शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

सोयाबीनच्या झाडांवरच उगवताहेत सोयाबीनची रोपे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:44 IST

दरवर्षीप्रमाणे यंदाही खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून शेतकऱ्यांच्या मागे लागलेली नैसर्गिक संकटे कायमच आहेत. त्यामुळे एखादेतरी पीक पूर्णपणे शेतकऱ्याच्या हाती ...

दरवर्षीप्रमाणे यंदाही खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून शेतकऱ्यांच्या मागे लागलेली नैसर्गिक संकटे कायमच आहेत. त्यामुळे एखादेतरी पीक पूर्णपणे शेतकऱ्याच्या हाती येते की नाही अशी शंकाच निर्माण झाली आहे. अवर्षण, अतिवृष्टी, किडींचा प्रादुर्भाव या सर्व आपत्तींनी शेतकऱ्यांना यंदाही बेजार केले आहे. मूग, उडीद, कपाशी सर्वच पिकांना या आपत्तींचा फटका बसला. त्यात सप्टेंबरच्या मध्यंतरापर्यंत नैसर्गिक आपत्तींचा सामना करून सावरलेले सोयाबीन पीक आता परतीच्या पावसाने पिच्छा पुरविल्याने संकटात सापडले आहे. सततच्या पावसामुळे परिपक्व झालेल्या सोयाबीनच्या शेंगांना अंकूर फुटून झाडावरच सोयाबीनची रोपे दिसू लागली आहेत. हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकावर हा प्रकार होत असल्याने शेतकरी मोठ्याच आर्थिक संकटात सापडला आहे.

०००००००००००००००००००

कापणीची अन् वाळविण्याचीही संधी नाही

बहुतांश ठिकाणी सोयाबीन पिकाच्या शेंगा सुकण्याच्या स्थितीत असल्याने शेतकरी पिकाची कापणी करण्याच्या तयारीत होते; परंतु गेल्या चार, पाच दिवसांपासून पाऊस उसंतच घेत नसल्याने हजारो शेतकऱ्यांना सोयाबीन कापणीची अन् वाळविण्याचीही संधीही मिळू शकली नाही.

००००००००००००००००

गुरांच्या चाऱ्यासाठीही उपयोग नाही

सततच्या पावसामुळे अनेक भागातील साेयाबीन पिकाची स्थिती एवढी वाईट झाली आहे की, या पिकाची कापणी करून त्यापासून थोडेथोडके पैसे मिळण्याची शक्यता दूरच, गुरांना चारा म्हणूनही हे पीक उपयोगी पडण्याची शक्यता उरली नाही.

०००००००००००००००००००००

शेतकरी म्हणतात, मायबाप शासन मदत देईल का ?

१) कोट : गेल्या चार, पाच दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने सोयाबीनचा सत्यानाश केला. यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नच गंभीर झाला. उत्पन्नाची कोणती आस नाही. आता मायबाप शासन या नुकसानापोटी मदत देईल का?

- प्रीतम भगत,

शेतकरी,

०००००००००००००००

२) कोट : गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने सोयाबीनचे पीक होत्याचे नव्हतेच केले. या पिकावर संपूर्ण खर्चाची आणि कुटुुंबांची मदार होती. आता उत्पन्नाची कोणती आशा नाही. शासनाने या नुकसानीचे पंचनामे करून आम्हाला आर्थिक मदत द्यावी.

- डिगांबर उपाध्ये,

शेतकरी,

००००००००००००००००००

शासनाकडे अहवाल पाठवू

कोट: सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याचे पंचनामे नियमानुसार होतील, तसेच या पिकाच्या शेंगांना फुटलेल्या अंकुराची स्थिती पाहता, सहकाऱ्यांना पाहणीच्या सूचना देऊन शासनाकडे अहवाल पाठवून मदतीचा विचार करण्याचीही मागणी करू.

-शंकर तोटावार,

जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, वाशिम