शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

जिल्ह्यात फवारणी, डवरणीला वेग

By admin | Updated: July 3, 2017 02:31 IST

जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस : २ जुलैपर्यंत १८० मिलीमीटर पावसाची नोंद

वाशिम : मागील १५ दिवस दडी मारलेल्या पावसाने जिल्ह्यात पुन्हा हजेरी लावली आहे. त्यामुळे उर्वरित पेरणीला प्रारंभ झाला असून, यापूर्वी पेरणी केलेल्या पिकांनाही आधार मिळाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. जिल्ह्यात ३० जूनपर्यंत सरासरी २१३ मिमी पावसाची नोंद झाली असली, तरी सार्वत्रिक स्वरूपाचा आणि सातत्यपूर्ण पाऊस नसल्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे उगवले नाही, तर अनेक ठिकाणी पिके सुकण्याच्या मार्गावर होती. ही परिस्थिती पाहून काही शेतकऱ्यांनी पेरणीही स्थगित केली होती. कृषी विभागाच्या अहवालानुसार २८ जूनपर्यंत जिल्ह्यात ७० टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली होती. आता मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे प्राप्त आकडेवारीनुसार २ जुलैपर्यंत जिल्ह्यात सरासरी १८०.६३ मिमी पाऊस अपेक्षित असताना तब्बल २३४ मिमी पावसाची नोंद झाली. त्यातही मागील दोन दिवसांत सार्वत्रिक पाऊस पडला. त्यातच जुलै महिन्याच्या पहिल्याच दोन दिवसांत जिल्ह्यात सर्वदूर समाधानकारक पावसाची नोंद झाली. त्यात एकाच दिवसातील २० मिमी पावसाच्या नोंदीचा समावेश आहे. त्यापूर्वी झालेल्या पावसाने तगलेल्या पिकांना आता या पावसामुळे मोठा आधार मिळाला असून, शेतकऱ्यांनी खते देण्यासह फवारणीची कामेही सुरू केली आहेत, तर पेरणी खोळंबलेल्या भागात पेरणीला प्रारंभ झाल्याचे दिसत आहे. एकंदरित चित्र पाहता जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पडलेला पाऊस पिकांना संजीवनी देणारा ठरलेला असून, यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाच्या पुनरागमनानंतर जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी उसळल्याचे दिसत आहे.