शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

शिवारात वन्यप्राण्यांचा धुडगूस, रखवालीसाठी शेतकऱ्यांची शेतात जागल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:27 IST

उंबर्डा बाजारसह परिसरातील अनेक गावांतील शेतजमिनी कारंजा-सोहळ काळवीट अभयारण्यालगत आहेत. त्यामुळे या अभयारण्यातील वन्य प्राणी चारा-पाण्यासाठी नेहमीच शिवारात ...

उंबर्डा बाजारसह परिसरातील अनेक गावांतील शेतजमिनी कारंजा-सोहळ काळवीट अभयारण्यालगत आहेत. त्यामुळे या अभयारण्यातील वन्य प्राणी चारा-पाण्यासाठी नेहमीच शिवारात संचार करतात. शिवारात संचार करणारे रोही, हरिण, माकडे, रानडुकरांचे कळप शेती पिकांचे अतोनात नुकसानही करतात. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार निरंतर सुरू असतानाही या प्राण्यांना शिवारापासून दूर ठेवण्यासाठी वनविभागाने कुठल्याही उपाययोजना केल्या नाहीत आणि कुंपणही घातले नाही. यंदाही खरीप पिके बहरत असताना वन्य प्राण्यांनी शिवारात धुडगूस घालून तूर, सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकांचे नुकसान करीत आहेत. त्यामुळे उत्पादन घटून आर्थिक नुकसान होण्याची भीती असल्याने शेतकऱ्यांना पिकांची रखवाली करण्यासाठी रात्री जीव धोक्यात घालून शेतात जागल करावी लागत आहे.

----------------

वन्य प्राण्यांचा शेतकऱ्यांनाही धोका

जंगलातील रोही, रानडुक्कर, हरणांचे कळप ऐन जोमात आलेल्या पिकांत हैदोस घालून ही पिके फस्त करीत असल्याने हैराण झालेला शेतकरी रात्री थंडीवाऱ्यात शेतात जागरण करीत आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांच्या जिवालाही शेतात खाद्याच्या शोधात वावरणारे विषारी साप, तसेच रानडुकरासारख्या वन्य प्राण्यांपासून धोका आहे. ही बाब लक्षात घेत वनविभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे.