शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

शिरपूर जैनला अतिक्रमणांचा विळखा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:45 IST

शिरपूर जैन : येथील इमदाद बागवान यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी देत अतिक्रमण तत्काळ हटवून विकास तयार ...

शिरपूर जैन : येथील इमदाद बागवान यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी देत अतिक्रमण तत्काळ हटवून विकास तयार आराखडा तयार करण्याचे आदेश न्यायालयाने २०१८ मध्ये दिले; मात्र त्याची तीन वर्षांतही अंमलबजावणी झाली नसून जैनांची काशी म्हणून ओळख असलेल्या शिरपूरला अतिक्रमणांचा घट्ट विळखा बसून गावाचे विद्रुपीकरण झाले आहे.

शिरपुरातील अतिक्रमण हटविण्यासाठी स्थानिक व जिल्हा प्रशासनाकडे तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य इमदाद बागवान यांनी वेळोवेळी मागणी केली; मात्र त्याकडे कोणी लक्ष दिले नाही. शेवटी बागवान यांनी २०१६-१७ मध्ये उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. याचिका न्यायालयाने निकाली काढताना शिरपूर येथील अतिक्रमण हटविण्यासोबतच विकास आराखडा तयार करण्याचे आदेश राज्य सरकार, जिल्हा प्रशासन व ग्रामपंचायतीला दिले होते; परंतु कोणीच दखल घेतली नाही. त्यामुळे बागवान यांनी पुन्हा न्यायालयात आदेशाची अवहेलना झाल्याप्रकरणी याचिका दाखल केली. त्यानंतर सप्टेंबर २०१८ मध्ये प्रत्यक्षात अतिक्रमण काढण्यास सुरूवात करण्यात आली; मात्र मोहीम राबवताना भेदभाव झाला. बहुतांश धनदांडग्यांचे अतिक्रमण कायम राहून लघुव्यावसायिकांचेच अतिक्रमण हटविण्यात आले. याविषयी काही समाजसेवकांनी नाराजी व्यक्त करून प्रशासन व भूमी अभिलेख कार्यालयाच्या विरोधात तक्रारीसुद्धा केल्या होत्या. मोहीम राबविल्यानंतर पाच ते सहा महिन्यांतच अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा ‘जैसे थे’ झाला.

आता तर काही लोकांनी थेट सरकारी जागेवर अतिक्रमण करून जागा काबीज केल्या आहेत. चक्क ग्रामपंचायतला लागून नझूलच्या जागेत बांधकाम सुरू आहे. शिरपूर येथे काही मोक्याच्या ठिकाणी पाच हजार ते सात हजार रुपये स्क्वेअर फूट जागेचे भाव आहेत. त्यामुळे काही लोकांनी कोट्यवधी रुपयांच्या जागा अतिक्रमण करून घशात घातल्या. डिसेंबर २०१९ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात शिरपूर येथील अतिक्रमण व विकास आराखडाबाबत जिल्हा प्रशासनाची बैठक झाली होती. त्यानंतरही विकास आराखडा तयार होऊ शकला नाही.

.............

कोट :

ग्रामपंचायत इमारतीच्या संरक्षण भिंतीला लागून सुरू असलेले अतिक्रमणातील बांधकाम करणाऱ्यास नोटीस बजावण्यात आली आहे. याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

भागवत भुरकाडे

ग्रामविकास अधिकारी, शिरपूर जैन

..............

गाव सुंदर व अतिक्रमणमुक्त राहावे, यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयानेही अतिक्रमण काढण्याचे व विकास आराखडा तयार करण्याचे आदेश दिले; मात्र प्रशासनाने टाळाटाळ केल्याने अवमान याचिका दाखल केली. त्यानंतर प्रशासनाने अतिक्रमण हटविले असले तरी पुन्हा हा प्रश्न ‘जैसे थे’ झाला आहे. प्रशासनाने अतिक्रमण हटवावे; अन्यथा पुन्हा न्यायालयात धाव घेऊ.

- मो. इमदाद बागवान

माजी जि.प. सदस्य तथा याचिकाकर्ते, शिरपूर जैन

...................

अतिक्रमणामुळे रस्ते अरूंद झाले आहेत. हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने लघुव्यावसायिकांसाठी व्यापारी संकुल निर्माण करावे. व्यापारी गाळयांची योग्य किंमत ठरवून पारदर्शकता असायला हवी. खºया गरजूंना व्यापारी गाळे देण्यात यावे.

- अमोल देशमुख, सामाजिक कार्यकर्ते