शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वंचितांच्या आवाजाला साहित्याचे कोंदण!

By admin | Updated: February 20, 2016 02:19 IST

साहित्य संमेलनांमधून मिळाला ‘लिहिते व्हा!’चा संदेश!

वाशिम : आकाराने छोटा व विकासाच्या दृष्टीने अविकसित असलेला वाशिम जिल्हा, साहित्य चळवळीसाठी मात्र विदर्भात उजवा ठरतो. फेब्रुवारी महिन्यात पार पडलेल्या साहित्य संमेलने व व्याख्यानमालेने या सत्यावर मोहोर लावली आहे. गोर बंजारा समाजाचे अखिल भारतीय साहित्य संमेलन, अस्मितादर्श साहित्य संमेलन, शासनाच्या वतीने आयोजित ग्रंथोत्सव, सोळा वर्षांची परंपरा असलेली हरी व्याख्यानमाला तसेच शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांनी जिल्ह्यातील सर्वच स्तरातील साहित्य क्षेत्रात रंगत भरली. ६ व ७ फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संमेलन पार पडले. गोर बंजारा समाजाचे हे पहिले अखिल भारतीय साहित्य संमेलन असून, या संमेलनाने या चळवळीचा पाया वाशिममध्ये रोवल्या गेला आहे. या संमेलनात हजारोंच्या संख्येने बंजारा समाजातील साहित्यिक, कवी, प्राध्यापकांसह तांड्यातील नागरिकही सहभागी झाले होते. ह्यलिहिते व्हा!ह्ण, हा संदेश या संमेलनातून देण्यात आला. तसेच बंजारा भाषेचे संवर्धन हा मुख्य उद्देश समोर ठेवून पुढील दिशा ठरविण्यात आली. आजपर्यंत शिक्षणापासून दूर राहलेल्या या समाजात लिहिणारे आणि वाचणारे कमीच आहेत. त्यांचे प्रमाण वाढावे, हाच संदेश या संमेलनातून देण्यात आला. या दोन दिवसांत एसएमसी महाविद्यालयात हरी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. १६ वर्षांची या व्याख्यानमालेला परंपरा आहे. यावर्षी ६ फेब्रुवारी रोजी शेतकरी साहित्यावर लिखाण करणारे बारोमासकार प्रा. सदानंद देशमुख यांचे व्याख्यान पार पडले. शेती व शेतकर्‍यांच्या आर्थिक परिस्थितीचे वास्तव त्यांनी मांडले. साहित्यिकांना लिहिण्याची ऊर्जा कशी मिळते, आपल्या आजूबाजूच्या वातावरणातून साहित्य कसे पाझरते, हे त्यांनी आपल्या अनुभवातून मांडले. तसेच ग्रामीण साहित्यिक प्रा. प्रतिमा इंगोले यांच्या व्याख्यानानेही वाशिमकरांच्या माहितीत भर घातली. यानंतर लगेच शासनाच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने ग्रंथोत्सवाचे तीन दिवस आयोजन करण्यात आले होते. या तीनही दिवसांत दिवसभर भाषणे, कविसंमेलने, चर्चासत्र, परिसंवाद पार पडले. ग्रंथोत्सवात वारकर्‍यांचा सहभाग हा महत्त्वाचा ठरला. प्रतिमा इंगोले यांनी उद्घाटन कार्यक्रमात वाशिमची ऐतिहासिक प्रतिभा किती प्रगल्भ आहे, हे दाखविले. संपूर्ण जिल्ह्यातील ग्रंथपालांची या ठिकाणी उपस्थिती होती.