शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्याच्या नियोजनासाठी बसगाड्यांची कमतरता!

By admin | Updated: April 14, 2017 01:20 IST

शैक्षणिक सत्र संपण्याची प्रतीक्षा: २० एप्रिलपासून अतिरिक्त बसफेऱ्यांना सुरुवात

वाशिम: उन्हाळ्यात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन बसफेऱ्या वाढविण्याचे राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) नियोजन असले तरी, प्रत्यक्षात पुरेशा बसगाड्या उपलब्ध नसल्यामुळे बसफेऱ्या वाढविणे अशक्य झाले आहे. आता शाळा बंद झाल्यानंतर मानव विकास मिशनच्या खाली राहणाऱ्या बसगाड्यांचा वापर करून इतर बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात येणार असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांकडून कळले.उन्हाळ्याच्या सुट्यांत प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. लग्नसराई, सोयरिकसंबंध, सहलीचे नियोजन अनेकांकडून उन्हाळ्यात केले जाते. प्रवाशांची संख्या वाढत असल्याने महामंडळाला त्याचा फायदा व्हावा आणि प्रवाशांचीही सोय व्हावी, यासाठी एसटी अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन करते; परंतु या नियोजनासाठी नव्या बसगाड्या मिळणे शक्य नसते किंवा आगारांकडे शिल्लक बसगाड्याही नसतात. त्यामुळे या नियोजनासाठी मोठी कसरत करावी लागते. मानव विकास मिशनसाठी वापरण्यात येणाऱ्या एसटीच्या बसगाड्या उन्हाळ्याच्या दिवसांत खाली होतात; परंतु त्यासाठी शाळांचे सत्र पूर्ण होण्याची प्रतीक्षा करावी लागते. यंदा २० एप्रिल रोजी शैक्षणिक सत्र संपणार असल्याने त्यानंतरच उन्हाळ्याच्या अतिरिक्त बसफेऱ्यांचे नियोजन करता येणार असल्याने अद्याप कोणत्याही आगाराला अतिरक्त बसफेरी सुरू करण्याची परवानगीच मिळू शकली नाही. येत्या २० एप्रिलनंतर वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर आगाराकडून सकाळी ७.३० वाजताची मंगरुळपीर जालना, ८.४५ वाजताची मंगरुळपीर औरंगाबाद, ११.०० वाजताची मंगरुळपीर-दिग्रस, तसेच दुपारी २.३० वाजताची मंगरुळपीर आगाराची अकोला-पुसद या चार अतिरिक्त बसफेऱ्या सुरू होणार असल्याची माहिती मंगरुळपीरचे आगार व्यवस्थापक युुधीष्टीर रामचवरे यांनी सोमवारी दिली. त्यामुळे २० एप्रिलपर्यंत एसटीच्या प्रवाशांची वाताहत होण्याची शक्यता आहे. मानव मिशनच्या बस वापरणार!शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी मानव मिशनच्यावतीने एसटीमार्फत मोफत प्रवासाची सोय केली आहे. यासाठी वापरण्यात येत असलेल्या एसटी बस शैक्षणिक सत्रानंतर उन्हाळ्याच्या नियोजनात वापरण्यात येणार आहेत. उन्हाळ्याच्या सुट्यात प्रवाशांची संख्या वाढते. एसटी महामंडळाच्यावतीने त्यासाठी नियोजनही करण्यात येत असते; परंतु उपलब्ध असलेल्या बसगाड्या लक्षात घेऊनच नियोजन करावे लागते. आमच्याकडे बसगाड्या शिल्लक नाहीत. येत्या १० एप्रिल रोजी शैक्षणिक सत्र संपल्यानंतर मानव मिशनच्या सहा गाड्या आमच्याकडे उपलब्ध असतील. या गाड्या उन्हाळ्याच्या दिवसांत अतिरिक्त फेऱ्यांसाठी वापरण्यात येतील. तशाच सूचना वरिष्ठांकडून आलेल्या आहेत. २० एप्रिलपासूनच उन्हाळ्याच्या सुट्यांचे नियोजन करण्याचे आदेश त्यांच्याकडून आलेले आहेत. - युधिष्टीर रामचवरे, आगार व्यवस्थापक मंगरुळपीर