शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

जिल्ह्यात फवारणी, डवरणीला वेग

By admin | Updated: July 3, 2017 02:31 IST

जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस : २ जुलैपर्यंत १८० मिलीमीटर पावसाची नोंद

वाशिम : मागील १५ दिवस दडी मारलेल्या पावसाने जिल्ह्यात पुन्हा हजेरी लावली आहे. त्यामुळे उर्वरित पेरणीला प्रारंभ झाला असून, यापूर्वी पेरणी केलेल्या पिकांनाही आधार मिळाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. जिल्ह्यात ३० जूनपर्यंत सरासरी २१३ मिमी पावसाची नोंद झाली असली, तरी सार्वत्रिक स्वरूपाचा आणि सातत्यपूर्ण पाऊस नसल्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे उगवले नाही, तर अनेक ठिकाणी पिके सुकण्याच्या मार्गावर होती. ही परिस्थिती पाहून काही शेतकऱ्यांनी पेरणीही स्थगित केली होती. कृषी विभागाच्या अहवालानुसार २८ जूनपर्यंत जिल्ह्यात ७० टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली होती. आता मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे प्राप्त आकडेवारीनुसार २ जुलैपर्यंत जिल्ह्यात सरासरी १८०.६३ मिमी पाऊस अपेक्षित असताना तब्बल २३४ मिमी पावसाची नोंद झाली. त्यातही मागील दोन दिवसांत सार्वत्रिक पाऊस पडला. त्यातच जुलै महिन्याच्या पहिल्याच दोन दिवसांत जिल्ह्यात सर्वदूर समाधानकारक पावसाची नोंद झाली. त्यात एकाच दिवसातील २० मिमी पावसाच्या नोंदीचा समावेश आहे. त्यापूर्वी झालेल्या पावसाने तगलेल्या पिकांना आता या पावसामुळे मोठा आधार मिळाला असून, शेतकऱ्यांनी खते देण्यासह फवारणीची कामेही सुरू केली आहेत, तर पेरणी खोळंबलेल्या भागात पेरणीला प्रारंभ झाल्याचे दिसत आहे. एकंदरित चित्र पाहता जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पडलेला पाऊस पिकांना संजीवनी देणारा ठरलेला असून, यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाच्या पुनरागमनानंतर जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी उसळल्याचे दिसत आहे.