शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

राज्यात चिमुकले गंभीर आजारांच्या विळख्यात !

By admin | Updated: May 31, 2014 00:50 IST

शालेय आरोग्य तपासणी मोहिमेतून समोर आलेली माहिती

संतोष वानखडे / वाशिम

बदलत्या जीवनशैलीने विविध आजार व त्यासंबंधीचे वयोगट, याबाबतचे अंदाज व संकेत पूर्णत: बदलून टाकले असल्याची माहिती शालेय आरोग्य तपासणी मोहिमेतून समोर आली आहे. मेंदुविकार, हृदयरोग, कर्करोगासारख्या गंभीर आजारांना सहा ते १४ वर्षे वयोगटातील बालकांना पछाडले असून, त्यापैकी काहींवर मोठय़ा शस्त्रक्रियाही कराव्या लागल्या आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान व सर्व शिक्षा मोहिमेंतर्गत ग्रामीण भागातील पहिली ते दहावी आणि शहरी भागातील पहिली ते चवथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय आरोग्य तपासणी मोहीम २00८-0९ पासून राज्यभरात सुरू आहे. या मोहिमेंतर्गत विद्यार्थ्यांमधील गंभीर आजार शोधून त्यांच्यावर मोफत उपचार केले जातात. मनोविकार, मेंदुविकार, रक्तक्षय, रक्ताभिसरण, हृदयरोग, कर्करोग, नेत्ररोग, कर्णरोग, श्‍वासोछ्वास, त्वचारोग, अस्थिरोग, पचनक्रिया, दंतक्षय आदी गंभीर आजार विद्यार्थ्यांना आपल्या विळख्यात घेत असल्याचे या मोहिमेतून समोर आले आहे. २00८ ते १३ या सहा वर्षांमध्ये सात हजार ९१ विद्यार्थ्यांवर हृदय शस्त्रक्रिया तर २८ हजार ६११ विद्यार्थ्यांवर मोठय़ा शस्त्रक्रिया झाल्या आहेत. २0१३ मधील आजारासंबंधीच्या निश्‍चित आकड्यांची गोळाबेरीज समोर येण्यास अजून वेळ आहे. ही तपासणी केवळ शालेय विद्यार्थ्यांसाठी असल्याने, शाळाबाह्य मुलांची अवस्था काय असेल, हे स्पष्ट झालेले नाही. गंभीर आजाराला बळी पडलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण पाहता वैद्यकीय क्षेत्र आणि पालकवर्गासाठी हा चिंतेचा विषय आहे. पाल्याचा आहार, पोषणयुक्त अन्न, नियमित आरोग्य तपासणी आदी गरजा या मोहिमेने अधोरेखित केल्या आहेत.