शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

विद्यार्थ्यांनी लिहिले मामा, मावशीला पत्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:39 IST

जिवलग, नातलगांना आपली खुशाली कळवायची आणि त्यांचे सर्वकाही मजेत चालले की कसे, हे जाणून घेण्यासाठी पूर्वी केवळ पत्रव्यवहाराचाच पर्याय ...

जिवलग, नातलगांना आपली खुशाली कळवायची आणि त्यांचे सर्वकाही मजेत चालले की कसे, हे जाणून घेण्यासाठी पूर्वी केवळ पत्रव्यवहाराचाच पर्याय उपलब्ध होता. सायकलने गावोगावी फिरून पत्र गोळा करणाऱ्या पोस्टमनच्या येण्याची सर्वच जण आतुरतेने प्रतीक्षा करीत असत. कालांतराने दूरध्वनी आणि त्यानंतर भ्रमणध्वनीचा वापर वेगाने वाढला आणि त्या ओघात पत्रव्यवहार व पोस्टमन लुप्त झाले. दरम्यान, पत्र पाठविणे आणि समोरून येणारे पत्र वाचून होणारा आनंद आताच्या पिढीला उपभोगता यावा, यासाठी विठाबाई पसारकर विद्यामंदिराने पत्रलेखनाचा उपक्रम राबविला. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना मामा, काका, मावशीला पत्र लिहायला सांगण्यात आले. या माध्यमातून विद्यार्थीही बोलते झाले. सहभागी विद्यार्थ्यांनी जोडकार्ड नातलगांना पाठविले असून दुसऱ्या कार्डवर स्वत:चा पत्ता लिहून पाठविला आहे. जेणेकरून पत्र मिळाल्यानंतर उत्तरही येणे अपेक्षित आहे, हा त्यामागील उद्देश होय. या उपक्रमाने जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती पसारकर विद्यामंदिराचे संचालक अविनाश पसारकर यांनी दिली.