शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

जिल्हा वार्षिक योजनेचा निधी तत्काळ खर्च करा

By admin | Updated: November 6, 2014 01:20 IST

वाशिम जिल्हाधिका-यांचा आदेश : विकास कामांचा आढावा.

वाशिम : जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजन व आदिवासी उपयोजना आदी योजनांमधून सन २0१४-१५ साठी विविध विकास कामे व योजनांसाठी प्राप्त झालेला निधी कोणत्याही परिस्थितीत नोव्हेंबर अखेरपयर्ंत खर्ची पाडावा, असे आदेश जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांनी दिले. या कालावधीत निधी खर्च न झाल्यास शिल्लक निधी परत घेण्याबाबत विचार करावा लागेल, असा इशाराही यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा वार्षिक योजना २0१४-१५ च्या आढावा बैठकीत ते बोलत होते.या बैठकीला जिल्हा नियोजन अधिकारी सु. ना. गवळी, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त एम.जी. वाठ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक वानखेडे, जिल्हा उपनिबंधक खाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. डी. पाडेवार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी राजेश पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बालासाहेब बोराडे, जिल्हा प्रशासन अधिकारी प्रणाली घोंगे यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख व प्रतिनिधी उपस्थित होते.जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्हा वार्षिक नियोजन अंतर्गत मंजूर करण्यात आलेला व संबंधित कार्यालयांना प्राप्त झालेला निधी प्रस्तावित योजनांवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी सर्व प्रशासकीय विभागांनी प्राधान्य द्यावे. तसेच काही विभागांना निधी देण्यात येवूनही त्यांनी त्याचा खचार्ला प्रशासकीय मान्यता घेतलेली नाही. अशा विभागांनी १५ नोव्हेंबरपयर्ंत तातडीने खर्चाची मान्यता घेऊन निधी खर्च करण्याच्या दृष्टीने तत्काळ कार्यवाही करावी, अन्यथा या विभागांना देण्यात आलेला निधी परत घेण्याचा विचार करावा लागेल.