शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गामध्ये शरद पवारांनी घातले लक्ष!

By admin | Updated: June 11, 2017 02:10 IST

शेतकर्‍यांशी संवाद साधून जाणून घेणार अडचणी; जिल्हय़ातील ५४ गावातून जाणार महामार्ग.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्हय़ातील चार तालुक्यांमधील ५४ गावांना छेदून जात असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी शेतकर्‍यांचा विरोध पाहता शेतकर्‍यांनी आंदोलनी छेडलीत; परंतु एकही मोठा नेता यात सहभागी झाला नाही; परंतु शेतकर्‍यांच्या अडीअडचणी, समस्या सुधारण्याबाबत खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे १२ जून रोजी बैठकीचे आयोजन करून त्या सोडविण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. नागपूर-मुंबई मार्गावरील मोठी शहरे ग्रामीण भागाशी जोडण्याकरिता शासनाने ह्यनागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन-वेह्ण अर्थात समृद्धी महामार्ग प्रस्तावित केला आहे. जिल्हय़ातील ९७ किलोमीटर क्षेत्रात ४ तालुक्यांमधील ५४ गावांना छेदून जात असलेल्या या महामार्गासाठी मालेगाव २२, कारंजा लाड २१, मंगरूळपीर १0 आणि रिसोड तालुक्यात एका गावामधील एकूण १५00 हेक्टर जमीन संपादित करणे व याशिवाय कृषी समृद्धी केंद्रांसाठी प्रत्येकी ४00 हेक्टर याप्रमाणे १२00 हेक्टर जमीन संपादित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्हय़ात समृद्धी महामार्गाचे अंतर ९७ किलोमीटर असून, ९३ किलोमीटर अंतराचे ह्यड्रोनह्णद्वारे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. दगड रोवणीचे (पिलर फिक्सिंग) ७५ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून, ३५ गावांमध्ये संपादित करावयाच्या जमिनीची संयुक्त मोजणी केली आहे. मोजणी करीत असताना गावांमधील काही शेतकर्‍यांनी नियोजित स्थळी हजेरी लावली; मात्र ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेल्या १00 पेक्षा अधिक पोलीस बंदोबस्तामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. शेतकर्‍यांचा विरोध या समृध्दी महामार्गाला का आहे, शासनाच्यावतीने त्यांच्या प्रश्नांचे निरसन व्यवस्थित केल्या जात आहे नाही, यासह या महामार्गात निर्माण होणार्‍या अडचणी, समस्या, सुधारणेबाबत खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे १२ जून रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. औरंगाबाद येथील संत तुकाराम सभागृहामध्ये (सिडको नाटयगृह) १२ जून रोजी दुपारी २ वाजता ही बैठक सुरू होणार आहे. या बैठकीमध्ये महामार्गातील अडचणी, कोण्या शेतकर्‍यांच्या काही सूचना यासह समृद्धी महामार्गाबाबत सर्व प्रश्नांबाबत चर्चा व संवाद साधल्या जाणार आहे. यामध्ये शेतकर्‍यांच्या प्रत्येक प्रश्नांचे निरासरण केल्या जाणर आहे. जिल्हय़ातील शेतकर्‍यांनी या बैठकीस उपस्थित राहून आपल्या शंकांचे निराकरण करण्याचे आवाहन अँड. नजिर काझी यांनी केले आहे.