शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

वंचितांच्या आवाजाला साहित्याचे कोंदण!

By admin | Updated: February 20, 2016 02:19 IST

साहित्य संमेलनांमधून मिळाला ‘लिहिते व्हा!’चा संदेश!

वाशिम : आकाराने छोटा व विकासाच्या दृष्टीने अविकसित असलेला वाशिम जिल्हा, साहित्य चळवळीसाठी मात्र विदर्भात उजवा ठरतो. फेब्रुवारी महिन्यात पार पडलेल्या साहित्य संमेलने व व्याख्यानमालेने या सत्यावर मोहोर लावली आहे. गोर बंजारा समाजाचे अखिल भारतीय साहित्य संमेलन, अस्मितादर्श साहित्य संमेलन, शासनाच्या वतीने आयोजित ग्रंथोत्सव, सोळा वर्षांची परंपरा असलेली हरी व्याख्यानमाला तसेच शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांनी जिल्ह्यातील सर्वच स्तरातील साहित्य क्षेत्रात रंगत भरली. ६ व ७ फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संमेलन पार पडले. गोर बंजारा समाजाचे हे पहिले अखिल भारतीय साहित्य संमेलन असून, या संमेलनाने या चळवळीचा पाया वाशिममध्ये रोवल्या गेला आहे. या संमेलनात हजारोंच्या संख्येने बंजारा समाजातील साहित्यिक, कवी, प्राध्यापकांसह तांड्यातील नागरिकही सहभागी झाले होते. ह्यलिहिते व्हा!ह्ण, हा संदेश या संमेलनातून देण्यात आला. तसेच बंजारा भाषेचे संवर्धन हा मुख्य उद्देश समोर ठेवून पुढील दिशा ठरविण्यात आली. आजपर्यंत शिक्षणापासून दूर राहलेल्या या समाजात लिहिणारे आणि वाचणारे कमीच आहेत. त्यांचे प्रमाण वाढावे, हाच संदेश या संमेलनातून देण्यात आला. या दोन दिवसांत एसएमसी महाविद्यालयात हरी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. १६ वर्षांची या व्याख्यानमालेला परंपरा आहे. यावर्षी ६ फेब्रुवारी रोजी शेतकरी साहित्यावर लिखाण करणारे बारोमासकार प्रा. सदानंद देशमुख यांचे व्याख्यान पार पडले. शेती व शेतकर्‍यांच्या आर्थिक परिस्थितीचे वास्तव त्यांनी मांडले. साहित्यिकांना लिहिण्याची ऊर्जा कशी मिळते, आपल्या आजूबाजूच्या वातावरणातून साहित्य कसे पाझरते, हे त्यांनी आपल्या अनुभवातून मांडले. तसेच ग्रामीण साहित्यिक प्रा. प्रतिमा इंगोले यांच्या व्याख्यानानेही वाशिमकरांच्या माहितीत भर घातली. यानंतर लगेच शासनाच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने ग्रंथोत्सवाचे तीन दिवस आयोजन करण्यात आले होते. या तीनही दिवसांत दिवसभर भाषणे, कविसंमेलने, चर्चासत्र, परिसंवाद पार पडले. ग्रंथोत्सवात वारकर्‍यांचा सहभाग हा महत्त्वाचा ठरला. प्रतिमा इंगोले यांनी उद्घाटन कार्यक्रमात वाशिमची ऐतिहासिक प्रतिभा किती प्रगल्भ आहे, हे दाखविले. संपूर्ण जिल्ह्यातील ग्रंथपालांची या ठिकाणी उपस्थिती होती.