शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
4
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
5
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
6
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
7
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
8
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
9
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
10
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
11
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
12
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
13
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
14
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
15
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
16
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
17
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
18
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
19
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
20
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!

जिल्ह्यात संचारबंदीची कडक अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:41 IST

वाशिम : जिल्ह्यात संचारबंदीची नवीन नियमावली २२ एप्रिल रोजीच्या रात्री ८ वाजेपासून लागू करण्यात आली आहे. कोरोना संसर्गावर नियंत्रण ...

वाशिम : जिल्ह्यात संचारबंदीची नवीन नियमावली २२ एप्रिल रोजीच्या रात्री ८ वाजेपासून लागू करण्यात आली आहे. कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी या नियमावलीची शहरी व ग्रामीण भागात कडक अंमलबजावणी होणे आवश्यक असून, सदर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर नियमानुसार कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी शुक्रवारी दिले. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा सभेत ते बोलत होते.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर हे या बैठकीमध्ये सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, गर्दी रोखणे हा कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी उपाय आहे. जिल्ह्यातील वाढत्या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी संचारबंदी नियमाची कडक अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. अत्यावश्यक बाबींची दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा आहे. मात्र, या कालावधीतसुद्धा कोणत्याही ठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. सदर दुकाने, आस्थापनांच्या बाहेर यासाठी योग्य व्यवस्था करावी. शहरी व ग्रामीण भागात विशेष पथके तयार करून सकाळी ११ वाजेनंतर सुरू राहणाऱ्या दुकानांवर कारवाई करावी.

शहरी व ग्रामीण भागातील फळे, भाजीपाला विक्रीसाठी विकेंद्रित ठिकाणी जागा उपलब्ध करून द्यावी. कोणत्याही परिस्थितीत एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. ग्रामीण भागात ग्रामस्तरीय समितीच्या माध्यमातून संचारबंदी नियमाची काटेकोर अंमलबजावणी करावी. तसेच प्रतिबंधित क्षेत्रातसुद्धा नियमांचे पालन होईल याची दक्षता घ्यावी. पुढील १५ दिवस जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून, सर्व यंत्रणांनी समन्वयाने व अतिशय सतर्क राहून काम करावे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पंत म्हणाल्या, ग्रामीण भागातही कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर संचारबंदी नियमांची ग्रामीण भागात कडक अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामस्तरीय समित्यांच्या माध्यमातून विशेष प्रयत्न होणे आवश्यक आहे. तसेच ग्रामीण भागातसुद्धा बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची कोरोना चाचणी करण्यावर विशेष भर द्यावा.

निवासी उपजिल्हाधिकारी हिंगे यांनी संचारबंदीच्या नवीन नियमावलीविषयी माहिती दिली. तसेच या नियमांच्या अंमलबजावणीसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आहेर यांनी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या सद्य:स्थितीची माहिती देऊन कोरोना चाचण्या वाढविणे व लसीकरण मोहिमेला गती देण्याविषयी मार्गदर्शन केले.