऊ नये आणि शेतकरी आत्महत्येचा तपास लवकर होऊन संबंधित आत्महत्याग्रस्त कुटुंबांना त्वरित मदत देणे शक्य व्हावे, या दृष्टीने विचार करून निर्णय घेण्यासाठी कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन आणि मुख्यमंत्र्यांच्या अवर सचिवांची १६ सप्टेंबर रोजी बैठक पार पडली. या बैठकीनंतर शेतकरी आत्महत्या प्रकरणाचा तपास लवकर व्हावा, या दृष्टीने पोलीस विभागाला काही सूचना देण्यात आल्या आहेत. या अंतर्गत आत्महत्याग्रस्त कुटुंबाला तत्काळ मदत देण्यासाठी  शेतकरी आत्महत्येचे कारण तत्काळ शोधून, शेतकरी आत्महत्येचा तपास आठवडाभरात पूर्ण करावा लागणार आहे. यासाठी न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेला दोन दिवसांत अहवालही सादर करावा लागणार आहे. तसेच संबंधित पोलीस निरीक्षक किंवा सहायक पोलीस निरीक्षकांनी प्रत्यक्ष भेट देऊन शेतकरी आत्महत्या प्रकरणाच्या तपासाला योग्य दिशा देण्याची सूचनाही करण्यात आली आहे. शेतकरी आत्महत्येचा तपास एका आठवड्यात पूर्ण करण्यासाठी पोलीस अधीक्षक वा पोलीस आयुक्तांना दक्षता घ्यावी लागणार असून, या संदर्भात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल विनाविलंब जिल्हाधिकार्‍यांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवावा लागणार आहे. 

 पोलीस विभागाला शेतकरी आत्महत्या प्रकरणाचा तपास आठ दिवसांत पूर्ण करावा लागणार आहे. यासाठी संबंधित यंत्रणेलाही सहकार्य करावे लागेल. या निर्णयामुळे  शेतकरी आत्महत्याग्रस्त कु टुंबांना त्वरित मदत मिळण्यास मदत होणार आहे. - राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी, वाशिम