शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

वंचितांच्या आवाजाला साहित्याचे कोंदण!

By admin | Updated: February 20, 2016 02:19 IST

साहित्य संमेलनांमधून मिळाला ‘लिहिते व्हा!’चा संदेश!

वाशिम : आकाराने छोटा व विकासाच्या दृष्टीने अविकसित असलेला वाशिम जिल्हा, साहित्य चळवळीसाठी मात्र विदर्भात उजवा ठरतो. फेब्रुवारी महिन्यात पार पडलेल्या साहित्य संमेलने व व्याख्यानमालेने या सत्यावर मोहोर लावली आहे. गोर बंजारा समाजाचे अखिल भारतीय साहित्य संमेलन, अस्मितादर्श साहित्य संमेलन, शासनाच्या वतीने आयोजित ग्रंथोत्सव, सोळा वर्षांची परंपरा असलेली हरी व्याख्यानमाला तसेच शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांनी जिल्ह्यातील सर्वच स्तरातील साहित्य क्षेत्रात रंगत भरली. ६ व ७ फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संमेलन पार पडले. गोर बंजारा समाजाचे हे पहिले अखिल भारतीय साहित्य संमेलन असून, या संमेलनाने या चळवळीचा पाया वाशिममध्ये रोवल्या गेला आहे. या संमेलनात हजारोंच्या संख्येने बंजारा समाजातील साहित्यिक, कवी, प्राध्यापकांसह तांड्यातील नागरिकही सहभागी झाले होते. ह्यलिहिते व्हा!ह्ण, हा संदेश या संमेलनातून देण्यात आला. तसेच बंजारा भाषेचे संवर्धन हा मुख्य उद्देश समोर ठेवून पुढील दिशा ठरविण्यात आली. आजपर्यंत शिक्षणापासून दूर राहलेल्या या समाजात लिहिणारे आणि वाचणारे कमीच आहेत. त्यांचे प्रमाण वाढावे, हाच संदेश या संमेलनातून देण्यात आला. या दोन दिवसांत एसएमसी महाविद्यालयात हरी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. १६ वर्षांची या व्याख्यानमालेला परंपरा आहे. यावर्षी ६ फेब्रुवारी रोजी शेतकरी साहित्यावर लिखाण करणारे बारोमासकार प्रा. सदानंद देशमुख यांचे व्याख्यान पार पडले. शेती व शेतकर्‍यांच्या आर्थिक परिस्थितीचे वास्तव त्यांनी मांडले. साहित्यिकांना लिहिण्याची ऊर्जा कशी मिळते, आपल्या आजूबाजूच्या वातावरणातून साहित्य कसे पाझरते, हे त्यांनी आपल्या अनुभवातून मांडले. तसेच ग्रामीण साहित्यिक प्रा. प्रतिमा इंगोले यांच्या व्याख्यानानेही वाशिमकरांच्या माहितीत भर घातली. यानंतर लगेच शासनाच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने ग्रंथोत्सवाचे तीन दिवस आयोजन करण्यात आले होते. या तीनही दिवसांत दिवसभर भाषणे, कविसंमेलने, चर्चासत्र, परिसंवाद पार पडले. ग्रंथोत्सवात वारकर्‍यांचा सहभाग हा महत्त्वाचा ठरला. प्रतिमा इंगोले यांनी उद्घाटन कार्यक्रमात वाशिमची ऐतिहासिक प्रतिभा किती प्रगल्भ आहे, हे दाखविले. संपूर्ण जिल्ह्यातील ग्रंथपालांची या ठिकाणी उपस्थिती होती.