शहरं
Join us  
Trending Stories
1
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
2
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
3
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
4
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
5
Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
6
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
7
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
8
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
9
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
10
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
11
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
12
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
13
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
14
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
15
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
16
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
17
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
18
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
19
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
20
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
Daily Top 2Weekly Top 5

शहरात धूर फवारणी सुरू; ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:44 IST

ग्रामीण भागात ग्रामपंचायत व शहरासाठी नगर परिषदेच्या आरोग्य विभागाची प्रशासकीय यंत्रणा नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कार्यरत असते. मात्र पावसाळ्यात ...

ग्रामीण भागात ग्रामपंचायत व शहरासाठी नगर परिषदेच्या आरोग्य विभागाची प्रशासकीय यंत्रणा नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कार्यरत असते. मात्र पावसाळ्यात जागोजागी सांडपाणी व गावालगत पाण्याचे डबके साचलेले आढळून येते. बहुतांश गावांत नालेसफाईची कामे होत नसल्याने डासांच्या प्रमाणात वाढ होऊन आजाराला आयतेच निमंत्रण मिळत आहे. कोरोनामुळे अगोदरच शहरी भागासह ग्रामीण भागातील नागरिक हैराण आहेत. त्यातच पावसाळ्याचे दिवस असल्याने शेतकरी, शेतमजुरांची आर्थिक व्यवस्था पुरती कोलमडलेली असताना आरोग्याचा खेळ मात्र आर्थिक संकटात टाकत असल्याचे चित्र आहे. ग्रामपंचायतीच्या प्रशासनाकडून अजूनपर्यंत डासांच्या संख्येत होणारी लक्षणीय वाढ व त्यामुळे उद्भवणारे आजार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना केली नसल्याचे तालुक्यात बोलले जात आहे. गावागावांत पूर्वी होत असलेल्या फवारणीमुळे डासांचा प्रादुर्भाव कमी होऊन आरोग्यावर अंकुश मिळत असे; मात्र अलीकडे हा प्रकार कायमचा बंद झाल्याचे दिसून येत असल्याने आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होताना दिसत आहे . प्रशासकीय यंत्रणेकडून ठोस उपाययोजनेची गरज असताना मात्र तसे होताना दिसत नसल्याने ग्रामस्थांचे आराेग्य धाेक्यात आले आहे.

.....

ग्रामपंचायतींनी लक्ष देण्याची मागणी

ग्रामीण भागात वाढत असलेले आजार लक्षात घेता गावागावांत धूरफवारणी करण्यासाठी ग्रामपंचायतींनी लक्ष देण्याची तसेच याकडे वरिष्ठांनीही लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून हाेत आहे.