शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

शेतात पाणी शिरल्याने पेरण्या खोळंबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:53 IST

जिल्ह्यात १० ते १३ जूनदरम्यान मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकरीवर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. पावसापूर्वीच अनेक शेतकऱ्यांनी ...

जिल्ह्यात १० ते १३ जूनदरम्यान मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकरीवर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. पावसापूर्वीच अनेक शेतकऱ्यांनी मशागतीची कामे आटोपून पेरणीची तयारी केली. यासाठी शेतकऱ्यांनी बियाणे आणि खतांची खरेदीही करून ठेवली आहे; परंतु मृग नक्षत्राच्या पावसाने १० जून रोजीच रुद्र रुप धारण केले. सतत दीड तास पाऊस कोसळला. त्यामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले, तर नदी, नाल्याकाठी असलेल्या शेतात पाणी शिरून अनेकांची जमीन खरडून गेली. तर अनेकांच्या शेतात पाणीही साचले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्यातही खोळंबा निर्माण झाला आहे. दरम्यान, गुरुवार १० जून रोजी सायंकाळी ४ वाजल्यानंतर जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे अडाण, मडाण नदीला पूरही आला होता. या पुरामुळेच अडाण प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जलसाठा वाढला आणि अडाण प्रकल्पाच्या दोन दरवाजांतून ३ सेंटीमीटरचा विसर्गही करावा लागला.

------------------

खरडलेल्या जमिनीचे पंचनामे प्रलंबित

जिल्ह्यात ८ ते १० जूनदरम्यान आलेल्या जोरदार पावसाने काही शेतकऱ्यांची शेतजमीनच खरडून गेली. या शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मोठा खर्च करून मशागत करीत शेती पेरणीसाठी तयार केली होती. परंतु, पावसामुळे जमीनच खरडून गेल्याने आता ती जमीन पुन्हा पेरणीयोग्य करण्यासाठी त्यांना कसरत करावी लागणार आहे. या नुकसानाबाबत शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे निवेदन सादर करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे. तथापि, अद्यापही काही खरडलेल्या जमिनीचे पंचनामे पूर्ण होऊ शकले नाहीत.

===Photopath===

150621\15wsm_2_15062021_35.jpg

===Caption===

शेतात पाणी शिरल्याने पेरण्या खोळंबल्या