शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

शिवारात वन्यप्राण्यांचा धुडगूस, रखवालीसाठी शेतकऱ्यांची शेतात जागल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:27 IST

उंबर्डा बाजारसह परिसरातील अनेक गावांतील शेतजमिनी कारंजा-सोहळ काळवीट अभयारण्यालगत आहेत. त्यामुळे या अभयारण्यातील वन्य प्राणी चारा-पाण्यासाठी नेहमीच शिवारात ...

उंबर्डा बाजारसह परिसरातील अनेक गावांतील शेतजमिनी कारंजा-सोहळ काळवीट अभयारण्यालगत आहेत. त्यामुळे या अभयारण्यातील वन्य प्राणी चारा-पाण्यासाठी नेहमीच शिवारात संचार करतात. शिवारात संचार करणारे रोही, हरिण, माकडे, रानडुकरांचे कळप शेती पिकांचे अतोनात नुकसानही करतात. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार निरंतर सुरू असतानाही या प्राण्यांना शिवारापासून दूर ठेवण्यासाठी वनविभागाने कुठल्याही उपाययोजना केल्या नाहीत आणि कुंपणही घातले नाही. यंदाही खरीप पिके बहरत असताना वन्य प्राण्यांनी शिवारात धुडगूस घालून तूर, सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकांचे नुकसान करीत आहेत. त्यामुळे उत्पादन घटून आर्थिक नुकसान होण्याची भीती असल्याने शेतकऱ्यांना पिकांची रखवाली करण्यासाठी रात्री जीव धोक्यात घालून शेतात जागल करावी लागत आहे.

----------------

वन्य प्राण्यांचा शेतकऱ्यांनाही धोका

जंगलातील रोही, रानडुक्कर, हरणांचे कळप ऐन जोमात आलेल्या पिकांत हैदोस घालून ही पिके फस्त करीत असल्याने हैराण झालेला शेतकरी रात्री थंडीवाऱ्यात शेतात जागरण करीत आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांच्या जिवालाही शेतात खाद्याच्या शोधात वावरणारे विषारी साप, तसेच रानडुकरासारख्या वन्य प्राण्यांपासून धोका आहे. ही बाब लक्षात घेत वनविभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे.