शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : हवामान विभागाने दिली खुशखबर! मान्सून या दिवशी केरळात दाखल होणार; महाराष्ट्रात कधी?
2
मंत्रिमंडळाचे जिल्हा असंतुलन; ५७ टक्के मंत्री ७ जिल्ह्यांतून, १५ जिल्हे मात्र मंत्र्यांविना वंचित
3
पत्नी आजारी होती, बदली केली नाही; माजी सरन्यायाधीशांचे नाव न घेता न्यायमूर्तींची निरोप समारंभात नाराजी
4
दहशतवादी हल्ल्याचा कट अन् प्रशिक्षणासाठी तरुणांना पाकमध्ये पाठवले; शहजादचे धक्कादायक खुलासे
5
इस्रायल इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले करण्याच्या तयारीत; अमेरिकन गुप्तचरांच्या दाव्याने खळबळ
6
लग्नाच्या ३४ वर्षांनंतर पतीसोबत घटस्फोट घेणार अर्चना पूरण सिंग? अभिनेत्री म्हणाल्या- "आम्ही भांडतो, पण..."
7
जान्हवी कपूरचा कान्सच्या रेड कार्पेटवर जलवा, अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकवरुन नजरच हटेना
8
मोठा खुलासा! हेर तारिफने दिलेल्या माहितीवरूनच पाकिस्तानने सिरसावर डागले होते क्षेपणास्त्र
9
१२वी नापास सायबर गुन्हेगार, 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान करत होता देशविरोधी काम! एटीएसकडून अटक
10
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
11
Operation Sindoor : सुवर्ण मंदिरात एअर डिफेन्स गन तैनात केली होती? भारतीय सैन्याने दिली माहिती
12
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
13
सरन्यायाधीश आले तर... न्या. गवई यांच्या जाहीर नाराजीनंतर सरकारने काढले आदेश
14
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
15
मुसळधारेने दाणादाण,  राज्यात वीज पडून ४ ठार; मान्सूनपूर्व वादळी पावसाने राज्याला झोडपले
16
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
17
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
18
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
19
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस

वीज प्रश्नावर शिवसैनिक आक्रमक!

By admin | Updated: November 1, 2016 00:00 IST

नादुरूस्त रोहित्रामुळे शेतकरी त्रस्त असून, त्यांनी महावितरणकडे उपकेंद्रांची कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली.

रिसोड, दि. ३१- वीज प्रश्न तातडीने निकाली काढा; अन्यथा शिवसैनिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत, असा आक्रमक पवित्रा पदाधिकार्‍यांनी सोमवारी घेतला. खासदार भावना गवळी यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालय परिसरात महावितरणच्या अधिकार्‍यांनी शिवसैनिक व शेतकर्‍यांशी संवाद साधला.शेतकर्‍यांचा रब्बी हंगाम लक्षात घेता वीजपुरवठय़ाच्या मागण्या तातडीने निकाली काढण्याच्या मागणीसाठी शिवसैनिकांनी आक्रमक होत महावितरणच्या अधिकार्‍यांना यावेळी धारेवर धरले. जळालेले विद्युत रोहित्र तातडीने बदलून द्यावे, कोटेशन भरलेल्या शेतकर्‍यांना विनाविलंब वीजजोडणी द्यावी, मंजूर झालेल्या नवीन रोहित्राचे काम तातडीने पूर्ण करावे, लोडशेडींगच्या नावाखाली वीजपुरवठा खंडित करू नये, कृषीपंपांना लागणारा विजेचा दाब कमी-जास्त प्रमाणात ठेवू नये आदी मागण्या शिवसेनेच्यावतीने यापूर्वीच महावितरणच्या अधिकार्‍यांकडे केल्या होत्या. या मागणीची दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा तालुकाप्रमुख महादेवराव ठाकरे यांनी दिला होता. याची दखल घेत महावितरणच्या अधिकार्‍यांनी सोमवारी शिवसैनिक व शेतकर्‍यांशी चर्चा केली.महावितरणचे कार्यकारी अभियंता मेश्राम यांनी चर्चा करताना उपरोक्त मागण्या निकाली काढण्याच्या दृष्टिने प्रयत्न सुरू आहेत, अशी ग्वाही यावेळी दिली. मेश्राम यांच्या लेखी आश्‍वासनामुळे १ नोव्हेंबरचे आंदोलन तुर्तास स्थगित करण्याचे आल्याचे ठाकरे यांनी सांगितले. दिलेल्या आश्‍वासनानुसार विजेची कामे झाली नाहीत तर शेतकर्‍यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन छेडले जाईल, असा इशारा महादेवराव ठाकरे यांनी दिला. यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्‍वनाथ सानप, उपजिल्हाप्रमुख भागवतराव गवळी, शहर प्रमुख अरूण मगर, अँड. गजानन अवताडे, उपतालुका प्रमुख शिवाजीराव खानझोडे, शिवाजीराव अवताडे, राजेंद्र बोडखे, रंगराव खडसे, मदन ढोले, पंजाबराव शिंदे, जगन्नाथ बिल्लारी, प्रकाश चोपडे, गजानन सानप, सतीश धोटे, मधुकरराव साबळे, बळीराम चोपडे, इढोळे यांच्यासह शेकडो शेतकरी व शिवसैनिकांची उपस्थिती होती. वीजपुरवठय़ाची समस्या कायम राहिली तर आंदोलनाचा इशारा दिला.