शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

वीज प्रश्नावर शिवसैनिक आक्रमक!

By admin | Updated: November 1, 2016 00:00 IST

नादुरूस्त रोहित्रामुळे शेतकरी त्रस्त असून, त्यांनी महावितरणकडे उपकेंद्रांची कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली.

रिसोड, दि. ३१- वीज प्रश्न तातडीने निकाली काढा; अन्यथा शिवसैनिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत, असा आक्रमक पवित्रा पदाधिकार्‍यांनी सोमवारी घेतला. खासदार भावना गवळी यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालय परिसरात महावितरणच्या अधिकार्‍यांनी शिवसैनिक व शेतकर्‍यांशी संवाद साधला.शेतकर्‍यांचा रब्बी हंगाम लक्षात घेता वीजपुरवठय़ाच्या मागण्या तातडीने निकाली काढण्याच्या मागणीसाठी शिवसैनिकांनी आक्रमक होत महावितरणच्या अधिकार्‍यांना यावेळी धारेवर धरले. जळालेले विद्युत रोहित्र तातडीने बदलून द्यावे, कोटेशन भरलेल्या शेतकर्‍यांना विनाविलंब वीजजोडणी द्यावी, मंजूर झालेल्या नवीन रोहित्राचे काम तातडीने पूर्ण करावे, लोडशेडींगच्या नावाखाली वीजपुरवठा खंडित करू नये, कृषीपंपांना लागणारा विजेचा दाब कमी-जास्त प्रमाणात ठेवू नये आदी मागण्या शिवसेनेच्यावतीने यापूर्वीच महावितरणच्या अधिकार्‍यांकडे केल्या होत्या. या मागणीची दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा तालुकाप्रमुख महादेवराव ठाकरे यांनी दिला होता. याची दखल घेत महावितरणच्या अधिकार्‍यांनी सोमवारी शिवसैनिक व शेतकर्‍यांशी चर्चा केली.महावितरणचे कार्यकारी अभियंता मेश्राम यांनी चर्चा करताना उपरोक्त मागण्या निकाली काढण्याच्या दृष्टिने प्रयत्न सुरू आहेत, अशी ग्वाही यावेळी दिली. मेश्राम यांच्या लेखी आश्‍वासनामुळे १ नोव्हेंबरचे आंदोलन तुर्तास स्थगित करण्याचे आल्याचे ठाकरे यांनी सांगितले. दिलेल्या आश्‍वासनानुसार विजेची कामे झाली नाहीत तर शेतकर्‍यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन छेडले जाईल, असा इशारा महादेवराव ठाकरे यांनी दिला. यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्‍वनाथ सानप, उपजिल्हाप्रमुख भागवतराव गवळी, शहर प्रमुख अरूण मगर, अँड. गजानन अवताडे, उपतालुका प्रमुख शिवाजीराव खानझोडे, शिवाजीराव अवताडे, राजेंद्र बोडखे, रंगराव खडसे, मदन ढोले, पंजाबराव शिंदे, जगन्नाथ बिल्लारी, प्रकाश चोपडे, गजानन सानप, सतीश धोटे, मधुकरराव साबळे, बळीराम चोपडे, इढोळे यांच्यासह शेकडो शेतकरी व शिवसैनिकांची उपस्थिती होती. वीजपुरवठय़ाची समस्या कायम राहिली तर आंदोलनाचा इशारा दिला.