शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

झुडपे, गाळ-कचऱ्याने बुजले कापसी नदीचे पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:16 IST

कामरगाव परिसरातून जवळपास ८ किलोमीटर अंतरात कापसी नदी वाहते. कधीकाळी या नदीमुळे परिसरातील भूजल पातळीला मोठा आधार होत असे, ...

कामरगाव परिसरातून जवळपास ८ किलोमीटर अंतरात कापसी नदी वाहते. कधीकाळी या नदीमुळे परिसरातील भूजल पातळीला मोठा आधार होत असे, तसेच शेतक-यांना सिंचनासाठीही पाणी मिळत होते. कालांतराने या नदीचे पात्र रोडावत गेले. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह कमी होऊन नदी कोरडी पडू लागली. प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर चार वर्षांपूर्वी या नदीचे खोलीकरण करण्यात आले. त्यासाठी मुख्यमंत्री निधीतून १ कोटी रुपये खर्च करण्यासह भारतीय जैन संघटनेकडून जेसीबी आणि पोकलेन मशीनही पुरविण्यात आल्या. खोलीकरणानंतर पुढील वर्षांत या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले. परिणामी भूजल पातळीला आधार झाला आणि शेतक-यांनाही सिंचनासाठी पाणी मिळू लागले; परंतु त्यानंतर या नदीच्या पात्राची आवश्यक देखभालच करण्यात आली नाही. त्यातच नदीचे खोलीकरण केल्यानंतर निघालेली माती आणि मुरुमाचे ढिगारे काठावरच सोडण्यात आले. पावसाळ्याच्या दिवसांत ही माती, मुरूम पाण्यामुळे वाहून पुन्हा नदीपात्रात आल्याने पात्र बुजत गेले, तर झुडपेही वाढली. त्यामुळे आता नदीपात्रात पाणीच थांबेनासे झाल्याने शेतक-यांना याचा कोणताही फायदा होताना दिसत नाही.

-------------

बंधारे झाले जमीनदोस्त

चार वर्षांपूर्वी भारतीय जैन संघटनेच्या सहकार्यातून आणि मुख्यमंत्री निधीतील १ कोटी रुपयांच्या खर्चातून कापसी नदीचे खोलीकरण करतानाच पात्रात पाणी अडविण्यासाठी बंधारेही बांधण्यात आले होते. त्यामुळे शेतक-यांना सिंचनासाठी आधार झालाच शिवाय भूजल पातळी टिकून राहण्यासही मोठी मदत झाली होती; परंतु वर्ष दीड वर्षातच या नदीमधील बंधारे जमीनदोस्त झाले. त्यामुळे नदीपात्रातील पाणी न थांबता वाहून जात आहे.