शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

संभाव्य अतिवृष्टीमुळे पेरणीची घाई करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:28 IST

तालुक्यात सर्वदूर खरीप पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण झाली असून, शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खत, रासायनिक औषध खरेदी अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांकडूनच करावी, ...

तालुक्यात सर्वदूर खरीप पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण झाली असून, शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खत, रासायनिक औषध खरेदी अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांकडूनच करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. साधारणत: ७५ ते १०० मिलीमीटर पर्जन्यमान झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणीचे काम हाती घ्यावे, असे आवाहन करण्यात आले होते. दरम्यान, वाशिम जिल्ह्यात ९ जूनपर्यंतच ६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, १० जूनलाही सर्वत्र धुवाधार पाऊस कोसळला. पुढील काही दिवस हे चित्र असेच कायम राहणार असून, अतिवृष्टीचे संकेत वर्तविण्यात येत आहेत. अशा स्थितीत पेरणीची घाई केल्यास बियाणे वाहून जाण्याचा धोका आहे. असे झाल्यास पेरणी उलटून शेतकऱ्यांनी केलेला खर्च वाया जाऊ शकतो. राज्यस्तरावरूनदेखील शेतकऱ्यांनी दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी १७ जूनपर्यंत पिकांची पेरणी न करण्याचे सूतोवाच करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आताच पेरणीची कदापि घाई करू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.

......................

तालुक्यात सर्वदूर मुसळधार पाऊस

मानोरा तालुक्यात १० जून रोजी दुपारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यामुळे अरुणावती नदीला पूर येण्यासह नदी-नाले, ओढे वाहते झाले आहेत. अनेकांच्या शेतात पावसाचे पाणी साचले आहे. अशात पेरणीची घाई केल्यास बियाणे वाहून जाण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. ही बाब लक्षात घेता शेतकऱ्यांनी पेरणीबाबत सतर्क राहणे आवश्यक असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.