शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

खंडित पाणीपुरवठा योजनांना सौर पंपाची ‘ऊर्जा’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 01:17 IST

वाशिम : ग्रामीण व दुर्गम भागात जेथे सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेसाठी वीज पुरवठा करणे शक्य नाही तसेच खंडित पाणीपुरवठा योजनांसाठी सौर ऊर्जा पंपाचा वापर करण्याची योजना ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने अमलात आणली आहे. या योजनेंतर्गंत जिल्ह्यातील  १00 खंडित पाणीपुरवठा योजनांना सौर ऊर्जा पंपाचा आधार मिळणार असून, आतापर्यंंत ९३ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. अजून २00 ग्रामपंचायतींच्या प्रस्तावांची प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्देसौर पंप जोडणीसाठी ९३ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव प्राप्त १00 ग्रामपंचायतींचा वीज पुरवठा खंडित 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ग्रामीण व दुर्गम भागात जेथे सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेसाठी वीज पुरवठा करणे शक्य नाही तसेच खंडित पाणीपुरवठा योजनांसाठी सौर ऊर्जा पंपाचा वापर करण्याची योजना ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने अमलात आणली आहे. या योजनेंतर्गंत जिल्ह्यातील  १00 खंडित पाणीपुरवठा योजनांना सौर ऊर्जा पंपाचा आधार मिळणार असून, आतापर्यंंत ९३ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. अजून २00 ग्रामपंचायतींच्या प्रस्तावांची प्रतीक्षा आहे.ग्रामीण व दुर्गम भागात जेथे सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेसाठी वीज पुरवठा करणे शक्य नाही किंवा ज्या ग्रामपंचायती सार्वजनिक लघुजल व नळ पाणीपुरवठा योजनेचे वीज देयके अदा करू शकत नाहीत किंवा वीज देयक न भरल्यामुळे ज्या पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे, अशा सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांकरिता सौर ऊर्जा पंपाचा वापर केल्यास सदर योजना बंद पडणार नाहीत व ग्रामपंचायतींचा वीज देयकांचा भार कमी होईल, या उद्देशाने सौर ऊर्जा पंप योजना अमलात आणली आहे. वीज देयकाचा भरणा न केल्यामुळे जवळपास १00 ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. अशा पाणीपुरवठा योजनांना आता सौर ऊर्जा पंपाचा आधार मिळणार आहे. यासाठी या ग्रामपंचायतींनी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.वीज पुरवठा होऊ न शकणार्‍या वस्त्या, वाड्या, गावे, ग्रामपंचायती या ठिकाणी पाण्याचा उपसा व पुरवठा करण्यासाठी सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांकरिता सौर पंपाचा वापर व्हावा, यासाठी जिल्हा परिषदेतर्फे ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. या योजनेंतर्गत वस्त्या, वाड्या, गावे व ग्रामपंचायतीच्या ठिकाणी आवश्यकतेनुसार सौर ऊर्जेवर आधारित ३, ५, ७.५ व १00 अश्‍वशक्ती क्षमतेचे प्रतिविभाग १00 नग पारेषण विरहित सौर पंप आस्थापित करण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. आतापर्यंंत ९३  ग्रामपंचायतींचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. अजून २00 च्या आसपास प्रस्ताव प्राप्त होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, ज्या गावांचे किंवा ठिकाणाचे पाणी प्रदूषित आहे, येथे योजनेसोबत आवश्यकतेनुसार जलशुद्धीकरण संयंत्रासाठी आवश्यक असणार्‍या विजेचा पुरवठा व्हावा, यासाठी स्वतंत्रपणे ‘सोलर मोड्युल’ आस्थापित करण्यात येणार आहेत. यासाठीच्या निधीची तरतूद ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषदेला स्वतंत्रपणे करावी लागणार आहे. 

या ग्रामपंचायतींनी सादर केले प्रस्तावमहाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग वाशिम अंतर्गत नऊ प्रादेशिक पाणीपुरवठय़ांसाठी सौर ऊर्जा पंपाकरिता प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. याशिवाय कारंजा तालुक्यातील वडगाव इजारा, उंबर्डाबाजार, सुकळी, कामठवाडा, कार्ली, लोहगाव, काजळेश्‍वर, धोत्रा जहागीर, डोंगरगाव, गायवळ, धानोरा ताथोड, आखतवाडा, शिवण बु., पारवा, पिंप्री मोडक, राहाटी, माळेगाव, पिंप्री वरघट, मोरगव्हाण, झोडगा, सोहळ, जांब, हिंगणवाडी, लाडेगाव, रामनगर अशा २६ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. मंगरूळपीर तालुक्यातील पारवा, आसेगाव, पोटी या तीन ग्रामपंचायतींचे प्रस्ताव प्राप्त झाले. मालेगाव तालुक्यातील कवरदरी, चिवरा, वसारी, वरदरी बु., मारसूळ, झोडगा बु., कोळगाव बु., भोरद, काळाकामठा, किन्ही घोडमोड, हनवतेखडा, वारंगी, सिरसाळा, गिव्हा कुटे, इराळा या १५ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. रिसोड तालुक्यातील वडजी, केशवनगर, दापुरी बु. या तीन ग्रामपंचायतींचे तर मानोरा तालुक्यातील चौसाळा, मोहगव्हाण, चोंढी, कोलार, जनुना खु., जामदरा घोटी, म्हसणी, बोरव्हा, उमरी बु., सोमनाथनगर, गव्हा, अजनी, विळेगाव, खांबाळा, भिलडोंगर, सोमठाणा, कुपटा या १७ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव प्राप्त झाले. बुधवार, १६ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील आणखी २0 ग्रामपंचायतींचे प्रस्ताव प्राप्त झाल्याने हा आकडा ९३ वर पोहोचला आहे.

पाणीपुरवठा योजनांसाठी सौर पंपाचा वापर सुलभरीत्या व्हावा, यासाठी ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव मागविण्यात आलेले आहेत. ग्रामपंचायतींनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.- गणेश पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम.