शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

शिवारात वन्यप्राण्यांचा धुडगूस, रखवालीसाठी शेतकऱ्यांची शेतात जागल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:27 IST

उंबर्डा बाजारसह परिसरातील अनेक गावांतील शेतजमिनी कारंजा-सोहळ काळवीट अभयारण्यालगत आहेत. त्यामुळे या अभयारण्यातील वन्य प्राणी चारा-पाण्यासाठी नेहमीच शिवारात ...

उंबर्डा बाजारसह परिसरातील अनेक गावांतील शेतजमिनी कारंजा-सोहळ काळवीट अभयारण्यालगत आहेत. त्यामुळे या अभयारण्यातील वन्य प्राणी चारा-पाण्यासाठी नेहमीच शिवारात संचार करतात. शिवारात संचार करणारे रोही, हरिण, माकडे, रानडुकरांचे कळप शेती पिकांचे अतोनात नुकसानही करतात. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार निरंतर सुरू असतानाही या प्राण्यांना शिवारापासून दूर ठेवण्यासाठी वनविभागाने कुठल्याही उपाययोजना केल्या नाहीत आणि कुंपणही घातले नाही. यंदाही खरीप पिके बहरत असताना वन्य प्राण्यांनी शिवारात धुडगूस घालून तूर, सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकांचे नुकसान करीत आहेत. त्यामुळे उत्पादन घटून आर्थिक नुकसान होण्याची भीती असल्याने शेतकऱ्यांना पिकांची रखवाली करण्यासाठी रात्री जीव धोक्यात घालून शेतात जागल करावी लागत आहे.

----------------

वन्य प्राण्यांचा शेतकऱ्यांनाही धोका

जंगलातील रोही, रानडुक्कर, हरणांचे कळप ऐन जोमात आलेल्या पिकांत हैदोस घालून ही पिके फस्त करीत असल्याने हैराण झालेला शेतकरी रात्री थंडीवाऱ्यात शेतात जागरण करीत आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांच्या जिवालाही शेतात खाद्याच्या शोधात वावरणारे विषारी साप, तसेच रानडुकरासारख्या वन्य प्राण्यांपासून धोका आहे. ही बाब लक्षात घेत वनविभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे.