शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

सोयाबीनच्या गंजीला आग; लाखोंचे नुकसान

By admin | Updated: October 25, 2014 00:13 IST

मंगरुळपीर तालुक्यातील माळशेलू येथील घटना, अज्ञात व्यक्तीने लावली आग.

मंगरुळपीर (वाशिम ) :तालुक्यातील ग्राम माळशेलू येथे साडेनऊ एकरातील सोयाबीनच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावून पेटवून दिल्याची घटना २४ रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. या आगीत सदर शेतकर्‍यांचे १ लाख ८२ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा तलाठय़ांनी केला आहे.माळशेलू येथील निलेश विठ्ठलराव धामंदे, उमेश विठ्ठलराव धामंदे, रूख्माबाई धामंदे यांच्या मालकीच्या साडेनऊ एकरातील सोंगुन ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावून पेटवून दिले. या आगीत ५0 क्विंटल सोयाबीन १ लाख ५0 हजार, २८ हजारांचे स्प्रिंकलर पाईप व ४ हजाराची ताडपत्री असा एकूण १ लाख ८२ हजाराचे सोयाबीन व साहित्य जळुन खाक झाले, असा पंचनामा तलाठी पी.बी मोरे यांनी केला आहे. सदर शेतकरी मोलमजुरीने दुसर्‍यांच्या शेतात सोयाबीन सोंगणीसाठी गेले होते. त्याच्या शेतातील सोयाबीनच्या गंजीला आग लागल्याचे समजल्यानंतर त्यांनी शेताकडे धाव घेतली; मात्र ते तेथे पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली होती.