शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

विद्यार्थी म्हणतात, आता होऊन जाऊ द्या!

By admin | Updated: November 17, 2014 00:04 IST

महाविद्यालयीन निवडणूक: तरूणाईला लागले ‘राजकीय गुलाल’ उधळण्याचे वेध.

नागेश घोपे /वाशिम महाविद्यालयीन प्रतिनिधींच्या निवडीसाठी पून्हा एकदा लोकशाही पद्धतीने निवडणूका घेण्याचे संकेत राज्यात सत्तारूढ झालेल्या ह्यफडणविस सरकारह्णने दिले आहेत. सरकारच्या या संकेतामुळे तरूणाईच्या अंगात नवीन ऊर्जा संचारली असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी तथा काही संघटनांनी सरकारच्या या धोरणांचे स्वागत केले आहे. परिणामी, तरूणाईला महाविद्यालयांमध्ये उधळणार्‍या राजकीय गुलालात रंगण्याचे डोहाळे लागले असल्याचे दिसून येत आहे. राज्य शासनाच्या संभाव्य निर्णयाचे विद्यार्थी संघटनांकडून स्वागत होत असल्याचे दिसून येत आहे. १९९४ पर्यंत राज्यातील महाविद्यालय प्रतिनिधींची निवड करण्यासाठी लोकशाही पद्धतीने निवडणूका घेतल्या जात होत्या. महाविद्यालयातील तमाम विद्यार्थ्यांना या निवडणूकीत मतदानाचा अधिकार होता. मात्र, निवडणूकींतील राजकारणाने महाविद्यालय परिसरांना रक्तरंजित केले होते. यातून गुंडगिरी, ह त्याकांड, मारामार्‍या आदी प्रकार वाढीस लागले होते. निवडणूक काळात विद्या र्थ्यांच्या हातात लेखनी ऐवजी तलवारी दिसून येत होत्या. त्यामूळे शासनाने सन १९९४ मध्ये महाविद्यालयातील निवडणूकांवर बंदी घालून गुणवत्तेवर विद्यार्थी प्रतिनिधी निवडायची प्रथा सुरू केली होती. महाविद्यालयातील निवडणूक बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांमधील नेतृत्व गुण लोप पावत असल्याची ओरड करीत काही विद्यार्थी संघटनांनी पून्हा एकदा महाविद्यालयातील निवडणूका सुरू करण्याची मागणी शासनाकडे केली होती. त्यानंतर शासनाने महाविद्यालयांमधील निवडणूका पून्हा सुरू कराव्या काय ? याविषयी अभ्यास करण्यासाठी माजी निवडणूक आयुक्त जि. एम. लिंगडोह यांच्या नेतृत्वाखाली एक समिती गठित केली होती. समितीने निवडणूकांच्या बाजुने कौल दिला होता. *लिंगडोह समितीच्या शिफारशी विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्य रूजावित, त्यांच्यातील नेतृत्व गुणांचा विकास व्हावा, त्यांना संसदीय निवड प्रणालीची ओळख महाविद्यालयीन जीवनातच व्हावी हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून महाविद्यालयातील विद्यार्थी प्रतिनिधींची निवड ही लोकशाहीतील निवडणूकीच्या पद्धतीने करण्यात यावी अशी शिफारस लिंगडोह समितीने मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे सादर केलेल्या अहवालात केला आहे. सदर समितीच्या शिफारशींनुसार महाविद्यालीय व विद्यापीठ प्र ितनिधींची निवड करण्यासाठी निवडणूका घेण्यात याव्यात असा आदेश उच्च व तंत्र शिक्षण विभागाने काढला होता. परंतु त्याची अद्यापही अमंलबजावणी झाली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यातील महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी प्रतिनिधी निवडण्यासाठी लोकशाही पद्धतीने निवडणूका सुरू कराव्या अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसने यापूर्वीच केली असल्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष रामेश्‍वर माळेकर यांनी स्पष्ट केली आहे. दरम्यान येथील विर भग तसिंग विद्यार्थी परिषदने देखील राज्य सरकारने सकारात्मक दृष्टीकोन ठेवून महाविद्यालयातील निवडणूका पून्हा एकदा सुरू करण्याची मागणी केली आहे.