शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

सोयाबीनचे भाव गडगडले!

By admin | Updated: October 29, 2014 23:50 IST

हमीभावाने मोडले शेतक-यांचे कंबरडे; हमीभाव प्रति क्विंटल २५६0 रूपयांवर स्थिर.

अकोला : सतत दोन वर्षापासून सोयाबीन उत्पादकांच्या पदरी निराशाच येत असून, उत्पादन आणि सोयाबीनचा उतारा कमी झाल्याने उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. या परिस्थितीत हमीभाव शेतकर्‍यांना तारतील, अशी अपेक्षा होती; परंतु हमीभावातही यावर्षी वाढ झाली नसून, बाजारपेठेत सोयाबीनचे भाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.गतवर्षी अतवृष्टीमुळे सोयाबीनचे पीक हातचे गेले. यावर्षी पाऊसच नसल्याने त्याचा फटका सोयाबीनला बसला. गतवर्षी सोयाबीन काळे पडल्याने, यावर्षी बियाण्यांसाठीही शेतकर्‍यांना संघर्ष करावा लागला. कसेबसे मिळालेले बियाणे मोठय़ा प्रमाणात वांझ निघाल्याने शेतकर्‍यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. किटकनाशकांच्या फवारणींचा अतिरिक्त खर्चही वाढला. त्या तुलनेत उत्पादन मात्र झाले नाही. किमान उत्पादन खर्च तरी निघेल, या अपेक्षेत शेतकरी असताना, बाजारपेठेत सोयाबीनचे भाव प्रति क्विंटल २५00 ते २९00 रूपयांपेक्षा जास्त सरकत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. यावर्षी पाऊस नसल्याने सोयाबीन परपिक्वतेपूर्वीच वाळले आहे. त्यामुळे सोयाबीन शेंगाची वाढ खुंटली. त्याच आधारावर व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांच्या सोयाबीनची लूट सुरू आहे. एकीकडे सोयाबीन उत्पादन कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे, दुसरीकडे बाजारात भाव पडले आहेत. या चक्रामुळे शेतकरी संभ्रमात सापडला आहे. सतत दोन वर्षाच्या नुकसानामुळे यावर्षी सोयाबीन घरी साठवून ठेवण्यासारखी शेतकर्‍यांची परिस्थितीच नाही. त्यामुळे शेतात काढलेले सोयाबीन थेट बाजारात विक्रीसाठी जात असून, त्याचे परिणाम पुढील वर्षीही जाणवणार आहेत. हमीभावाने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. गतवर्षीपर्यंत सोयाबीनच्या हमीभावात वाढ करण्यात आली; परंतु यावर्षी वाढच झाली नसल्याने सोयाबीनचे हमीभाव प्रति क्विंटल २५६0 रूपयांवर स्थिरावले आहे. त्याचाही फटका शेतकर्‍यांना सोसावा लागत आहे.