शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
2
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
3
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
4
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
5
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
6
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
7
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
8
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
9
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
10
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
11
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
12
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
13
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
14
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
16
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
17
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
18
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
19
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
20
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा

वडजी येथे कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत शिवार फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:51 IST

वाशिम : रिसोड तालुक्यातील मौजे वडजी येथील जवळपास ६५ संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा समूह पद्धतीने इस्त्राईल तंत्रज्ञानाचे जोड देऊन गट ...

वाशिम : रिसोड तालुक्यातील मौजे वडजी येथील जवळपास ६५ संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा समूह पद्धतीने इस्त्राईल तंत्रज्ञानाचे जोड देऊन गट शेतीची मुहूर्तमेढ रोवली आहे. इस्त्राईल तंत्रज्ञान आधारीत संत्रा बागेची शिवार फेरी कार्यक्रम व गट शेतीची सभा दिनांक ५ जुलै रोजी कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने प्रगतशील शेतकरी केशवराव श्रीरंगराव बोरकर यांच्या शेतात संपन्न झाली. कृषी संजीवनी सप्ताहाचा औचित्याने सुद्धा शेतकऱ्यांच्या बांधावर शास्त्रज्ञ या उद्देशाने विशेष महत्व प्राप्त झाले.

गट शेतीच्या पहिल्या सभेला अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्र वाशिमचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डाॅ. आर. एल. काळे यांची उपस्थिती लाभली तर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून निवृती पाटील व एस. के. देशमुख उपस्थित होते. शेतकरी सभेच्या पूर्वी एकत्रितरीत्या शास्त्रज्ञ व शेतकऱ्यांनी १६ संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या बागांना भेटी देऊन तंत्रज्ञान आत्मसात करताना आढळलेल्या चांगल्या बाबी व त्रुटी प्रत्यक्ष चर्चा व बागेतच निराकरण करण्यात आले.

गट शेतीच्या सभेत बोलताना डाॅ. काळे यांनी बदलत्या शेती पद्धती व्यवस्थेमध्ये शिक्षित व ज्ञानी युवा शेतकऱ्यांची गरज असल्याचे सांगून नियोजनाच्या आधारे अत्यंत चांगल्या प्रकारे अर्थार्जन कसे करता येईल उदाहरणातून मांडले. कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने या गटाला तांत्रिक दृष्ट्या सक्षम करण्याकरिता सातत्याने तांत्रिक प्रशिक्षण, इतर शेतकऱ्यांच्या शेताला भेटी व विद्यापीठाच्या शिवारफेरी कार्यक्रमात सहभाग घेणार असल्याचा सूतवाचक केला.

तज्ज्ञ मार्गदर्शक निवृती पाटील यांनी भेटीमध्ये आढळलेल्या बाबींस अनुसरून तांत्रिक उपाययोजनामध्ये छाटणी, कोळशी रोग, नाग आळी इत्यादीचे व्यवस्थापन बाबत सुचविले तसेच खताचे नियोजन, जातीवंत कलमांचे महत्व व गोकृप्पा कल्चर बाबत विवेचन केले. व शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या शंकाचे निरसन त्यांनी केले. तर एस.के. देशमुख यांनी गट शेतीचे फायदे व जोडीला सामाजिक माध्यमांचा वापर यामुळे विचारांची देवाणघेवाण व नियमित सतर्क राहणे शक्य होत आहे. गट शेतीला चालना देण्याकरिता कृषी विज्ञान केंद्र सदैव पुढाकार घेईल.

कार्यक्रम दरम्यान उत्कृष्ट बागेकरता महेंद्र धोंडबाराव बोरकर सभेचे यशस्वी नियोजन गोपाल बोरकर व राजू पंडितराव बोरकर यांचे अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवृती पाटील तर आभार विलास बोरकर यांनी मानले.