शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
3
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
4
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
5
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
6
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
7
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
8
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
9
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
10
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
11
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले १३ हजार अश्लील फोटो, मुंबई पोलिसांनाही बसला धक्का
12
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
13
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
14
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
15
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
16
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
17
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
18
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
19
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
20
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या

सोयाबीनच्या झाडांवरच उगवताहेत सोयाबीनची रोपे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:44 IST

दरवर्षीप्रमाणे यंदाही खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून शेतकऱ्यांच्या मागे लागलेली नैसर्गिक संकटे कायमच आहेत. त्यामुळे एखादेतरी पीक पूर्णपणे शेतकऱ्याच्या हाती ...

दरवर्षीप्रमाणे यंदाही खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून शेतकऱ्यांच्या मागे लागलेली नैसर्गिक संकटे कायमच आहेत. त्यामुळे एखादेतरी पीक पूर्णपणे शेतकऱ्याच्या हाती येते की नाही अशी शंकाच निर्माण झाली आहे. अवर्षण, अतिवृष्टी, किडींचा प्रादुर्भाव या सर्व आपत्तींनी शेतकऱ्यांना यंदाही बेजार केले आहे. मूग, उडीद, कपाशी सर्वच पिकांना या आपत्तींचा फटका बसला. त्यात सप्टेंबरच्या मध्यंतरापर्यंत नैसर्गिक आपत्तींचा सामना करून सावरलेले सोयाबीन पीक आता परतीच्या पावसाने पिच्छा पुरविल्याने संकटात सापडले आहे. सततच्या पावसामुळे परिपक्व झालेल्या सोयाबीनच्या शेंगांना अंकूर फुटून झाडावरच सोयाबीनची रोपे दिसू लागली आहेत. हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकावर हा प्रकार होत असल्याने शेतकरी मोठ्याच आर्थिक संकटात सापडला आहे.

०००००००००००००००००००

कापणीची अन् वाळविण्याचीही संधी नाही

बहुतांश ठिकाणी सोयाबीन पिकाच्या शेंगा सुकण्याच्या स्थितीत असल्याने शेतकरी पिकाची कापणी करण्याच्या तयारीत होते; परंतु गेल्या चार, पाच दिवसांपासून पाऊस उसंतच घेत नसल्याने हजारो शेतकऱ्यांना सोयाबीन कापणीची अन् वाळविण्याचीही संधीही मिळू शकली नाही.

००००००००००००००००

गुरांच्या चाऱ्यासाठीही उपयोग नाही

सततच्या पावसामुळे अनेक भागातील साेयाबीन पिकाची स्थिती एवढी वाईट झाली आहे की, या पिकाची कापणी करून त्यापासून थोडेथोडके पैसे मिळण्याची शक्यता दूरच, गुरांना चारा म्हणूनही हे पीक उपयोगी पडण्याची शक्यता उरली नाही.

०००००००००००००००००००००

शेतकरी म्हणतात, मायबाप शासन मदत देईल का ?

१) कोट : गेल्या चार, पाच दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने सोयाबीनचा सत्यानाश केला. यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नच गंभीर झाला. उत्पन्नाची कोणती आस नाही. आता मायबाप शासन या नुकसानापोटी मदत देईल का?

- प्रीतम भगत,

शेतकरी,

०००००००००००००००

२) कोट : गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने सोयाबीनचे पीक होत्याचे नव्हतेच केले. या पिकावर संपूर्ण खर्चाची आणि कुटुुंबांची मदार होती. आता उत्पन्नाची कोणती आशा नाही. शासनाने या नुकसानीचे पंचनामे करून आम्हाला आर्थिक मदत द्यावी.

- डिगांबर उपाध्ये,

शेतकरी,

००००००००००००००००००

शासनाकडे अहवाल पाठवू

कोट: सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याचे पंचनामे नियमानुसार होतील, तसेच या पिकाच्या शेंगांना फुटलेल्या अंकुराची स्थिती पाहता, सहकाऱ्यांना पाहणीच्या सूचना देऊन शासनाकडे अहवाल पाठवून मदतीचा विचार करण्याचीही मागणी करू.

-शंकर तोटावार,

जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, वाशिम