शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी म्हणतात, आता होऊन जाऊ द्या!

By admin | Updated: November 17, 2014 00:04 IST

महाविद्यालयीन निवडणूक: तरूणाईला लागले ‘राजकीय गुलाल’ उधळण्याचे वेध.

नागेश घोपे /वाशिम महाविद्यालयीन प्रतिनिधींच्या निवडीसाठी पून्हा एकदा लोकशाही पद्धतीने निवडणूका घेण्याचे संकेत राज्यात सत्तारूढ झालेल्या ह्यफडणविस सरकारह्णने दिले आहेत. सरकारच्या या संकेतामुळे तरूणाईच्या अंगात नवीन ऊर्जा संचारली असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी तथा काही संघटनांनी सरकारच्या या धोरणांचे स्वागत केले आहे. परिणामी, तरूणाईला महाविद्यालयांमध्ये उधळणार्‍या राजकीय गुलालात रंगण्याचे डोहाळे लागले असल्याचे दिसून येत आहे. राज्य शासनाच्या संभाव्य निर्णयाचे विद्यार्थी संघटनांकडून स्वागत होत असल्याचे दिसून येत आहे. १९९४ पर्यंत राज्यातील महाविद्यालय प्रतिनिधींची निवड करण्यासाठी लोकशाही पद्धतीने निवडणूका घेतल्या जात होत्या. महाविद्यालयातील तमाम विद्यार्थ्यांना या निवडणूकीत मतदानाचा अधिकार होता. मात्र, निवडणूकींतील राजकारणाने महाविद्यालय परिसरांना रक्तरंजित केले होते. यातून गुंडगिरी, ह त्याकांड, मारामार्‍या आदी प्रकार वाढीस लागले होते. निवडणूक काळात विद्या र्थ्यांच्या हातात लेखनी ऐवजी तलवारी दिसून येत होत्या. त्यामूळे शासनाने सन १९९४ मध्ये महाविद्यालयातील निवडणूकांवर बंदी घालून गुणवत्तेवर विद्यार्थी प्रतिनिधी निवडायची प्रथा सुरू केली होती. महाविद्यालयातील निवडणूक बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांमधील नेतृत्व गुण लोप पावत असल्याची ओरड करीत काही विद्यार्थी संघटनांनी पून्हा एकदा महाविद्यालयातील निवडणूका सुरू करण्याची मागणी शासनाकडे केली होती. त्यानंतर शासनाने महाविद्यालयांमधील निवडणूका पून्हा सुरू कराव्या काय ? याविषयी अभ्यास करण्यासाठी माजी निवडणूक आयुक्त जि. एम. लिंगडोह यांच्या नेतृत्वाखाली एक समिती गठित केली होती. समितीने निवडणूकांच्या बाजुने कौल दिला होता. *लिंगडोह समितीच्या शिफारशी विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्य रूजावित, त्यांच्यातील नेतृत्व गुणांचा विकास व्हावा, त्यांना संसदीय निवड प्रणालीची ओळख महाविद्यालयीन जीवनातच व्हावी हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून महाविद्यालयातील विद्यार्थी प्रतिनिधींची निवड ही लोकशाहीतील निवडणूकीच्या पद्धतीने करण्यात यावी अशी शिफारस लिंगडोह समितीने मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे सादर केलेल्या अहवालात केला आहे. सदर समितीच्या शिफारशींनुसार महाविद्यालीय व विद्यापीठ प्र ितनिधींची निवड करण्यासाठी निवडणूका घेण्यात याव्यात असा आदेश उच्च व तंत्र शिक्षण विभागाने काढला होता. परंतु त्याची अद्यापही अमंलबजावणी झाली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यातील महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी प्रतिनिधी निवडण्यासाठी लोकशाही पद्धतीने निवडणूका सुरू कराव्या अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसने यापूर्वीच केली असल्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष रामेश्‍वर माळेकर यांनी स्पष्ट केली आहे. दरम्यान येथील विर भग तसिंग विद्यार्थी परिषदने देखील राज्य सरकारने सकारात्मक दृष्टीकोन ठेवून महाविद्यालयातील निवडणूका पून्हा एकदा सुरू करण्याची मागणी केली आहे.