शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

परतीच्या पावसाचा सोयाबीनला फटका!

By admin | Updated: October 2, 2016 02:29 IST

वाशिम जिल्ह्यातील शेतकरी हतबल; सोंगलेल्या सोयाबीनला फुटताहेत ‘कोंब’.

वाशिम, दि. 0१- सलग तीन वर्षे दुष्काळाचा सामना करणार्‍या शेतकर्‍यांवरील अस्मानी-सुलतानी संकटांची शृंखला यावर्षीही कायम आहे. मध्यंतरीचा प्रदीर्घ उघाड आणि ऐन सोंगणी हंगामात २९ आणि ३0 सप्टेंबरला झालेल्या परतीच्या पावसाने खरिपातील मुख्य पीक म्हणून ओळखल्या जाणार्‍या सोयाबीनला जबर फटका बसला आहे. सोबतच कपाशी आणि उडीद ही पिकेही धोक्याच्या सावटात सापडली आहेत.२0१३-१५ या तीन वर्षाच्या तुलनेत यंदा सर्वदूर दमदार पाऊस झाला; मात्र त्याचा शेतकर्‍यांना फायदा होण्याऐवजी अधिकांश प्रमाणात नुकसानच होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. जून महिन्यात शेवटच्या आठवड्यापासून चांगली सुरुवात करणार्‍या पावसाने मध्यंतरी दीर्घ दडी मारल्यामुळे सोयाबीनसोबतच खरिपातील इतर पिकेही करपायला लागली होती; तर अनेक ठिकाणचे सोयाबीन पिवळे पडले होते. अशाही स्थितीत तग धरून असलेल्या जिल्हय़ातील शेतकर्‍यांनी आर्थिक चणचण भासत असतानाही पैशांची जुळवाजुळव करून सोयाबीनच्या सोंगणीचे काम हाती घेतले. सुमारे २५ टक्के शेतकर्‍यांनी सोयाबीनच्या सुड्या शेतशिवारांमध्ये रचून ठेवल्या; मात्र २९ व ३0 सप्टेंबरला झालेल्या पावसामुळे सोंगलेले सोयाबीन बहुतांशी भिजले असून त्यास ह्यकोंबह्ण फुटत असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. यासह उडीद आणि कपाशी या पिकांनाही परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. वातावरणातील असमतोलामुळे कपाशी या पिकावर ह्यमरह्ण रोगाचा प्रादुर्भाव झाला असून ऐन काढणीच्या मोसमात उडीद पिकाला अधिक पावसामुळे नुकसान संभवत असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.