शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

सोयाबीनचे भाव गडगडले!

By admin | Updated: October 29, 2014 23:50 IST

हमीभावाने मोडले शेतक-यांचे कंबरडे; हमीभाव प्रति क्विंटल २५६0 रूपयांवर स्थिर.

अकोला : सतत दोन वर्षापासून सोयाबीन उत्पादकांच्या पदरी निराशाच येत असून, उत्पादन आणि सोयाबीनचा उतारा कमी झाल्याने उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. या परिस्थितीत हमीभाव शेतकर्‍यांना तारतील, अशी अपेक्षा होती; परंतु हमीभावातही यावर्षी वाढ झाली नसून, बाजारपेठेत सोयाबीनचे भाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.गतवर्षी अतवृष्टीमुळे सोयाबीनचे पीक हातचे गेले. यावर्षी पाऊसच नसल्याने त्याचा फटका सोयाबीनला बसला. गतवर्षी सोयाबीन काळे पडल्याने, यावर्षी बियाण्यांसाठीही शेतकर्‍यांना संघर्ष करावा लागला. कसेबसे मिळालेले बियाणे मोठय़ा प्रमाणात वांझ निघाल्याने शेतकर्‍यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. किटकनाशकांच्या फवारणींचा अतिरिक्त खर्चही वाढला. त्या तुलनेत उत्पादन मात्र झाले नाही. किमान उत्पादन खर्च तरी निघेल, या अपेक्षेत शेतकरी असताना, बाजारपेठेत सोयाबीनचे भाव प्रति क्विंटल २५00 ते २९00 रूपयांपेक्षा जास्त सरकत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. यावर्षी पाऊस नसल्याने सोयाबीन परपिक्वतेपूर्वीच वाळले आहे. त्यामुळे सोयाबीन शेंगाची वाढ खुंटली. त्याच आधारावर व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांच्या सोयाबीनची लूट सुरू आहे. एकीकडे सोयाबीन उत्पादन कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे, दुसरीकडे बाजारात भाव पडले आहेत. या चक्रामुळे शेतकरी संभ्रमात सापडला आहे. सतत दोन वर्षाच्या नुकसानामुळे यावर्षी सोयाबीन घरी साठवून ठेवण्यासारखी शेतकर्‍यांची परिस्थितीच नाही. त्यामुळे शेतात काढलेले सोयाबीन थेट बाजारात विक्रीसाठी जात असून, त्याचे परिणाम पुढील वर्षीही जाणवणार आहेत. हमीभावाने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. गतवर्षीपर्यंत सोयाबीनच्या हमीभावात वाढ करण्यात आली; परंतु यावर्षी वाढच झाली नसल्याने सोयाबीनचे हमीभाव प्रति क्विंटल २५६0 रूपयांवर स्थिरावले आहे. त्याचाही फटका शेतकर्‍यांना सोसावा लागत आहे.