शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

वजन मापात पाप; शेतकऱ्यांना ताप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:46 IST

शीतल धांडे रिसोड : वजन मापात घोळ करून शेतकऱ्यांची लुबाडणूक केली जात असल्याचा प्रकार एका शेतकऱ्याच्या तक्रारीने २० सप्टेंबर ...

शीतल धांडे

रिसोड : वजन मापात घोळ करून शेतकऱ्यांची लुबाडणूक केली जात असल्याचा प्रकार एका शेतकऱ्याच्या तक्रारीने २० सप्टेंबर रोजी समोर आणला आहे. घरून मोजून आणलेले सोयाबीन बाजार समितीच्या अडतमध्ये १३ किलो कमी भरल्याने वजन मापात घोळ तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. चिखली येथील रमेश अंभोरे नामक शेतकऱ्याने यासंदर्भात तक्रार केल्यानंतर त्यांना १३ किलो सोयाबीनचे पैसे देण्यात आले.

रिसोड बाजार समिती नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असते. आता सोयाबीनचा हंगाम असून, मोठ्या प्रमाणात बाजार समितीत आवक येत आहे. त्यामुळे वजनकाटे अधिकृत व व्यवस्थित असणे आवश्यक आहे. सर्वच अडतमधील वजनकाटे व्यवस्थित आहेत किंवा नाही, याची वारंवार पडताळणी बाजार समिती प्रशासनाने करणे शेतकऱ्यांना अपेक्षित आहे; मात्र अशी पडताळणी नियमित होत नसल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. सोमवार, २० सप्टेंबर रोजी चिखली येथील शेतकरी रमेश अंभोरे यांनी १९ क्विंटल ९३ किलो सोयाबीन घरून मोजून आणले. एका अडतमध्ये विक्रीसाठी सोयाबीन ठेवले असता, वजनकाटा करताना १९ क्विंटल ८० किलो वजन भरले. १३ किलो वजन कमी भरल्याने अंभोरे यांनी यासंदर्भात संबंधित अडत्या आणि बाजार समिती सचिवाकडे दाद मागितली. यावेळी मध्यस्थी करीत अंभोरे यांना १३ किलो सोयाबीनचे पैसे देऊन या वादावर पडदा टाकण्यात आला; मात्र या निमित्ताने वजनकाट्यात घोळ होत असल्याचा गंभीर प्रकार समोर येत असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती.

०००००

कोट

सोमवारी रिसोड बाजार समितीत सोयाबीन विक्रीसाठी आणले होते. घरी वजनकाटा केला असता १९ क्विंटल ९३ किलो होते. बाजार समितीत १९ क्विंटल ८० किलो वजन भरले. याबाबत बाजार समितीकडे तक्रार केल्यानंतर १३ किलो सोयाबीनचे पैसे देण्यात आले. हा प्रकार अन्य शेतकऱ्यांसोबत होऊ नये, अशी आपली मागणी आहे.

- रमेश अंभोरे, शेतकरी

.......

कोट

मॉईश्चरमुळे थोड्या फार प्रमाणात मालाच्या वजनात घट होऊ शकते. शेतकऱ्यांची तक्रार गांभीर्यपूर्वक घेऊन समन्वयातून १३ किलो धान्याचे पैसे संबंधित अडत्यास शेतकऱ्याला देण्यास सांगितले. बाजार समितीच्या ओट्यावर शेतकऱ्यांच्या शेतमालाचे अचूक मोजमाप व रास्त भाव देण्यासाठी बाजार समिती प्रयत्नशील आहे.

विजय देशमुख

सचिव, कृउबास रिसोड.

...

कोट

आमच्या अडतमध्ये शेतमालाचे अचूक मोजमाप केले जाते. आजपर्यंत एकाही शेतकऱ्याची वजनासंदर्भात एकही तक्रार नाही. संबंधित शेतकऱ्याचा गैरसमज झाला आहे. केवळ वाद, तंटा होऊ नये या उद्देशाने सचिवांच्या सूचनेनुसार १३ किलो धान्याचे अतिरिक्त पैसे दिले आहेत.

गोलू अग्रवाल

अडते

210921\img_20210921_160948.jpg

विजय देशमुख सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोड