शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
2
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
3
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
4
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
5
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
6
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
7
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
8
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
9
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
10
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
11
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
12
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
13
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
14
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
15
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
16
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
17
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती
18
मुंबई आणि पंजाबमधील लढत पावसामुळे रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण

अनसिंग बसस्थानकासमोर साचले पाणी; ग्रामस्थांची गैरसोय

By admin | Updated: July 1, 2016 01:11 IST

समस्येबाबत ग्रामपंचायतीला निवेदन.

अनसिंग (जि. वाशिम): येथील बसस्थानकासमोर गेल्या अनेक महिन्यांपासून मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात सदर खड्यांमध्ये पाणी साचत असून, याठिकाणी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. ही समस्या तत्काळ निकाली काढावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांमधून जोर धरत आहे. अनसिंग येथे नवीन बसस्थानक होऊन सुमारे सात वर्षांचा काळ उलटला. असे असताना बसस्थानक आवारात अद्याप कुठलेच ठोस काम झालेले नाही. तसेच एस.टी. बसस्थानक प्रवेशाच्या ठिकाणी तसेच बाहेर निघत असताना त्याचठिकाणी गेल्या अनेक महिन्यांपासून मोठे खड्डे पडले आहेत. त्यातून बस चालवित असताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. सोबतच खड्ड्यांमुळे प्रवाशांनाही नाहक त्रास सोसावा लागत आहे. पावसाळा सुरू झाल्यामुळे सध्या या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असून, अडचणींमध्ये भर पडली आहे. तथापि, ही समस्या विनाविलंब निकाली काढावी, अशी मागणी येथे जोर धरत आहे.