शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

उन्हाळ्याच्या नियोजनासाठी बसगाड्यांची कमतरता!

By admin | Updated: April 14, 2017 01:20 IST

शैक्षणिक सत्र संपण्याची प्रतीक्षा: २० एप्रिलपासून अतिरिक्त बसफेऱ्यांना सुरुवात

वाशिम: उन्हाळ्यात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन बसफेऱ्या वाढविण्याचे राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) नियोजन असले तरी, प्रत्यक्षात पुरेशा बसगाड्या उपलब्ध नसल्यामुळे बसफेऱ्या वाढविणे अशक्य झाले आहे. आता शाळा बंद झाल्यानंतर मानव विकास मिशनच्या खाली राहणाऱ्या बसगाड्यांचा वापर करून इतर बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात येणार असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांकडून कळले.उन्हाळ्याच्या सुट्यांत प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. लग्नसराई, सोयरिकसंबंध, सहलीचे नियोजन अनेकांकडून उन्हाळ्यात केले जाते. प्रवाशांची संख्या वाढत असल्याने महामंडळाला त्याचा फायदा व्हावा आणि प्रवाशांचीही सोय व्हावी, यासाठी एसटी अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन करते; परंतु या नियोजनासाठी नव्या बसगाड्या मिळणे शक्य नसते किंवा आगारांकडे शिल्लक बसगाड्याही नसतात. त्यामुळे या नियोजनासाठी मोठी कसरत करावी लागते. मानव विकास मिशनसाठी वापरण्यात येणाऱ्या एसटीच्या बसगाड्या उन्हाळ्याच्या दिवसांत खाली होतात; परंतु त्यासाठी शाळांचे सत्र पूर्ण होण्याची प्रतीक्षा करावी लागते. यंदा २० एप्रिल रोजी शैक्षणिक सत्र संपणार असल्याने त्यानंतरच उन्हाळ्याच्या अतिरिक्त बसफेऱ्यांचे नियोजन करता येणार असल्याने अद्याप कोणत्याही आगाराला अतिरक्त बसफेरी सुरू करण्याची परवानगीच मिळू शकली नाही. येत्या २० एप्रिलनंतर वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर आगाराकडून सकाळी ७.३० वाजताची मंगरुळपीर जालना, ८.४५ वाजताची मंगरुळपीर औरंगाबाद, ११.०० वाजताची मंगरुळपीर-दिग्रस, तसेच दुपारी २.३० वाजताची मंगरुळपीर आगाराची अकोला-पुसद या चार अतिरिक्त बसफेऱ्या सुरू होणार असल्याची माहिती मंगरुळपीरचे आगार व्यवस्थापक युुधीष्टीर रामचवरे यांनी सोमवारी दिली. त्यामुळे २० एप्रिलपर्यंत एसटीच्या प्रवाशांची वाताहत होण्याची शक्यता आहे. मानव मिशनच्या बस वापरणार!शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी मानव मिशनच्यावतीने एसटीमार्फत मोफत प्रवासाची सोय केली आहे. यासाठी वापरण्यात येत असलेल्या एसटी बस शैक्षणिक सत्रानंतर उन्हाळ्याच्या नियोजनात वापरण्यात येणार आहेत. उन्हाळ्याच्या सुट्यात प्रवाशांची संख्या वाढते. एसटी महामंडळाच्यावतीने त्यासाठी नियोजनही करण्यात येत असते; परंतु उपलब्ध असलेल्या बसगाड्या लक्षात घेऊनच नियोजन करावे लागते. आमच्याकडे बसगाड्या शिल्लक नाहीत. येत्या १० एप्रिल रोजी शैक्षणिक सत्र संपल्यानंतर मानव मिशनच्या सहा गाड्या आमच्याकडे उपलब्ध असतील. या गाड्या उन्हाळ्याच्या दिवसांत अतिरिक्त फेऱ्यांसाठी वापरण्यात येतील. तशाच सूचना वरिष्ठांकडून आलेल्या आहेत. २० एप्रिलपासूनच उन्हाळ्याच्या सुट्यांचे नियोजन करण्याचे आदेश त्यांच्याकडून आलेले आहेत. - युधिष्टीर रामचवरे, आगार व्यवस्थापक मंगरुळपीर