शहरं
Join us  
Trending Stories
1
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
2
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
3
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
4
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
5
अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय
6
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”
7
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
8
अदला बदली! माझं घर तुझं, तुझं घर माझं, होम-स्वॅपिंगचा नवा ट्रेंड; मोफत राहण्यासाठी भन्नाट 'जुगाड'
9
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
10
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
11
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
12
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
13
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
14
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
15
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
16
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
17
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
18
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
19
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
20
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
Daily Top 2Weekly Top 5

१.५ लाख हेक्टरवरील सोयाबीन सुकले!

By admin | Updated: September 14, 2016 02:19 IST

वीज भारनियमनाचा फटका; सिंचनाभावी पीक वाचविण्याचे प्रयत्न निष्फळ.

वाशिम, दि. १३ : खरीप हंगामातील पिकांना पाणी देता यावे, यासाठी कृषी पंपांना सलग १२ तास वीज पुरवठा करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली; मात्र वाशिम जिल्ह्यात आजही सलग १२ तास, तेही दिवसाच्या सुमारास विजेचे भारनियमन सुरूच आहे. परिणामी, शेतशिवारातील जलस्त्रोत, तलाव, विहिरी पाण्याने तुडूंब भरलेल्या असतानाही, खरीप हंगामातील पिके वाचविण्यासाठी शेतकर्‍यांनी चालविलेली धडपड पूर्णत: निष्फळ ठरली असून, सुमारे १.५ लाख हेक्टरवरील सोयाबीन सुकले आहे. वाशिम जिल्ह्यात अधिकांश शेती कोरडवाहू स्वरूपातील असल्याने खरीप हंगामातील पिकांचे भवितव्य पावसाच्या पाण्यावरच विसंबून असते. दरम्यान, २0१३-२0१५ या तीन वर्षांच्या तुलनेत यावर्षी चांगला पाऊस झाल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. सोयाबीन, तूर, उडीद, मूग, कपाशी आदी पिकांपासून किमान यंदातरी अपेक्षित उत्पन्न हाती पडून आर्थिक स्थिती सुधारेल, अशी आशा शेतकर्‍यांना लागली होती; मात्र गेल्या १५ ते २0 दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे खरिपातील सर्वच पिके धोक्यात सापडली आहेत. दुसरीकडे महावितरणनेही शेतकर्‍यांच्या अडचणींमध्ये नेहमीप्रमाणे यंदाही भर टाकण्याचाच प्रकार अवलंबिला असून, सध्या दिवसा १२ ते १३ तास विजेचे भारनियमन केले जात आहे. रात्रीच्या सुमारास विद्युत पुरवठा सुरळीत होतो; मात्र पिकांना पाणी देत असताना मध्येच तांत्रिक बिघाड उद्भवणे, रोहित्र जळून नादुरूस्त होणे, अधिक किंवा कमी विद्युत दाबामुळे मोटरपंप जळणे, आदींमध्ये वाढ झाल्याने शेतकरी अक्षरश: मेटाकुटीस आले आहेत. महावितरणने शेतकर्‍यांच्या अडचणी लक्षात घेऊन किमान पीक हाती येईस्तोवर तरी सुरळीत तथा अखंडित वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकर्‍यांमधून जोर धरत आहे. परिस्थिती ह्यजैसे थेह्ण राहिल्यास संपूर्ण पीक हातचे जाणार.. जिल्ह्यात यंदा २ लाख ८८ हजार ६३२ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आलेली आहे. दरम्यान, पावसाने मारलेली दीर्घ दडी आणि महावितरणने अवलंबिलेल्या अघोरी वीज भारनियमनामुळे यातील सुमारे १.५ लाख हेक्टरवरील उभे सोयाबीन पाण्याअभावी सुकले आहे. सोयाबीनची सोंगणी करण्यासाठी लागणारी मजुरीदेखील निघणार नाही, एवढी भीषण परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक शेतकर्‍यांनी सोयाबीनची सोंगणी न करताच थेट वखरणी करून पीक मोडून टाकायचे, असा निर्धार केला आहे. सध्याच्या परिस्थितीत आगामी आठ दिवसांत बदल न झाल्यास तथा शेतीला लागणारी वीज न मिळाल्यास संपूर्ण पीक हातचे जाईल, अशी भीती वर्तविण्यात येत आहे.