शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

जिल्ह्यात फवारणी, डवरणीला वेग

By admin | Updated: July 3, 2017 02:31 IST

जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस : २ जुलैपर्यंत १८० मिलीमीटर पावसाची नोंद

वाशिम : मागील १५ दिवस दडी मारलेल्या पावसाने जिल्ह्यात पुन्हा हजेरी लावली आहे. त्यामुळे उर्वरित पेरणीला प्रारंभ झाला असून, यापूर्वी पेरणी केलेल्या पिकांनाही आधार मिळाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. जिल्ह्यात ३० जूनपर्यंत सरासरी २१३ मिमी पावसाची नोंद झाली असली, तरी सार्वत्रिक स्वरूपाचा आणि सातत्यपूर्ण पाऊस नसल्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे उगवले नाही, तर अनेक ठिकाणी पिके सुकण्याच्या मार्गावर होती. ही परिस्थिती पाहून काही शेतकऱ्यांनी पेरणीही स्थगित केली होती. कृषी विभागाच्या अहवालानुसार २८ जूनपर्यंत जिल्ह्यात ७० टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली होती. आता मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे प्राप्त आकडेवारीनुसार २ जुलैपर्यंत जिल्ह्यात सरासरी १८०.६३ मिमी पाऊस अपेक्षित असताना तब्बल २३४ मिमी पावसाची नोंद झाली. त्यातही मागील दोन दिवसांत सार्वत्रिक पाऊस पडला. त्यातच जुलै महिन्याच्या पहिल्याच दोन दिवसांत जिल्ह्यात सर्वदूर समाधानकारक पावसाची नोंद झाली. त्यात एकाच दिवसातील २० मिमी पावसाच्या नोंदीचा समावेश आहे. त्यापूर्वी झालेल्या पावसाने तगलेल्या पिकांना आता या पावसामुळे मोठा आधार मिळाला असून, शेतकऱ्यांनी खते देण्यासह फवारणीची कामेही सुरू केली आहेत, तर पेरणी खोळंबलेल्या भागात पेरणीला प्रारंभ झाल्याचे दिसत आहे. एकंदरित चित्र पाहता जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पडलेला पाऊस पिकांना संजीवनी देणारा ठरलेला असून, यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाच्या पुनरागमनानंतर जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी उसळल्याचे दिसत आहे.