वाशिम : खरीप हंगाम आता तोंडावर येत आहे. रखरखत्या उन्हात जिल्हय़ातील शेतकरी पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण करण्याच्या तयारीत असून, शेतकर्यांची बी- बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करण्यासाठी धावपळ सुरू झाली असून, बियाण्यांसाठी मात्र भटकंती करण्याची वेळ आली आहे. गतवर्षी कधी दुष्काळी, तर कधी अतवृष्टीने शेतकर्यांचे कंबरडे मोडले तरी शेतकरी नव्या जोमाने, नव्या दमाने शेतीच्या मशागतीस भिडला आहे. बहुतांशी शेतकर्यांनी आधुनिक तंत्नज्ञानाची कास धरून ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरणी, वखरणी करून जास्त वेळ व जास्त घाम न गाळता शेतीची पेरणीपूर्व मशागत करण्यास सुरुवात केली आहे. तर अल्पभूधारक शेतकरी आपल्या पारंपरिक पद्धतीने शेतीची मशागत करताना दिसून येत आहे. जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणात सोयाबीन पिकांची लागवड केली जाते; मात्र गतवर्षी सोयाबीनच्या उत्पन्नात मोठय़ा प्रमाणात घट झाल्याने शेतकरी पार खचलेला दिसून येत आहे. बाजारात सोयाबीन बियाणे मिळत नसल्याने घरगुती बियाण्यांवर शेतकर्यांचा जोर दिसून येत आहे. तसेच कृषी विभागाच्यावतीनेही बियाण्यांची टंचाई पाहता घरगुती बियाण्यांचा वापर करण्याचे आवाहन केल्या जात आहे; मात्र सर्वच शेतकर्यांकडे घरगुती बियाणे नसल्याने ते बियाण्यांची शोधाशोध घेताना दिसून येत आहेत. परजिल्हय़ातील काही शेतकरी सोयाबीन बियाणे विकत घेऊन जात आहेत. जिल्हय़ातील बियाणे जिल्हय़ातील शेतकर्यांना द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
मशागतींच्या कामांना वेग
By admin | Updated: May 29, 2015 02:32 IST