शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange; सोमवारपासून पाणीही पिणार नाही, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, मागण्यांवर ठाम!
2
आजचे राशीभविष्य, ०१ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, वादग्रस्त विषय आज टाळावेत
3
Maratha Reservation: आरक्षणामध्ये अडसर न्यायालयीन निकालांचा, समितीच्या सल्लामसलतीत बाब समोर
4
Maratha Reservation: मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणे अशक्य? चंद्रकांत पाटील म्हणाले...
5
Maratha Reservation: सर्वपक्षीय बैठक, अधिवेशन बोलावून २४ तासांत निर्णय घ्या- सुप्रिया सुळे
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना धनलाभ, अडकलेले पैसे मिळतील; ६ राशींना संमिश्र, सावध असावे!
7
Maratha Reservation: मराठा आरक्षण लढ्याला पाठिंबा देण्यासाठी सायकलवरून मुंबई गाठली!
8
कुणबी नोंदीचे पुरावे शिंदे समितीला देणार, मराठा आरक्षण अभ्यासकांसोबत जरांगेंची दीड तास चर्चा
9
विशेष लेख: शिंक्याचे तुटले आणि (कोरियन) बोक्याचे फावले!
10
Maratha Morcha : मराठा आरक्षणाबाबत हालचालिंना वेग, मुख्यमंत्र्यांनी रात्रीच बोलावली बैठक; राधाकृष्ण विखे पाटील यांचीही उपस्थिती
11
रायगडमध्ये रिक्षाचा भीषण अपघात, ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखासह तिघांचा जागीच मृत्यू
12
Maratha Morcha : फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही आंदोलकांना मदत करता? एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात दिले उत्तर, म्हणाले...
13
Maratha Morcha : “गोंधळ घालणाऱ्यांना सरकारने पाठवले होते का?, सरकार दंगल ...”, सुप्रिया सुळेंना घेराव घालणाऱ्यांबाबत मनोज जरांगेंचं मोठं विधान
14
मोठी दुर्घटना! धौलीगंगा वीज प्रकल्पाच्या बोगद्यात भूस्खलनामुळे १९ कामगार अडकले
15
धावत्या ट्रॅव्हल्समध्ये जळून एकाचा मृत्यू; प्रवाशाने स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतल्याचा संशय
16
राज ठाकरेंच्या टीकेवर एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर; "आधी माहिती घेऊन बोलायला हवं होते..."
17
ऑस्ट्रेलियात भारतीयांविरोधात हजारो स्थानिक लोक रस्त्यावर उतरले; नेमके काय घडले?
18
टाकळगावचे लढवय्या विजयकुमार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; आई, पत्नी अन् मुलांनी फोडला हंबरडा
19
Maratha Morcha: मनोज जरांगेंच्या मागण्यांवर मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत काय झाला निर्णय?
20
चीन-भारत संबंधांना तिसऱ्या देशाच्या नजरेची गरज नाही, मोदी आणि जिनपिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले

निर्यात बंद करून साठेबाजांवर कारवाई!

By admin | Updated: March 4, 2016 02:16 IST

आधारभूत किमतीत वाढ करण्याची गरज : तुरीचे भाव गडगडले!

वाशिम : देशात तुरीच्या पिकाला चांगले भाव मिळत असतानाच शासनाच्या वतीने निर्यात बंदी करण्यात आली, तसेच तुरीची साठवणूक करणार्‍या साठेबाजांवरही कारवाई करण्यात आल्याने तुरीचे भाव गडगडले.तुरीचे भाव प्रति क्विंटल तेरा हजार रुपयांवर गेले असताना डाळींचे भाव प्रति किलो २00 रुपये झाले होते. डाळींचे भाव वाढल्यामुळे ग्राहकांकडून सर्वत्र ओरड व्हायला लागली. प्रसिद्धी माध्यमांनीही भाववाढीच्या मुद्याला हवा दिल्याने महागाईचा भडका उडाल्याचा आरोप विरोधकांनी केला. परिणामी, शासनाने तुरीच्या निर्यातीवर बंदी आणली. ग्राहकांचे हित जोपासण्यासाठी शासनाने शेतकर्‍यांच्या हिताकडे दुर्लक्ष केले. वाढत्या डाळींच्या भावाचा तुरीच्या भाववाढीशी प्रत्यक्ष संबंध नाही. तुरीच्या व डाळींच्या भावात बरीच तफावत आहे. या भाववाढीचा मलिदा व्यापारी व उद्योजकांनीच लाटला असून, बदनाम मात्र शेतकर्‍यांना करण्यात आले. तुरीचे भाव जास्त असताना व्यापारी खरेदी करीत होते; मात्र याचदरम्यान शासनाने तुरीची साठेबाजी करणार्‍या व्यापार्‍यांवर धाडी टाकल्या. त्यामुळे व्यापार्‍यांनी तुरीची खरेदीच बंद केली. तुरीला खरीददारच राहिले नसल्यामुळे शेतकर्‍यांकडे तूर पडून राहिली. परिणामी, तुरीचे भाव पडले. शासन सर्वच पिकांचे हमीभाव हे अत्यल्प ठेवते.