शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

शेतक-यांकडून कपाशीची अल्पदरात विक्री

By admin | Updated: November 11, 2015 01:47 IST

मानो-यातील कापूस खरेदी सुरू करण्याची मागणी.

मानोरा (जि. वाशिम): नापिकी आणि दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांवर दिवाळी सण साजरा करण्यासाठी व्यापार्‍यांना कवडीमोल भावाने कापूस विकण्याची वेळ आली आहे. ही बाब लक्षात घेत संबंधित अधिकार्‍यांनी मानोरा येथे सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचे प्रयत्न करावेत, अशी मागणी शेतकर्‍यांकडून सोमवारी करण्यात आली. यंदा अल्प पावसामुळे खरिपातील उत्पादनात प्रचंड घट आली. त्यामुळे शेतकरी मोठय़ा आर्थिक संकटात सापडला आहे. आता दीपावलीचा सण तोंडावर आल्याने घरात आलेल्या कपाशीतून थोड्या कपाशीची विक्री करून सण साजरा करण्याच्या मन:स्थितीत शेतकरी असताना, व्यापारी अतिशय कमी भावाने त्यांच्याकडून कपाशी खरेदी करीत आहेत. सद्यस्थितीत मानोर्‍यात कपाशीला केवळ ३८00 ते ४000 रुपये प्रतिक्विंटलचा भाव व्यापार्‍यांकडून दिला जात आहे. प्रत्यक्षात शेतकर्‍यांकडे जे पीक उत्पादन आता उरले नाही, त्या जवळपास सर्वच शेतमालाचे भाव गगनाला भिडले आहेत. दुसरीकडे आता शेतकर्‍यांकडे जो शेतमाल मोठय़ा प्रमाणात आहे, त्यापैकी कपाशीला मात्र अत्यंत कमी भाव मिळत आहेत. त्यामुळे या ठिकाणी सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र तातडीने सुरू करावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.