शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित करणे थांबवा अन्यथा रस्त्यावर उतरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:16 IST

रिसोड : आघाडी सरकारने अचानक ‘यू टर्न’ घेत शेतकऱ्यांच्या शेतातील कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे ...

रिसोड : आघाडी सरकारने अचानक ‘यू टर्न’ घेत शेतकऱ्यांच्या शेतातील कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष असून अनेक शेतकऱ्यांची उभी पिके वाळत आहेत. ‘महावितरण’च्या या तुघलकी कारभाराविरोधात संपूर्ण जिल्ह्यात भूमिपुत्र शेतकरी संघटना गुरुवारी (दि.१८) रस्ता रोको आंदोलन करणार आहे.

जिल्ह्यात नव्वद टक्के कृषीपंपांना मीटरच नाहीत मग महावितरण थकबाकीचे आकडे कसे काय सांगू शकते. अंदाजित अव्वाच्या सव्वा रक्कमा बिलावर टाकून शेतकऱ्याची लूट केली जात आहे. जिल्ह्यात सिंचनाची व्यवस्था असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी मूग, भुईमूग, भाजीपाला, ऊस, पपई अशी अनेक पिके पेरलेली आहेत. उन्हाळा तापत आहे. उन्हाळी पिकांना तीसऱ्या दिवशी पाणी द्यावे लागते. याची जाणीव ‘महावितरण’ने ठेवायला पाहिजे. शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत शासन पाहत आहे. कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित करणे थांबत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून करण्यात आल्याची माहिती भूमिपुत्र शेतकरी संघटनेच जिल्हाध्यक्ष रामेश्वर अवचार यांनी दिली आहे.