शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

दुकाने बाहेरून बंद, आतून सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:29 IST

जिल्ह्यात गेल्या १३ महिन्यांपेक्षा अधिक काळापासून कोरोना विषाणू संसर्गाचे संकट बस्तान मांडून आहे. फेब्रुवारी २०२१नंतर आलेल्या संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत ...

जिल्ह्यात गेल्या १३ महिन्यांपेक्षा अधिक काळापासून कोरोना विषाणू संसर्गाचे संकट बस्तान मांडून आहे. फेब्रुवारी २०२१नंतर आलेल्या संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली. यासह कोरोनाचा मृत्युदरही कमालीचा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर संसर्गाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने ९ मेपासून संपूर्ण जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केले. याअंतर्गत २० मेपर्यंत केवळ दवाखाने व मेडिकल्स सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली होती. त्यात अंशत: बदल करून २० मेनंतर फळे, भाजीपाला, दूध, दुग्धजन्य पदार्थ यासह इतर अत्यावश्यक सेवा दररोज सकाळी ७ ते ११ या चार तासांच्या अवधीत पुरविण्यास परवानगी देण्यात आली; मात्र कपड्यांची दुकाने, मोबाइल विक्री व दुरुस्तीची दुकाने, हार्डवेअर यासह इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे प्रशासनाचे स्पष्ट निर्देश आहेत.

या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाईसह वेळप्रसंगी गुन्हे दाखल करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत; मात्र त्याचे वाशिमच्या बाजारपेठेत सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे.

...................

बाॅक्स :

सततची टाळेबंदी; व्यापारी तरी काय करणार?

कोरोना विषाणू संसर्गाला रोखण्यासाठी शासन, प्रशासनाकडून गेल्या वर्षभरात अनेकवेळा लाॅकडाऊन, संचारबंदी, कडक निर्बंध आदींच्या नावाखाली सततची टाळेबंदी अवलंबिण्यात येत आहे. यामुळे मात्र व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होण्यासह दुकानांमध्ये ठेवलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार देणेही त्यांना अशक्य होत असल्याचे बोलले जात आहे. त्यावर तोडगा म्हणून बाजारपेठेतील सर्वच व्यापाऱ्यांनी अघोषित एकी करून सकाळच्या सुमारास शटर बंद-चालू करत व्यवसाय सुरू ठेवण्याचा प्रकार अवलंबिल्याचे दिसत आहे.

...

बाॅक्स :

पोलिसांच्या वाहनाचे सायरन वाजताच ‘खबरदार’

वाशिमच्या मुख्य बाजारपेठेतील दुकाने नावालाच बंद राहत असून, व्यवसाय बऱ्यापैकी सुरूच आहे. शटर बंद-चालू करण्यासाठी दुकानांबाहेर नोकराची नेमणूक केलेली असते. यादरम्यान पोलिसांच्या वाहनाचे सायरन वाजताच सर्वजण ‘खबरदार’ होतात. वाहन पुढे जाताच पूर्वीप्रमाणे ग्राहक आत-बाहेर काढण्याचा कार्यक्रम सुरू होत असल्याचे पहावयास मिळत आहे.

................

कोट :

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा जिवाचे रान करीत आहे. या संकटावर मात करण्यासाठी लादण्यात आलेल्या निर्बंधाचे प्रत्येकालाच किमान काही दिवस तरी पालन करावेच लागेल. जी दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश आहेत, ती दुकाने सुरू राहत असतील तर प्रशासनालाही नाइलाजास्तव धडक कारवाईची मोहीम हाती घ्यावी लागेल. व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा आहे.

- शैलेश हिंगे

निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम